शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात उभी होतेय बेरोजगारांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:34 IST

गोंदिया : जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अनेक विकासकामेही झाली. मात्र उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत जिल्हा आजही माघारलेला आहे. अदानी वीज प्रकल्प वगळता ...

गोंदिया : जिल्ह्याचा दर्जा मिळाला. अनेक विकासकामेही झाली. मात्र उद्योग-व्यवसायांच्या बाबतीत जिल्हा आजही माघारलेला आहे. अदानी वीज प्रकल्प वगळता जिल्ह्यात अद्यापही मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे हाताला काम मिळेल अशा मोठ्या प्रकल्पाची प्रतीक्षा जिल्ह्यातील युवा वर्गाला असून, जिल्ह्यात बेरोजगारांची फौज उभी होत आहे. रोजगाराच्या नावावर लोकप्रतिनिधींकडून केवळ भूलथापा मिळत असल्याने बेरोजगार युवक आता वाममार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणारे पुढारीही सध्या बेपत्ता झाले आहेत. गोंदिया जिल्ह्याला केंद्रात तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. परंतु खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास झालेला नाही. अलीकडे विकासाच्या बोंबा होत असल्या तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न कायमच आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने हाती असलेले कामही हिरावले, त्यामुळे सुशिक्षित युवकांपासून सर्वसामान्य मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. परिणामी, दिवसेंदिवस जिल्ह्यात बेरोजगारांची फौज तयार होत आहे.

कोरोनाचाही फटका

जिल्ह्यात अदानीशिवाय दुसरे कुठलेही मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षितांना जिल्ह्यातून पलायन करूनच रोजगार उपलब्ध करणे भाग पडते. तर दुसरीकडे शेती व्यवसायाशिवाय रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य मजुरांची नेहमीच रोजगारासाठी भटकंती होत असते. उन्हाळा व हिवाळा या दोन सत्रांत जिल्ह्यातील मजूरवर्ग रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यात जात असताे. मात्र, यावरही कोरोनामुळे संकट आले आहे.

मग जिल्हा विकसित कसा?

गोंदिया जिल्ह्यात वर्ष २०१५-१६, २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली. या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा देशपातळीवर पहिल्या १० क्रमांकांत राहिला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला केंद्र शासनाकडून गौरवान्वितही करण्यात आले. परंतु, मनरेगा योजनेत गोंदिया जिल्हा रोजगाराच्या समस्येपासून होरपळत आहे हे उघड करून दिले. यावरून गोंदिया जिल्हा विकसित कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

औद्योगिक क्रांतीची प्रतीक्षा

जिल्ह्यात मुख्यत: भातपीक घेतले जाते. त्यातही खरीप हंगामावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून आहेत. यामुळे जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. परंतु, यापलीकडे जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात कसलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिक औद्योगिक क्रांतीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात सद्य:स्थिती

गोंदिया जिल्ह्यात आजघडीला वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार १३ लाख २३ हजार ६३५ एवढी लोकसंख्या आहे. जिल्ह्यात ३ लाखांच्या जवळपास कुटुंब संख्या आहे. शिक्षितांची टक्केवारी जवळपास ८५ टक्के आहे, गोंदिया जिल्ह्यात व्याप्ती ५२३४ वर्ग किमी आहे. जनसंख्येची घनता प्रतिकिलोमीटर २५६ आहे. त्या तुलनेत रोजगार नाहीच्या प्रमाणात आहे.