...........
आधी काय होते दोन पर्याय
१) विमाधारक शेतकऱ्यांना पूर्वी पिकांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर द्यावी लागत होती.
२) टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता आली नाही तर शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे करण्याचा पर्याय होता.
......................
हे आहेत नवीन सहा पर्याय
- शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ७२ तासांत टोल फ्री क्रमांकावर करता येईल.
- ई-मेलवर सुध्दा नुकसानीची माहिती देता येईल.
- तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन नुकसानीची माहिती देता येईल.
- तालुकास्तरावर देखील विमा कंपनीचे कर्मचारी कार्यरत असून त्यांना माहिती देता येईल.
- नुकसानीबाबतचा अर्ज करुन सुध्दा शेतकऱ्यांना माहिती देता येणार आहे.
- शेतकऱ्यांना आता हे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.
........................
अतिवृष्टीने ७ हजार ५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
मागील वर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ हजार ५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाईपोटी ८ कोटी ७३ लाख रुपये तर पीक विमा कंपन्यांनी २ काेटी रुपयांची नुकसान भरपाई दिली होती.
..................
शेतकऱ्यांसाठी झाले सुलभ
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमाधारक शेतकऱ्यांना त्याची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर द्यावी लागते. पूर्वी केवळ दोनच पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे बरेचदा शेतकऱ्यांची अडचण होत होती. मात्र आता सहा पर्याय उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती विमा कंपन्याना देणे अधिक सुलभ झाले आहे.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
...........