शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जलस्यांनी जपला प्रबोधनाचा वारसा

By admin | Updated: November 20, 2015 02:13 IST

सांस्कृतिक रुढीचा वारसा झाडीपट्टीत सदैव जपण्यात आला. जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या मंडईच्या पर्वात लावणी, तमाशा,

परंपरा कायम : लावणी, तमाशा, दंडार व नाटकातून महापुरूषांच्या विचारांचा प्रसारबाराभाटी : सांस्कृतिक रुढीचा वारसा झाडीपट्टीत सदैव जपण्यात आला. जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या मंडईच्या पर्वात लावणी, तमाशा, दंडार व नाटकातून पुरातन काळापासून प्रबोधन केले जाते. गावोगावी जलस्यांचे आयोजन करून सदर माध्यमातून महापुरूषांचे विचारही पसरविण्याचे कार्य केले जात आहे.अनेक वर्षापासून आपल्या विदर्भात वामनदादा कर्डक यांच्यापासून सुरूवात जलसा आयोजनाला सुरूवात झाली आणि आताही जलसे सुरूच आहेत. जलसाकरांनी विविध माध्यमातून प्रबोधनाचा वसा सोडलाच नाही. सुजलाल सुफलाम असणाऱ्या विदर्भासह आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जलसाकार, कवी, प्रबोधनकार, वक्ते होऊन गेले. यामध्ये भीमशाहीर विठ्ठल उमप, लोककवी व प्रबोधनकार वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दया पवार, बाबुराव बागुल, रमेश काका कोतवाल, नामदेव ढसाळ यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांचा वारसा चालविण्यासाठी विदर्भातील सुप्रसिध्द कव्वालीकार शिंदे घराणा, आंबेडकरी प्रबोधनकार अनिरूध्द वनकर, अनिरूध्द शेवाळे, राहुल अन्वाकर, प्रबोधनाचा अंकुर जोपासणारे संगम नंदागवळी, कैलास बोरकर, सुलभा खोब्रागडे, मनोज कोटांगले, अविनाश मेश्राम, लालचंद मारगाये असे बरेच तळागळातील प्रबोधनकार आहेत. ग्रामीण भागातील वृद्धापासून तर तरुण मंडळींनी मनात वामनदादा कर्डक यांच्या आठवणींना उजाळा देत जलसांची परंपरा कायम जपली आहे. बहुजन समाजात जगणाऱ्या सर्वपक्षीय लोकांसाठी अभिमानाची ही बाब आहे. याचमुळे जलसाकरांनी हा वसा सोडला नाही. तसेच हा वसा आम्ही सोडू शकत नाही, असे हे जलसाकार, प्रबोधनकार सांगत आहेत.जलसा सादर करताना महापुरुषांचे विचार, आचार, शिकवण, त्यांचे महान कार्य, सामाजिक भावनेची जाणीव तसेच यामधून मिळणारा मानसन्मान, आदरभाव यामुळे समाजापुढे एक वेगळीच प्रतिमा निर्माण करतात. यामध्ये ‘आम्ही तुफानातले दिवे, वादळवारा, सांगा धनाचा बिरला बाटा, भ भटजीचा नाही, भ भीमरावाचा, मायेची सावली, रमाई, मग पाहिजे कशाला बा भीम, जन्म घे तू बा भीमा, क्रांतीचा वादळ, निळ्या पाखरांची माय, वाळलेली काडी एक, मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा, अशा अनेक सुप्रसिद्ध गीतांनी आजच्या काळामध्ये संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र आणि बाहेर राज्यातसुद्धा या जलसाकारांनी धूम केली आहे. मंडईच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात आणखी त्यांची धूम सुरू आहे.या जलशामुळे अनेक कवी , प्रबोधनका, कलावंत व गायक यांना मानसन्मानासह मानधनही मिळते. त्यामुळे बेरोजगारीच्या काळात पोटाच्या खळगीचा प्रश्न सुटत आहे. हे जलसे महापुरुषांच्या जयंत्या, अनावरण सोहळे, सामाजिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक विचार मंचाचे अनेक समारंभ सोहळ्यादरम्यान सादर करून अत्यंत आनंदाने हा जलसाकार वसा जपत असल्याचे काही जलसाकारांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)