शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

गोंदियात बनणार आणखी एक उड्डाणपूल

By admin | Updated: May 22, 2014 23:58 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या

हड्डीटोली परिसर : रस्ते निधींतर्गत ३५ कोटी मंज़ूर

गोंदिया : शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या निधीस मंजूरीसुद्धा मिळाली आहे. गोंदिया शहरात गेल्या काही वर्षांपासून रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. बालाघाट मार्गावरील वसंतनगरजवळून या बांधकामाच्या कार्यास सुरूवात होवून स्थानिक तहसील कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याजवळ आता हे काम समाप्त झाले आहे. मात्र या उड्डाणपुलाचे लोकार्पण अजुनही झालेले नाही. यामुळेच शहरातील नागरिकांना उड्डाणपुलाच्या बांधकामानंतरही ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. याचदरम्यान आणखी शहरात आणखी एका उड्डाणपुलाच्या बांधकामास शासनाने मंजूरी दिल्याची बातमी येऊन धडकली आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या मंजूरीसाठी बर्‍याच आधी प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला २८ मार्च २०१३ रोजी मंजूर केले, त्यासाठी ३५ कोटी रूपये खर्च करण्याच्या तरतुदीस मंजूरी दिली आहे. ही रक्कम केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम जून २०१४ मध्ये सुरू होण्याची शक्यता बांधकाम विभागाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. हा उड्डाणपूल शहराच्या हड्डीटोली परिसरात होणार आहे. तिरोडा मार्ग ते बालाघाट मार्गास जोडण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी एक रस्ता तयार करण्यात आला आहे. याला शहरातील नागरिक रिंगरोड म्हणतात. या गोंदिया-बालाघाट मार्गापासून मरारटोलीकडून एका बायपास रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या रस्त्यावर हड्डीटोली ते सिव्हील लाईन-छोटा गोंदियाला जोडण्यासाठी हे उड्डाणपूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाण पुलाची लांबी १०८ मीटरची राहणार आहे. उड्डाणपुलाचे १८-१८ मीटरचे चार गाळे बनविण्यात येतील. दोन्हीकडे दोन-दोन गाळे राहतील. उड्डाणपुलाच्या मध्यभागी ३० मीटरचा एक गाळा राहील. अशाप्रकारे उड्डाणपुलात पाच गाळे बनविले जातील. याशिवाय उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस अ‍ॅप्रोच मार्ग तयार केले जातील. जून २०१४ मध्ये या उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्याची योजना आहे. परंतु पावसाळा बघता या कालावधीत हे काम सुरू होवू शकेल का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. निविदा प्रक्रिया आताही होवू शकली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे गोंदिया शहराची सुरक्षा लक्षात घेवून पूर्वी बायपासचे बांधकाम केले जात आहे. या अंतर्गत गोंदिया-बालाघाट मार्गापासून ते गोंदिया-आमगाव मार्गाला व गोंदिया-नागपूर मार्गाला जोडण्याचे काम सुरू आहे. परंतु यात सर्वात मोठी अडचण म्हणजे रेल्वे क्रॉसिंगवरून उड्डाणपुलास मंजूरी न मिळाल्याने होत होती. उड्डाण पुलाच्या मंजूरीने आता या बांधकामात येणार्‍या सर्व समस्या दूर होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)