शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अजून ६४२ मिमी पावसाची गरज

By admin | Updated: August 26, 2015 01:35 IST

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत ७०७ मिमी : एक महिन्यात वार्षिक सरासरी गाठणे अशक्यगोंदिया : दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७०७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २५ आॅगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७० टक्केच असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत जेमतेम ५२ टक्केच आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या एक महिन्यात ६४२ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात रोवणी जवळपास ९६ टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या कोवळ्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार आतापर्यंत (दि.२५ आॅगस्ट) जिल्ह्यात १००९.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ३०१.८ मिमी पाऊस कमी पडला आहे.सर्वसाधारणपणे पावसाच्या चार महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १३४९.६१ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र पावसाळ्याचा आता केवळ एक महिना शिल्लक असताना ७०७.४ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असून आर्थिक नुकसान सहन करण्याची पाळी येऊ शकते.पावसाच्या चार महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता गोंदिया तालुक्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १२१७.३० मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत केवळ ६४४.१ मिमी पाऊस पडला आहे. तिरोडा तालुक्यात ११३७ मिमी पावसाची अपेक्षा असताना ६४२.१ मिमी, गोरेगाव तालुक्यात १४१८.८२ मिमीऐवजी आतापर्यंत ७७५.८ मिमी पाऊस झाला. आमगाव येथे १४१८.८२ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ अर्धाच म्हणजे ७४२ मिमी पाऊस पडला आहे. देवरी तालुक्यात १३५७.८० मिमीच्या तुलनेत केवळ ६०६.७ मिमी, सालेकसा तालुक्यात १४१८.८२ मिमीच्या तुलनेत ७८६.३ मिमी, सडक-अर्जुनी तालुक्यात १४००.९२ मिमीच्या तुलनेत आतापर्यंत ८३०.४ मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४२७.४० मिमी पडतो. मात्र आतापर्यंत ६७ टक्के म्हणजे ७३१.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. (प्रतिनिधी)