शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

अजून ५० किलोमीटर रस्त्याचे खोदकाम बाकी

By admin | Updated: May 20, 2014 23:46 IST

गोंदियावासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणारी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास गेलीच नाही. त्यामुळे ही योजना फसल्याचे चित्र दिसत आहे.

गोंदिया : गोंदियावासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणारी शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना दिलेल्या कालावधीत पूर्णत्वास गेलीच नाही. त्यामुळे ही योजना फसल्याचे चित्र दिसत आहे. नोव्हेबर २०१३ मध्येच या योजनेला पूर्ण करावयाचे होते. मात्र अद्याप योजना पूर्ण झालेली नसून आणखी सहा महिने तरी ही योजना पूर्णत्वास येणार नसल्याचे दिसत नाही. अजून ५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदले जाणार आहेत. यामुळे दोन महिन्यात ही योजना पूर्णत्वास जाईल, असा दावा किती खोटा आहे हे स्पष्ट होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरातील पाण्याची समस्या सुटावी यासाठी शासनाने सुमारे ८० कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना गोंदियाला भेट दिली. सन २००९ मध्ये या योजनेला सुरूवात झाली असून पहिल्या टप्यात डांगोर्ली ते कुडवा दरम्यानच्या मुख्य पाईपलाईनचे काम व पाणी टाकीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सन २०११ मध्ये शहरात पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. शहरातील प्रत्येक रस्त्यांवर योजनेची पाईपलाईन टाकावयाची असून हे एकूण २३४ किलोमीटर अंतर असणार आहे. यात काही निर्जन भागांचा समावेश आहे. त्याला वगळल्यास सुमारे २०० किमी रस्ते खोदून त्यात पाईप लाईन टाकावयाची आहे. मात्र अद्यापही हे काम सुरूच आहे. यातील सुमारे ५० किमी. रस्त्यावर पाईपलाईन टाकणे सध्या शिल्लक आहे. वास्तविक पाहता निविदेत नमुद केल्यानुसार नोव्हेंबर २०१३ मध्येच ही योजना पूर्ण करायची होती. मात्र आतापर्यंत या योजनेचे काम सुरूच असल्याने शहरवासीयांसाठी ही योजना दिवास्वप्न ठरत आहे. या योजनेचेही काहींनी राजकारण करून टाकले आहे. येत्या दोन महिन्यांत योजनेचे लोकार्पण करणार असल्याचे आश्वासन देत आहे. मात्र योजनेची आजची स्थिती बघितल्यास आणखी सहा महिने तरी या योजनेची पूर्तता होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येते. (शहर प्रतिनिधी)