शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

अभियंता करतो भाजीपाल्याची शेती

By admin | Updated: May 24, 2016 01:58 IST

तिरोडा तालुक्याच्या अर्जुनीजवळील बोंडराणी येथील नदीकाठी एका शिक्षित युवकाने शेतीकडे मन वळवून भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरूवात केली आहे.

६ महिन्यांत ४ लाखांचा नफा : नोकरीची आशा सोडून शेती व्यवसायाला प्राधान्यकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या अर्जुनीजवळील बोंडराणी येथील नदीकाठी एका शिक्षित युवकाने शेतीकडे मन वळवून भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरूवात केली आहे. नोकरीची आशा न करता शेतीतून चांगले जीवन जगता येते, असा संदेश त्याने आपल्या पहिल्याच वर्षाच्या अनुभवातून दिला आहे.तिरोडा येथील प्रगतीनगरात राहणारा नितीन देवदास पारधी असे त्या युवकाचे नाव आहे. त्याने डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मध्ये नोकरी केली. यानंतर गुजरातला स्थानांतर करण्यात आले. त्यामुळे नितीनचे मन वळले व त्याने शेती करण्याचा निर्धार केला. अर्जुनी (परसवाडा) क्षेत्रात बोंडराणी येथे नदीकाठी असलेल्या पाच एकर शेतीपैकी दीड एकरात उन्हाळी धानपीक लावले. तीन एकर शेतात टमाटर, वांगी व मिरचीचे पीक लावले. तसेच अर्ध्या एकरमध्ये हरभरा व गव्हाचे पीक लावले. अशा पद्धतीने पहिल्या वर्षी आपले मन शेतीत लावून अनुभव घेतला व यात यशस्वीसुद्धा झाला.नितीनने सिव्हील इंजिनियरचा डिप्लोमा घेतला असून आपल्याला नोकरीची आशा असली तरी एकाच बाबीवर अवलंबून न राहता, भविष्यात नोकरी लागली नाही तर आपल्याला शेतीवर जीवनयापन करता यावे, यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे तो सांगतो. आतापर्यंत ड्रीप (पाईप लाईन) व बियाणे, खत, मजुरी मिळून दोन लाख पन्नास हजार रूपये खर्च आलेला आहे. आतापर्यंत एक लाख रूपयांचे टमाटर, ३० हजारांची वांगी व धानातून ५० हजार रूपयांचे उत्पादन हाती मिळाले असल्याचे नितीनने सांगितले आहे. भाजीपाल्याची लागवड उशिरा केल्याने वांग्यांचे उत्पादन जुलै शेवटपर्यंत मिळणार आहे. दोन एकरमध्ये वांग्याचे पीक असल्याने शेवटपर्यंत पाच ते सहा लाख रूपयांचे उत्पादन मिळणार असल्याचे नितीनने लोकमतशी बोलताना सांगितले. त्याचे हे पहिले वर्ष असून यावर्षी त्याचे वडील कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांच्या मार्गदर्शनात त्याने पिकांची लागवड केली. सद्यस्थितीत आठवड्यात २० कॅरेटच्या वर टमाटर, २० ते ३० पोती वांगी तोडल्या जाते. नोकरीपेक्षा शेतीकामात खूप आनंद वाटतो, असेही तो सांगतो. निसर्गाने साथ दिल्यास व भाजीपाल्याचे भाव स्थिर राहिल्यास आपल्याला सहा महिन्यांत तीन ते चार रूपयांचा शुद्ध नफा होणार असल्याचेही तो बोलला.वडील देविदास पारधी यांनी नोकरीवर आशा न ठेवता शेतीकडे लक्ष द्या. अनुभव निरर्थक ठरत नाही. ते कधीही कामी येतात, असे मार्गदर्शन केल्याने आपण शेतकडे वळल्याचे त्याने सांगितले. सध्या आपल्याला कोणतेही त्रास किंवा चिंता नसून आनंदित असल्याचे म्हटले. भविष्यात चांगली नोकरी लागली तर करू, असे ही तो म्हणाला. शिक्षित पदवीधार मुलांनी नोकरीवरच अवलंबून न राहता इतर क्षेत्र व व्यवसायाचे गुण अंगिकारणे गरजेचे आहे. जेवढे सुख व आनंद शेती करण्यात मिळतो, तेवढे सुख व आनंद इतर कोत्याही क्षेत्रात मिळत नाही. आपण स्व:ताच्या या व्यवसायामुळे सतत पाच १० मजुरांना नियमित कामे देवू शकता. यातून खूप आनंद मिळते, असे नितीने सांगितले. (वार्ताहर)