शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

१५ तास प्रतीक्षा करूनही कामगार रिकाम्या हाताने परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते.

ठळक मुद्देदहा महिला कामगार बेशुद्ध : सुरक्षा संचामुळे कामगार झाले असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालयातर्फे दोन एजन्सींना काम देऊन कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम देण्यात आले. परंतु नियोजनशून्य कारभारामुळे गोंदियात मागील पाच दिवसांपासून कामगारांचा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी पाचव्या दिवशी सकाळी पाच वाजतापासून दाखल झालेल्या हजारो महिलांना रात्री ८ वाजतापर्यंत या सुरक्षा संचाची वाट पाहावी लागली. या सुरक्षा संचाच्या नादात उपाशी तापाशी असलेल्या दहा महिला बेशुध्द झाल्या होत्या.गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते. परंतु हे संच वाटप करतांना सहाय्यक आयुक्त उज्वल लोया यांनी खबरदारी न घेतल्यामुळे महिला कामगारांची खूप गैरसोय झाली.मागील पाच दिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही. त्यासाठी मागील पाच दिवसांपासून गर्दी होत आहे. गोंदियाच्या प्रितम लॉन येथे हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. हे साहित्य वाटप करण्याचे काम मुंबईच्या दोन कंपन्यांना देण्यात आले. परंतु त्या कंपन्यांचे काम करणारे कर्मचारी कामगारांना धमकावित असल्याने दिवसभरात अनेकदा गोंधळ उडाला.कामगारांचे दिवसभर झालेले हाल पाहून महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, जहीर अहमद, रामेश्वर लिल्हारे, निलम हलमारे, परवेज बेग, आदिल पठाण, असर राहूल, अनिलकुमार गौतम, जितेंद्र कटरे, दिलीप गौतम असे अनेक राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. एकाच सोबत १० हजारापेक्षा अधिक कामगार एकत्र आल्याने गोंधळ उडाला.ज्या ठिकाणी हे वाटप करण्याचे शिबिर लावण्यात आले त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले कामगार बेशुध्द झाले. रात्रीचे आठ वाजूनही हजारो कामगारांची गर्दी हॉल व लॉन परिसरात होती.साहित्य शासनाचे प्रचार लोकप्रतिनिधींचामहाराष्ट्र शासनाने कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे निर्णय घेतला. महाराष्ट्र शासन कामगारांच्या हितासाठी काम करीत असतांना त्या पेट्यांवर एका लोकप्रतिनिधीच्या प्रचाराचे फोटो लावले होते. कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अत्यावश्यक सुरक्षा संच पेटीवर फोटो कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाकडून कामगारांना शासनाच्या तिजोरीतून साहित्य वाटप करतांना त्या अत्यावश्यक सुरक्षा लोकप्रतिनिधीचे फोटा का लावण्यात आले. या प्रकरणात सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया यांची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहे.- अमर वºहाडे, महासचिव महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटी

टॅग्स :government schemeसरकारी योजना