शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

१५ तास प्रतीक्षा करूनही कामगार रिकाम्या हाताने परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते.

ठळक मुद्देदहा महिला कामगार बेशुद्ध : सुरक्षा संचामुळे कामगार झाले असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्त कार्यालयातर्फे दोन एजन्सींना काम देऊन कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम देण्यात आले. परंतु नियोजनशून्य कारभारामुळे गोंदियात मागील पाच दिवसांपासून कामगारांचा गोंधळ उडाला आहे. मंगळवारी पाचव्या दिवशी सकाळी पाच वाजतापासून दाखल झालेल्या हजारो महिलांना रात्री ८ वाजतापर्यंत या सुरक्षा संचाची वाट पाहावी लागली. या सुरक्षा संचाच्या नादात उपाशी तापाशी असलेल्या दहा महिला बेशुध्द झाल्या होत्या.गोंदियातील सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात नोंदीत असलेल्या ७६ हजार ४७८ कामगारांपैकी ज्यांनी सतत ९० दिवस काम केले अशा ३१ हजार ६१४ कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संच द्यायचे होते. निवडणुकीपूर्वी अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा व गोंदिया या तालुक्यातील काही कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले होते. परंतु हे संच वाटप करतांना सहाय्यक आयुक्त उज्वल लोया यांनी खबरदारी न घेतल्यामुळे महिला कामगारांची खूप गैरसोय झाली.मागील पाच दिवसांपासून गोंदियात हे सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत एकूण १४ हजार ७५ कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले. १७ हजार ५३९ कामगारांना हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्यात आले नाही. त्यासाठी मागील पाच दिवसांपासून गर्दी होत आहे. गोंदियाच्या प्रितम लॉन येथे हे अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे काम सुरू आहे. हे साहित्य वाटप करण्याचे काम मुंबईच्या दोन कंपन्यांना देण्यात आले. परंतु त्या कंपन्यांचे काम करणारे कर्मचारी कामगारांना धमकावित असल्याने दिवसभरात अनेकदा गोंधळ उडाला.कामगारांचे दिवसभर झालेले हाल पाहून महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव अमर वºहाडे, विनोद जैन, जहीर अहमद, रामेश्वर लिल्हारे, निलम हलमारे, परवेज बेग, आदिल पठाण, असर राहूल, अनिलकुमार गौतम, जितेंद्र कटरे, दिलीप गौतम असे अनेक राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. एकाच सोबत १० हजारापेक्षा अधिक कामगार एकत्र आल्याने गोंधळ उडाला.ज्या ठिकाणी हे वाटप करण्याचे शिबिर लावण्यात आले त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले कामगार बेशुध्द झाले. रात्रीचे आठ वाजूनही हजारो कामगारांची गर्दी हॉल व लॉन परिसरात होती.साहित्य शासनाचे प्रचार लोकप्रतिनिधींचामहाराष्ट्र शासनाने कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच वाटप करण्याचे निर्णय घेतला. महाराष्ट्र शासन कामगारांच्या हितासाठी काम करीत असतांना त्या पेट्यांवर एका लोकप्रतिनिधीच्या प्रचाराचे फोटो लावले होते. कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अत्यावश्यक सुरक्षा संच पेटीवर फोटो कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शासनाकडून कामगारांना शासनाच्या तिजोरीतून साहित्य वाटप करतांना त्या अत्यावश्यक सुरक्षा लोकप्रतिनिधीचे फोटा का लावण्यात आले. या प्रकरणात सहाय्यक कामगार आयुक्त उज्वल लोया यांची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहे.- अमर वºहाडे, महासचिव महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमेटी

टॅग्स :government schemeसरकारी योजना