शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अखेर पोटनिवडणूक रद्द

By admin | Updated: April 2, 2016 02:12 IST

पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून ....

निवडणूक आयोगाचे आदेश : मतदार यादीतील घोळामुळे लागले ग्रहण गोंदिया : पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी त्याबाबतचा लेखी आदेश शुक्रवारी जारी केला.शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य अनिल पांडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार होती. मात्र या पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे २७०० मतदारांचा एक भाग प्रभाग क्रमांक १ मध्ये जुळला होता. यावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व सभापती जितेंद्र पंचबुद्धे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. इकडे मतदार यादीतील घोळ लक्षात घेत मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी कर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले, तर दुसरीकडे मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनाही शुक्रवारी निलंबीत करण्यात आले. यासोबत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून प्रभाग क्रमांक १ ची पोटनिवडणूकही रद्द करण्यात आली आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अवघे आठ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सदर पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेवकाला अवघा ६ ते ७ महिन्याचा कार्यकाळ लाभला असता. आता ही निवडणूकही रद्द झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुढील अधिसूचना कधी निघेल आणि त्यानंतर पोटनिवडणूक कधी होईल, आणि विजयी उमेदवाराला नगरसेवकपदी राहण्यासाठी किती कार्यकाळ लाभेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मतदार यादीतील घोळ दुरूस्त करून नव्याने मतदार यादी तयार करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या रद्द झालेली ही निवडणूक काही दिवसानंतर होईल की नाही, की थेट सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा मतदार संघ रिकामाच राहणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (शहर प्रतिनिधी) उमेदवारांच्या उत्साहावर विरजणपोटनिवडणुकीसाठी सध्या तरी नऊ उमेदवार रिंगणात होते. यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. उमेदवारांनी आपले होर्डीग लावून प्रचाराचे कामही सुरू केले होते. मात्र मधातच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून निवडणूक रद्द करण्यात आल्याने उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.