शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अखेर पोटनिवडणूक रद्द

By admin | Updated: April 2, 2016 02:12 IST

पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून ....

निवडणूक आयोगाचे आदेश : मतदार यादीतील घोळामुळे लागले ग्रहण गोंदिया : पोटनिवडणुकीला घेऊन मागील २२ मार्चपासून सुरू असलेला तिढा अखेर सुटला. मतदार दायीत घोळ झाल्याच्या कारणावरून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी त्याबाबतचा लेखी आदेश शुक्रवारी जारी केला.शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सदस्य अनिल पांडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक घेतली जाणार होती. मात्र या पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे २७०० मतदारांचा एक भाग प्रभाग क्रमांक १ मध्ये जुळला होता. यावर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व सभापती जितेंद्र पंचबुद्धे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. इकडे मतदार यादीतील घोळ लक्षात घेत मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी कर विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले, तर दुसरीकडे मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनाही शुक्रवारी निलंबीत करण्यात आले. यासोबत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून प्रभाग क्रमांक १ ची पोटनिवडणूकही रद्द करण्यात आली आहे.विशेष म्हणजे नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यासाठी आता अवघे आठ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सदर पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या नगरसेवकाला अवघा ६ ते ७ महिन्याचा कार्यकाळ लाभला असता. आता ही निवडणूकही रद्द झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुढील अधिसूचना कधी निघेल आणि त्यानंतर पोटनिवडणूक कधी होईल, आणि विजयी उमेदवाराला नगरसेवकपदी राहण्यासाठी किती कार्यकाळ लाभेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मतदार यादीतील घोळ दुरूस्त करून नव्याने मतदार यादी तयार करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या रद्द झालेली ही निवडणूक काही दिवसानंतर होईल की नाही, की थेट सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हा मतदार संघ रिकामाच राहणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (शहर प्रतिनिधी) उमेदवारांच्या उत्साहावर विरजणपोटनिवडणुकीसाठी सध्या तरी नऊ उमेदवार रिंगणात होते. यात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. उमेदवारांनी आपले होर्डीग लावून प्रचाराचे कामही सुरू केले होते. मात्र मधातच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून निवडणूक रद्द करण्यात आल्याने उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.