शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

५८ वर्षानंतरही ‘स्वातंत्र्य संग्राम सेनानी’चा दर्जा नाही

By admin | Updated: August 15, 2016 00:21 IST

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी ....

अधिकारासाठी नातवाची धडपड : उच्च न्यायालयात मागीतली दाद नरेश रहिले  गोंदिया इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी तर सोडा मृत्यूच्या ५८ वर्षानंतरही मिळाला नाही. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली कल्लू यादव (गवली) यांचे हे प्रकरण असून आपल्या आजोबांच्या या अधिकारासाठी त्यांचा नातू धडपडत आहे. स्वातंत्र्यता संग्राम सेनानीच्या प्रमाणपत्रासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. शहराच्या दुर्गा चौक कृष्णपुरा वार्डातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या कामाच्या सन्मानासाठी त्यांचे नातू अविलाश ओमप्रकाश यादव यांनी मागील पाच वर्षापूर्वी अर्ज केला होता. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्यांच्या आजोबांना प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी त्यांना न्यायालयात जावे लागले. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर 33 वर्षाने २४ एप्रिल १९९० ला त्यांचे नातू अविलाश यांना मुंबई वरून महाराष्ट्र शासनाचे एक पत्र मिळाले. या पत्राच्या माध्यमातून निहाली यादव यांना स्वातंत्र्यता संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. निहाली यादव यांना शासनातर्फे झालेल्या तुरूंगवासाचे प्रमाणपत्र मागीतले होते. ते कागदपत्र तयार करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर अविलाशने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या माध्यमातून मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागाला अर्ज केला होता. या अर्जासोबत यादव यांनी जबलपूर कारागृह, अतिरिक्त महानिदेशक व भोपाल च्या तुरूंग महानिरीक्षक, जबलपूर चे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, जबलपूर येथील वैद्यकीय अहवाल व हेयरशिप रिपोर्ट अर्जासोबत जोडले होते.५ जानेवारी २०१५ ला मुंबई सामान्य प्रशासन विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र मिळाले. पत्रात निहाली यादव स्वातंत्र्यता संग्राम सेनानी आहेत व मुंबई प्रशासन विभागाद्वारे त्यांना स्वातंत्र्य संग्राम सेनानी घोषित करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. पत्रात स्पष्ट उल्लेख केला होता की,स्वातंत्र्यता संग्राम सेनानी सन्मान सेवानिवृत्ती वेतन योजना १९५६ अंतर्गत फक्त पत्नीला पेंशन मिळू शकते.परंतु १९८०, १९९०, २००८ व २००९ च्या शासन निर्णयानुसार अविवाहित मुलगा-मुलगी, नाती-नातू, भावाचा मुलगा किंवा कुटुंबातील सदस्यांना पेंशन दिली जाऊ शकते. स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेंशन योजनेंतर्गत तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या तपासणीनंतर कुटुंबाला पेंशन लागू करण्यात येते. परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. भोगला १४ महिन्यांचा कारावास स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांनी ८ आॅगस्ट १९४२ च्या ‘करो या मरो’ आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना जबलपूर कारागृहात १४ महिने ठेवण्यात आले. २४ मार्च १९५७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही निहाली कल्लू यादव यांच्या कुटंबियांना जसे प्रमाणपत्र पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही. मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणाले, आधी पेंशन करीता अर्ज पाठवावे त्यानंतर पेंशन लागू झाल्यावर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र लागू करण्यात आले. परंतु निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पेंशनसाठी अर्ज करणारा कुणीच नसल्याने स्वातंत्र्य संग्राम सेनानी प्रमाणपत्र मिळणार कसे? जबलपूर तुरूंगाच्या प्रमाणपत्रावर शासन प्रमाणपत्र देऊ शकते. मात्र हे प्रमाणपत्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे अडकलेले आहे.