शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

५८ वर्षानंतरही ‘स्वातंत्र्य संग्राम सेनानी’चा दर्जा नाही

By admin | Updated: August 15, 2016 00:21 IST

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी ....

अधिकारासाठी नातवाची धडपड : उच्च न्यायालयात मागीतली दाद नरेश रहिले  गोंदिया इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ‘करो या मरो’ या आंदालेनात भाग घेणाऱ्यास स्वातंत्र्य सेनानींचा दर्जा जिवंतपणी तर सोडा मृत्यूच्या ५८ वर्षानंतरही मिळाला नाही. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली कल्लू यादव (गवली) यांचे हे प्रकरण असून आपल्या आजोबांच्या या अधिकारासाठी त्यांचा नातू धडपडत आहे. स्वातंत्र्यता संग्राम सेनानीच्या प्रमाणपत्रासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. शहराच्या दुर्गा चौक कृष्णपुरा वार्डातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या कामाच्या सन्मानासाठी त्यांचे नातू अविलाश ओमप्रकाश यादव यांनी मागील पाच वर्षापूर्वी अर्ज केला होता. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्यांच्या आजोबांना प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी त्यांना न्यायालयात जावे लागले. स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर 33 वर्षाने २४ एप्रिल १९९० ला त्यांचे नातू अविलाश यांना मुंबई वरून महाराष्ट्र शासनाचे एक पत्र मिळाले. या पत्राच्या माध्यमातून निहाली यादव यांना स्वातंत्र्यता संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र द्यायचे होते. निहाली यादव यांना शासनातर्फे झालेल्या तुरूंगवासाचे प्रमाणपत्र मागीतले होते. ते कागदपत्र तयार करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर अविलाशने तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या माध्यमातून मुंबई येथील सामान्य प्रशासन विभागाला अर्ज केला होता. या अर्जासोबत यादव यांनी जबलपूर कारागृह, अतिरिक्त महानिदेशक व भोपाल च्या तुरूंग महानिरीक्षक, जबलपूर चे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, जबलपूर येथील वैद्यकीय अहवाल व हेयरशिप रिपोर्ट अर्जासोबत जोडले होते.५ जानेवारी २०१५ ला मुंबई सामान्य प्रशासन विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र मिळाले. पत्रात निहाली यादव स्वातंत्र्यता संग्राम सेनानी आहेत व मुंबई प्रशासन विभागाद्वारे त्यांना स्वातंत्र्य संग्राम सेनानी घोषित करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. पत्रात स्पष्ट उल्लेख केला होता की,स्वातंत्र्यता संग्राम सेनानी सन्मान सेवानिवृत्ती वेतन योजना १९५६ अंतर्गत फक्त पत्नीला पेंशन मिळू शकते.परंतु १९८०, १९९०, २००८ व २००९ च्या शासन निर्णयानुसार अविवाहित मुलगा-मुलगी, नाती-नातू, भावाचा मुलगा किंवा कुटुंबातील सदस्यांना पेंशन दिली जाऊ शकते. स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेंशन योजनेंतर्गत तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या तपासणीनंतर कुटुंबाला पेंशन लागू करण्यात येते. परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. भोगला १४ महिन्यांचा कारावास स्वातंत्र्यता संग्राम सेनानी निहाली यादव यांनी ८ आॅगस्ट १९४२ च्या ‘करो या मरो’ आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना जबलपूर कारागृहात १४ महिने ठेवण्यात आले. २४ मार्च १९५७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही निहाली कल्लू यादव यांच्या कुटंबियांना जसे प्रमाणपत्र पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळाले नाही. मुंबई मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणाले, आधी पेंशन करीता अर्ज पाठवावे त्यानंतर पेंशन लागू झाल्यावर स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे प्रमाणपत्र लागू करण्यात आले. परंतु निहाली यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पेंशनसाठी अर्ज करणारा कुणीच नसल्याने स्वातंत्र्य संग्राम सेनानी प्रमाणपत्र मिळणार कसे? जबलपूर तुरूंगाच्या प्रमाणपत्रावर शासन प्रमाणपत्र देऊ शकते. मात्र हे प्रमाणपत्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे अडकलेले आहे.