शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

आदिवासी समाज विकासापासून दूर

By admin | Updated: May 29, 2015 01:24 IST

आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे.

शेंडा (कोयलारी) : आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली भाषा, वेशभूषा, रुढी, परंपरा व संस्कृती आहे. ती इतर जातीच्या संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. आदिवासी जमातीची भारतीय इतिहासात एक वेगळी ओळख आहे. परंतु राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासींची कुचंबना करीत आहेत. तसेच आदिवासी समाजातील राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून आदिवासी जमातीच्या पोटात खंजीर खूपसण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आजही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर असल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून केला जात आहे. आदिवासी समाजाला आजतोवर देशपातळीवर समाजाचे नेतृत्व करणारा कणखर नेता मिळाला नाही. समाजाचे नेतृत्व करण्याचा आव बाळगणारे राजकीय नेते स्वत:च्या स्वार्थापोटी समाजाला राजकारणाच्या काळ्या बाजारात विकण्याचा कुटील डाव रचतात. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे, असे नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ, आॅल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटनांनी प्रसिद्धी पत्रांद्वारे कळविले आहे.खा. अशोक नेते स्वत: आदिवासी समाजाच्या आरक्षण कोट्यातून खासदार झाले. त्याच समाजाच्या अधिकाराचे व आरक्षणाचे हनन करण्याचा कुटील डाव खेळत असाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारुन आदिवासी आरक्षणातून मिळालेले खासदारकीचे पद सोडावे व नंतर समाज विरोधी खेळी करण्यास मोकळे आहात, अशी टीका आदिवासी संघटनेच्या नेत्यांंनी केली आहे.इतर समाजाप्रमाणे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आदिवासी विकास विभागाची निर्मिती केली. शिक्षणातून उन्नती होईल या उदात्त हेतूने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवून करोडो रुपये खर्ची घातल्या जाते. परंतु त्याचा फायदा मूळ आदिवासींना होत नाही. खेड्यापाड्यात, जंगल खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींची मुले आजही शिक्षण क्षेत्रात मागे आहेत. यावर आदिवासी नेत्यांनी मंथन करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजातील नवतरुण, तरुणी, कर्मचारी, शेतमजूर, शेतकरी यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना त्यांची जागा कोठे आहे, हे दाखवून द्यावे. त्यासाठी संघर्ष करण्यासाठी संघटीत व्हावे.समाजाची अस्मिता, स्वाभिमान, अभिमान व संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघटित होवून समाज विरोधी काम करणाऱ्या राजकीय नेत्यांना हाकलून लावावे, असे आदिवासी विद्यार्थी संघ, नॅशनल आदिवास्ौी फेडरेशनचे अध्यक्ष जगदीश खंडाते, योगेश इळपाते, संजय प्रधान, दिनेश सलामे व इतरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. (वार्ताहर)