शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१२९६ बालकामगार आढळूनही कारवाई शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील २०० गावांत डिसेंबर महिन्यात सर्वेक्षण करून आठही तालुक्यातून बालकामगार पकडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ४२६ मुले व ३७० मुली असे एकूण ७९६ तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३६९ मुले व १३१ मुली असे एकूण ५०० बालकामगार पकडण्यात आले.

ठळक मुद्दे२०० गावांतील सर्वेक्षण : प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी खटाटोप तर नाही ना ?

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डिसेंबर महिन्यात कामगार आयुक्त कार्यालय व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाकडून करण्यात आलेल्या बालकामगार सर्वेक्षणात एक हजार २९६ बालकामगार आढळल्याची माहिती पुढे आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकामगार आढळले परंतु एकाही आस्थापनेवर कारवाई झाली नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.कुणीही शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी शासनाने प्रगत शैक्षणीक महाराष्ट्राची प्रभवीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरीबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या. प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार असल्यामुळे त्यांना शिक्षण घेणे आवश्यक आहे. सर्वेक्षण झाले नसल्याने २ वर्ष पूर्ण झालेल्या बालकामागाराला विशेष प्रशिक्षण केंद्रातून नियमाप्रमाणे नियमित शाळेत दाखल करावे लागते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यातील १६ बाल संक्रमण विशेष प्रशिक्षण केंद्र बंद आहेत.यावर जिल्ह्यातील २०० गावांत डिसेंबर महिन्यात सर्वेक्षण करून आठही तालुक्यातून बालकामगार पकडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यात ९ ते १४ वर्षे वयोगटातील ४२६ मुले व ३७० मुली असे एकूण ७९६ तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३६९ मुले व १३१ मुली असे एकूण ५०० बालकामगार पकडण्यात आले.बालकामगारांचे सध्या १६ प्रशिक्षण केंद्र बंदगोंदिया शहरातील गोंडीटोला, संजयनगर मुर्री, गड्डाटोली, गौतमनगर, भीमनगर, यादव चौक, सुंदरनगर, कुडवा, छोटा गोंदिया, बाबाटोली, मुरकूटडोह दंडारी-३, काचेवानीटोला, मुंडीकोटा, अदासी, तिरोडा तालुक्यातील नवरगाव व तिरोडा न.प. येथील बालसंक्रमण शाळा बंद आहेत. मागे झालेल्या सर्वेक्षणात गड्डाटोलीतील १८, गौतमनगर १५, यादव चौक १९, सुंदरनगर १९, कुडवा ११, बाबाटोली ८, मुरकूटडोह दंडारी-३ मधील ५, काचेवानीटोला ६, मुंडीकोटा १५, भिमनगर ११ व छोटा गोंदियातील ३९ असे १६६ बालकामगार बेपत्ता होते.म्हणे, होईल बालकामगारांची वर्गवारीडिसेंबर महिन्यात पकडण्यात आलेल्या बालकामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोणती मुले बालकामगार आहेत आणि कोणती मूले बालकामगार नाहीत याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे आता त्या शोधलेल्या बालकांत आता कोण बालकामगार आहे याचा पुन्हा शोध घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानंतरच यापैकी कोण बालकामगार ही माहिती पुढे येईल.