शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दररोज कोरोनाच्या सुमारे तीन हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. यात काही जिल्ह्यांतील स्थिती आता आवाक्याबाहेर जात असल्याचे बघून तेथे लॉकडाऊनची ...

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. यात काही जिल्ह्यांतील स्थिती आता आवाक्याबाहेर जात असल्याचे बघून तेथे लॉकडाऊनची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर निर्माण झालेली स्थिती टाळता यावी म्हणून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त संशयितांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने आता जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्यांवर भर दिला जात आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोना पुन्हा पाय पसरत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. यामुळे जास्तीत जास्त बाधित व त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या करून वेळीच कोरोना उद्रेकाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच मागील काही दिवसांतील आकडेवारी बघता जिल्ह्यात दररोज सुमारे तीन हजार चाचण्या केल्या जात असल्याचे दिसत आहे. यात चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढत असून, एकंदर जास्तीत जास्त बाधितांना शोधण्यात यश येत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

--------------------

रविवारच्या आकडेवारीनुसार १२०८ वेटिंग

रविवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १२०८ चाचण्यांचा अहवाल प्रलंबित होता. म्हणजेच जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण यावरून दिसून येते. जिल्ह्यात शनिवारी ५४४ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची नोंद असताना रविवारी ४१ बाधितांची भर पडली होती. आता रविवारी १२०८ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असताना सोमवारी किती बाधितांची भर पडणार हे सांगणे कठीणच आहे. मात्र, जास्तीत जास्त चाचण्या करून वेळीच रुग्णांना गाठण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे.

----------------------------

आता मास्क व गर्दी टाळणे हेच उपाय

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही जिल्ह्यातील चित्र बघता आताही नागरिकांत गांभीर्य आले नसल्याचे दिसते. मास्क न वापरता फिरणे व शारीरिक अंतराचे पालन करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. हाच प्रकार धोकादायक असून, यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. मात्र, कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्क व गर्दी टाळणे हेच उपाय गरजेचे आहेत.