शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

९४८६ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर

By admin | Updated: December 26, 2016 01:06 IST

गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा

दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणाच नाही जातीय सलोखा राखून तंट्यावर केली मात १८ हजार ४२३ गावांत वाहते शांततेचे वारे नरेश रहिले ल्ल गोंदिया गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा निपटारा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत अख्या महाराष्ट्रात लोकचळवळ निर्माण झाली. त्यामुळे सातवर्षात १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त झालीत. उर्वरीत ९ हजार ४८६ गावे तंटामुक्त होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शासनाने दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणा केली नाही. राज्यात २७ हजार ८९१ ग्राम पंचायती आहेत. यापैकी महाराष्ट्रातील १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त ठरली. या गावांना मागील सात वर्षात ४३८ कोटी १८ लाख ६७ हजार रूपये बक्षीस देण्यात आले. या बक्षीस रकमेतून गावाचा विकास करण्यात आला आहे. लोकसहभागातून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवितांना न्यायालयाच्या व पोलिसांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी झाला. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले तंटे सामोपचाराने गावातच सोडविण्यासाठी गावातीलच विविध घटकांना एकत्र करून त्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात आमूलाग्र बदल केला आहे. १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झालेल्या या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांततेची मशालच पेटविली आहे. ही मोहीम राबवून शासनाच्या निकषानुसार तंटामुक्त गाव मोहीम म्हणून पुढे आलेल्या तंटामुक्त गावांना लोकसंख्येच्या आधारावर शासनाने बक्षीसे वाटली. यात २००७-०८ या वर्षात २३२८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४८ कोटी ९० लाख ५० हजार रुपये मिळाली. २००८-०९ या वर्षात २८९१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६८ कोटी ८३ लाख १७ हजार रुपये, २००९-१० या वर्षात ४२४९ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी १०१ कोटी ५५ लाख २५ हजार रुपये, २०१०-११ या वर्षात ३८२४ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ९३ कोटी ७१ लाख रुपये, २०११-१२ या वर्षात २७१२ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६९ कोटी ५९ लाख २५ हजार रुपये, २०१२-१३ या वर्षात १७४१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये, २०१३-१४ या वर्षात ६७८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ८ कोटी ९९ लाख ७५ हजार रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले. सामाजिक उपक्रमात अग्रेसर ४गावातील अवैध धंद्याना आळा घालून ते धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविले. स्त्रीभ्रुण हत्येवर आळा घालण्यासाठी कन्यारत्न जन्मानंद भेट मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा गौरव, नवविवाहित मुलींना माहेरभेट, जातीय सलोखा , हुंडाबंदी करण्यात आली. आंतरजातीय विवाह घडवून आणला. समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा यावर आळा घातला. सण, उत्सव सामूहिकरीत्या शांततेत पार पाडणे सुरू आहे. महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिकांचा सन्मान, विधवा, परित्यक्ता यांना मदत, वृक्षारोपण करण्यात आले. या शिवाय गावाला शांततेच्या मार्गाने गावाचा विकास करण्यावर या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. तंटामुक्त गाव मोहीम सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.