शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
6
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
7
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
8
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
9
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
10
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
11
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
12
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
13
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
14
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
15
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
16
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
17
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
18
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
19
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
20
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS

९४८६ गावे तंटामुक्तीच्या मार्गावर

By admin | Updated: December 26, 2016 01:06 IST

गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा

दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणाच नाही जातीय सलोखा राखून तंट्यावर केली मात १८ हजार ४२३ गावांत वाहते शांततेचे वारे नरेश रहिले ल्ल गोंदिया गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, क्षुल्लक वादाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊ नये, गाव गाड्यातूनच तंट्याचा निपटारा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत अख्या महाराष्ट्रात लोकचळवळ निर्माण झाली. त्यामुळे सातवर्षात १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त झालीत. उर्वरीत ९ हजार ४८६ गावे तंटामुक्त होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शासनाने दोन वर्षापासून तंटामुक्त गावांची घोषणा केली नाही. राज्यात २७ हजार ८९१ ग्राम पंचायती आहेत. यापैकी महाराष्ट्रातील १८ हजार ४२३ गावे तंटामुक्त ठरली. या गावांना मागील सात वर्षात ४३८ कोटी १८ लाख ६७ हजार रूपये बक्षीस देण्यात आले. या बक्षीस रकमेतून गावाचा विकास करण्यात आला आहे. लोकसहभागातून गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवितांना न्यायालयाच्या व पोलिसांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी झाला. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले तंटे सामोपचाराने गावातच सोडविण्यासाठी गावातीलच विविध घटकांना एकत्र करून त्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने गावात आमूलाग्र बदल केला आहे. १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झालेल्या या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावात शांततेची मशालच पेटविली आहे. ही मोहीम राबवून शासनाच्या निकषानुसार तंटामुक्त गाव मोहीम म्हणून पुढे आलेल्या तंटामुक्त गावांना लोकसंख्येच्या आधारावर शासनाने बक्षीसे वाटली. यात २००७-०८ या वर्षात २३२८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४८ कोटी ९० लाख ५० हजार रुपये मिळाली. २००८-०९ या वर्षात २८९१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६८ कोटी ८३ लाख १७ हजार रुपये, २००९-१० या वर्षात ४२४९ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी १०१ कोटी ५५ लाख २५ हजार रुपये, २०१०-११ या वर्षात ३८२४ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ९३ कोटी ७१ लाख रुपये, २०११-१२ या वर्षात २७१२ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ६९ कोटी ५९ लाख २५ हजार रुपये, २०१२-१३ या वर्षात १७४१ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये, २०१३-१४ या वर्षात ६७८ गावे तंटामुक्त झाली. त्या गावांना बक्षीसापोटी ८ कोटी ९९ लाख ७५ हजार रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले. सामाजिक उपक्रमात अग्रेसर ४गावातील अवैध धंद्याना आळा घालून ते धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविले. स्त्रीभ्रुण हत्येवर आळा घालण्यासाठी कन्यारत्न जन्मानंद भेट मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा गौरव, नवविवाहित मुलींना माहेरभेट, जातीय सलोखा , हुंडाबंदी करण्यात आली. आंतरजातीय विवाह घडवून आणला. समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा यावर आळा घातला. सण, उत्सव सामूहिकरीत्या शांततेत पार पाडणे सुरू आहे. महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिकांचा सन्मान, विधवा, परित्यक्ता यांना मदत, वृक्षारोपण करण्यात आले. या शिवाय गावाला शांततेच्या मार्गाने गावाचा विकास करण्यावर या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. तंटामुक्त गाव मोहीम सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.