शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 01:57 IST

परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत.

समाजमंदिरात आश्रय : मदतीचा दिलासा देण्याची मागणीकालीमाटी : परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत. अनेक गावात विद्युत खांब आणि डीपी कोसळल्याने संपूर्ण गावे अंधारात असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.कालीमाटी परिसरात व आमगाव तालुक्यात एकूण ४३ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. येथील गावात नागरिकांचे घर कोसळले तर काहीचे छप्पर उडून गेले. सुपलीपार येथे भिंत पडून मृतक राखडे (६०) यांचा मृत्यू झाला. बऱ्याच ठिकाणी घरातील जनावरे दगावल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर चक्रीवादळाच्या दहशतीत अजुनही दिसत आहे. बहुतेक कुटुंबाचे अन्न, वस्त्र ढिगाऱ्याखाली आल्याने एक वेळचे जेवन निश्चित नाही. सध्या दररोज दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान निसर्ग आपला रंग बदलवीताना दिसतो. ५ ते १० मिनट सोसाट्याचा वारा वाहतो. त्यामुळे पुन्हा चक्रीवादळ तर नसेल ना? अशी भीती नागरिकांत दिसून येते. या चक्रीवादळाच्या तळाख्यात मृत्युमुखी पडलेल्या राखडे कुटुंबाला चार लाख रुपये, जनावरांसाठी एकूण रक्कम २७ हजार रुपये, ६७ घरांना २८ लाख ३६ हजार ९०० रुपये व इतर असे ३३ लाख ४६ हजार २०१ रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई करीता तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हा आपत्ती निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती सादर केली.निवाऱ्यासाठी भटकंतीचक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या कालीमाटी येथील रुपचंद गिऱ्हेपुंजे, कृष्णा भांडारकर, हिरामण महारवाडे, लीलाधर गिऱ्हेपुंजे, लिखन टेंभरे, धनलाल रहांगडाले यांच्या घरावरील छत्र उडून गेले तर घनश्याम शेंडे, सोनू कापसे, यादोराव कावळे, माणिकचंद रहांगडाले, धनलाल रहांगडाले, केवल रहांगडाले आणि इतर नागरिकांच्या घराचे व कडधान्याचे नुकसान झाले आहे.गावे अंधारमयघाटटेमनी, कालीमाटी, कट्टीपार, भोषा, मानेकसा व इतर गावांत विद्युत विभागाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहे. गावातील विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाची बरीच हाणी झाली आहे. परिसरातील गावांमध्ये ६०-७० विद्युत खांब कोसळल्यामुळे तसेच विद्युत वाहिणी खंडीत पडल्याने बऱ्याच गावात पाच दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. विद्युत उपकेंद्र कालीमाटी (कट्टीपार) येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी येथे अधिकारी, १२ कर्मचारी आणि इतर सहकारी रोजंदारी कर्मचारी युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करीत असल्याचे दिसून येतात. या चक्रीवादळामुळे नागरिकांना अंधारमय जीवन जगण्यास भाग पाडले आहे.