शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 01:57 IST

परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत.

समाजमंदिरात आश्रय : मदतीचा दिलासा देण्याची मागणीकालीमाटी : परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत. अनेक गावात विद्युत खांब आणि डीपी कोसळल्याने संपूर्ण गावे अंधारात असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.कालीमाटी परिसरात व आमगाव तालुक्यात एकूण ४३ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. येथील गावात नागरिकांचे घर कोसळले तर काहीचे छप्पर उडून गेले. सुपलीपार येथे भिंत पडून मृतक राखडे (६०) यांचा मृत्यू झाला. बऱ्याच ठिकाणी घरातील जनावरे दगावल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर चक्रीवादळाच्या दहशतीत अजुनही दिसत आहे. बहुतेक कुटुंबाचे अन्न, वस्त्र ढिगाऱ्याखाली आल्याने एक वेळचे जेवन निश्चित नाही. सध्या दररोज दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान निसर्ग आपला रंग बदलवीताना दिसतो. ५ ते १० मिनट सोसाट्याचा वारा वाहतो. त्यामुळे पुन्हा चक्रीवादळ तर नसेल ना? अशी भीती नागरिकांत दिसून येते. या चक्रीवादळाच्या तळाख्यात मृत्युमुखी पडलेल्या राखडे कुटुंबाला चार लाख रुपये, जनावरांसाठी एकूण रक्कम २७ हजार रुपये, ६७ घरांना २८ लाख ३६ हजार ९०० रुपये व इतर असे ३३ लाख ४६ हजार २०१ रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई करीता तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हा आपत्ती निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती सादर केली.निवाऱ्यासाठी भटकंतीचक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या कालीमाटी येथील रुपचंद गिऱ्हेपुंजे, कृष्णा भांडारकर, हिरामण महारवाडे, लीलाधर गिऱ्हेपुंजे, लिखन टेंभरे, धनलाल रहांगडाले यांच्या घरावरील छत्र उडून गेले तर घनश्याम शेंडे, सोनू कापसे, यादोराव कावळे, माणिकचंद रहांगडाले, धनलाल रहांगडाले, केवल रहांगडाले आणि इतर नागरिकांच्या घराचे व कडधान्याचे नुकसान झाले आहे.गावे अंधारमयघाटटेमनी, कालीमाटी, कट्टीपार, भोषा, मानेकसा व इतर गावांत विद्युत विभागाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहे. गावातील विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाची बरीच हाणी झाली आहे. परिसरातील गावांमध्ये ६०-७० विद्युत खांब कोसळल्यामुळे तसेच विद्युत वाहिणी खंडीत पडल्याने बऱ्याच गावात पाच दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. विद्युत उपकेंद्र कालीमाटी (कट्टीपार) येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी येथे अधिकारी, १२ कर्मचारी आणि इतर सहकारी रोजंदारी कर्मचारी युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करीत असल्याचे दिसून येतात. या चक्रीवादळामुळे नागरिकांना अंधारमय जीवन जगण्यास भाग पाडले आहे.