शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 01:57 IST

परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत.

समाजमंदिरात आश्रय : मदतीचा दिलासा देण्याची मागणीकालीमाटी : परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत. अनेक गावात विद्युत खांब आणि डीपी कोसळल्याने संपूर्ण गावे अंधारात असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.कालीमाटी परिसरात व आमगाव तालुक्यात एकूण ४३ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. येथील गावात नागरिकांचे घर कोसळले तर काहीचे छप्पर उडून गेले. सुपलीपार येथे भिंत पडून मृतक राखडे (६०) यांचा मृत्यू झाला. बऱ्याच ठिकाणी घरातील जनावरे दगावल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर चक्रीवादळाच्या दहशतीत अजुनही दिसत आहे. बहुतेक कुटुंबाचे अन्न, वस्त्र ढिगाऱ्याखाली आल्याने एक वेळचे जेवन निश्चित नाही. सध्या दररोज दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान निसर्ग आपला रंग बदलवीताना दिसतो. ५ ते १० मिनट सोसाट्याचा वारा वाहतो. त्यामुळे पुन्हा चक्रीवादळ तर नसेल ना? अशी भीती नागरिकांत दिसून येते. या चक्रीवादळाच्या तळाख्यात मृत्युमुखी पडलेल्या राखडे कुटुंबाला चार लाख रुपये, जनावरांसाठी एकूण रक्कम २७ हजार रुपये, ६७ घरांना २८ लाख ३६ हजार ९०० रुपये व इतर असे ३३ लाख ४६ हजार २०१ रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई करीता तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हा आपत्ती निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती सादर केली.निवाऱ्यासाठी भटकंतीचक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या कालीमाटी येथील रुपचंद गिऱ्हेपुंजे, कृष्णा भांडारकर, हिरामण महारवाडे, लीलाधर गिऱ्हेपुंजे, लिखन टेंभरे, धनलाल रहांगडाले यांच्या घरावरील छत्र उडून गेले तर घनश्याम शेंडे, सोनू कापसे, यादोराव कावळे, माणिकचंद रहांगडाले, धनलाल रहांगडाले, केवल रहांगडाले आणि इतर नागरिकांच्या घराचे व कडधान्याचे नुकसान झाले आहे.गावे अंधारमयघाटटेमनी, कालीमाटी, कट्टीपार, भोषा, मानेकसा व इतर गावांत विद्युत विभागाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहे. गावातील विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाची बरीच हाणी झाली आहे. परिसरातील गावांमध्ये ६०-७० विद्युत खांब कोसळल्यामुळे तसेच विद्युत वाहिणी खंडीत पडल्याने बऱ्याच गावात पाच दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. विद्युत उपकेंद्र कालीमाटी (कट्टीपार) येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी येथे अधिकारी, १२ कर्मचारी आणि इतर सहकारी रोजंदारी कर्मचारी युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करीत असल्याचे दिसून येतात. या चक्रीवादळामुळे नागरिकांना अंधारमय जीवन जगण्यास भाग पाडले आहे.