शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार हेक्टर शेती पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:14 IST

आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देरोवणी न झाल्याले शेतजमिनीचे पंचनामे करा : शेतकरी दुष्काळाच्या छायेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ८२ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीेचे नियोजन कृषी विभागाने केले. पण यंदा सुरूवातीपासून पाठशिवणीचा खेळ खेळला. त्यामुळे पेरणी आणि त्यानंतर रोवणीची कामे खोळंबली होती. जुलै महिन्यात थोड्या फार प्रमाणात बसरलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यात पुन्हा विश्रांती घेतल्याने रोवण्यापूर्ण खोळंबल्या. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी थोड्या प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला थोड्या फार प्रमाणात सुरूवात झाली.पण, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अजूनही सुमारे ७० हजार हेक्टर धानाची रोवणीच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. दोन दिवसापूर्वी झालेला पाऊस सर्वदूर झाला असला तरी धानाची खराब झालेली नर्सरी लावण्यास उपयुक्त नाही. पाऊसही कुठे आहे कुठे नाही, अशा परिस्थितीत आता शेतकºयांच्या पडीक जमिनीचे सर्वेक्षण करुन पंचनामे करण्याची मागणी होत आहे.सरासरीच्या केवळ ५२ टक्केच पाऊसआता पावसाची सुरुवात झाली असली तरी तो खंड स्वरुपाचा असून एका ठिकाणी पडला तर दुसºया ठिकाणी पडत नाही. भाताची नर्सरी टाकून अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे रोवणी करुनही काही उपयोग नाही. ३१ आॅगस्टपर्यंत १०६४ मि.मी. पाऊस पडतो. पण यंदा केवळ ७३९ मि.मी. पाऊस झाला. तो सरासरीच्या केवळ ५२ टक्के आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाखांवर खातेदार शेतकरी असून सरकारनी गाजावाजा केलेल्या पिक विमा योजनेत फक्त ६० ते ६५ हजार शेतकºयांनीच भाग घेतला. तीच स्थिती शेतकरी कर्जमाफीची आहे.कृषी विभागाची आकडेवारी धक्कादायकजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत परशुरामकर सर्व प्रथमच कृषी विभागावर चर्चा घडवून आणली. तेव्हा जि.प. कृषी विभागाने जी आकडेवारी सभागृहासमोर ठेवली ती धक्कादायक आहे. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात १७ हजार १३६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात १२ हजार हेक्टर, सडक अर्जुनी ४ हजार हेक्टर, अर्जुनी मोरगाव ५९६ हेक्टर, देवरी १३ हजार २५३ हेक्टर, सालेकसा ३२०० हेक्टर, तिरोडा १४ हजार ७२८ हेक्टर, आमगाव २९३८ हेक्टर अशी सुमारे ७० हजार हेक्टरवर रोवणीच झाली नसल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची कबुली कृषी विभागाने दिली. त्यामुळे रोवणी न झालेल्या शेताचे पंचनामे करुन शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य.