शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार हेक्टर शेती पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:14 IST

आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देरोवणी न झाल्याले शेतजमिनीचे पंचनामे करा : शेतकरी दुष्काळाच्या छायेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ८२ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीेचे नियोजन कृषी विभागाने केले. पण यंदा सुरूवातीपासून पाठशिवणीचा खेळ खेळला. त्यामुळे पेरणी आणि त्यानंतर रोवणीची कामे खोळंबली होती. जुलै महिन्यात थोड्या फार प्रमाणात बसरलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यात पुन्हा विश्रांती घेतल्याने रोवण्यापूर्ण खोळंबल्या. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी थोड्या प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला थोड्या फार प्रमाणात सुरूवात झाली.पण, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अजूनही सुमारे ७० हजार हेक्टर धानाची रोवणीच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. दोन दिवसापूर्वी झालेला पाऊस सर्वदूर झाला असला तरी धानाची खराब झालेली नर्सरी लावण्यास उपयुक्त नाही. पाऊसही कुठे आहे कुठे नाही, अशा परिस्थितीत आता शेतकºयांच्या पडीक जमिनीचे सर्वेक्षण करुन पंचनामे करण्याची मागणी होत आहे.सरासरीच्या केवळ ५२ टक्केच पाऊसआता पावसाची सुरुवात झाली असली तरी तो खंड स्वरुपाचा असून एका ठिकाणी पडला तर दुसºया ठिकाणी पडत नाही. भाताची नर्सरी टाकून अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे रोवणी करुनही काही उपयोग नाही. ३१ आॅगस्टपर्यंत १०६४ मि.मी. पाऊस पडतो. पण यंदा केवळ ७३९ मि.मी. पाऊस झाला. तो सरासरीच्या केवळ ५२ टक्के आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाखांवर खातेदार शेतकरी असून सरकारनी गाजावाजा केलेल्या पिक विमा योजनेत फक्त ६० ते ६५ हजार शेतकºयांनीच भाग घेतला. तीच स्थिती शेतकरी कर्जमाफीची आहे.कृषी विभागाची आकडेवारी धक्कादायकजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत परशुरामकर सर्व प्रथमच कृषी विभागावर चर्चा घडवून आणली. तेव्हा जि.प. कृषी विभागाने जी आकडेवारी सभागृहासमोर ठेवली ती धक्कादायक आहे. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात १७ हजार १३६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात १२ हजार हेक्टर, सडक अर्जुनी ४ हजार हेक्टर, अर्जुनी मोरगाव ५९६ हेक्टर, देवरी १३ हजार २५३ हेक्टर, सालेकसा ३२०० हेक्टर, तिरोडा १४ हजार ७२८ हेक्टर, आमगाव २९३८ हेक्टर अशी सुमारे ७० हजार हेक्टरवर रोवणीच झाली नसल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची कबुली कृषी विभागाने दिली. त्यामुळे रोवणी न झालेल्या शेताचे पंचनामे करुन शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य.