शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

७० हजार हेक्टर शेती पडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:14 IST

आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देरोवणी न झाल्याले शेतजमिनीचे पंचनामे करा : शेतकरी दुष्काळाच्या छायेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे पूर्णपणे कोरडे गेल्याने जिल्ह्यातील रोवणीची कामे पूर्णपणे खोंळबली आहेत. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ८२ हजार हेक्टरवर विविध पिकांच्या लागवडीेचे नियोजन कृषी विभागाने केले. पण यंदा सुरूवातीपासून पाठशिवणीचा खेळ खेळला. त्यामुळे पेरणी आणि त्यानंतर रोवणीची कामे खोळंबली होती. जुलै महिन्यात थोड्या फार प्रमाणात बसरलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यात पुन्हा विश्रांती घेतल्याने रोवण्यापूर्ण खोळंबल्या. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी थोड्या प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला थोड्या फार प्रमाणात सुरूवात झाली.पण, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अजूनही सुमारे ७० हजार हेक्टर धानाची रोवणीच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. दोन दिवसापूर्वी झालेला पाऊस सर्वदूर झाला असला तरी धानाची खराब झालेली नर्सरी लावण्यास उपयुक्त नाही. पाऊसही कुठे आहे कुठे नाही, अशा परिस्थितीत आता शेतकºयांच्या पडीक जमिनीचे सर्वेक्षण करुन पंचनामे करण्याची मागणी होत आहे.सरासरीच्या केवळ ५२ टक्केच पाऊसआता पावसाची सुरुवात झाली असली तरी तो खंड स्वरुपाचा असून एका ठिकाणी पडला तर दुसºया ठिकाणी पडत नाही. भाताची नर्सरी टाकून अडीच महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे रोवणी करुनही काही उपयोग नाही. ३१ आॅगस्टपर्यंत १०६४ मि.मी. पाऊस पडतो. पण यंदा केवळ ७३९ मि.मी. पाऊस झाला. तो सरासरीच्या केवळ ५२ टक्के आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात सुमारे २ लाखांवर खातेदार शेतकरी असून सरकारनी गाजावाजा केलेल्या पिक विमा योजनेत फक्त ६० ते ६५ हजार शेतकºयांनीच भाग घेतला. तीच स्थिती शेतकरी कर्जमाफीची आहे.कृषी विभागाची आकडेवारी धक्कादायकजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत परशुरामकर सर्व प्रथमच कृषी विभागावर चर्चा घडवून आणली. तेव्हा जि.प. कृषी विभागाने जी आकडेवारी सभागृहासमोर ठेवली ती धक्कादायक आहे. जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यात १७ हजार १३६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यात १२ हजार हेक्टर, सडक अर्जुनी ४ हजार हेक्टर, अर्जुनी मोरगाव ५९६ हेक्टर, देवरी १३ हजार २५३ हेक्टर, सालेकसा ३२०० हेक्टर, तिरोडा १४ हजार ७२८ हेक्टर, आमगाव २९३८ हेक्टर अशी सुमारे ७० हजार हेक्टरवर रोवणीच झाली नसल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर अद्यापही रोवणी झाली नसल्याची कबुली कृषी विभागाने दिली. त्यामुळे रोवणी न झालेल्या शेताचे पंचनामे करुन शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जिल्हा परिषद सदस्य.