शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

७ हजार ७७९ घरकुलांना मंजुरी

By admin | Updated: May 24, 2015 01:37 IST

सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. ..

गोंदिया : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. सुरक्षित निवारा असणे ही मानवाची मुलभूत व महत्वपूर्ण गरज आहे. वर्ष २०१४-१५ या वर्षाकरिता इंदिरा आवास योजनेंतर्गत ७ हजार ७७९ कुटुंबांना घरकुलासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ऊन, वारा, थंडी व पावसापासून संरक्षण देणारे हक्काचे घर असावे. हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते व कुटुंबीयांना सुरक्षित जीवन देण्याचे ध्येय असते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटुंबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देणारी इंदिरा आवास योजना शासनाद्वारे राबविण्यात येते. जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण २ लाख ५१ हजार ४८३ कुटुंबे आहेत. यापैकी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची संख्या १ लाख ४४ हजार २४३ एवढी आहे. या कुटुंबांना निवाऱ्याकरिता ग्रामपंचायत निहाय बेघर कुटुंबाची कायम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ५८ हजार १२० कुटुंबाना इंदिरा आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध योजना व मागास भागांसाठी अनुदान निधी योजनेमार्फत १०० टक्के अनुदानावर लाभ देण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्याचे राहणीमान उंचावले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे दारिद्र्यनिर्मुलन करण्यासाठी, गावातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या संस्था उभारण्यासाठी या संस्थेमार्फत गरजुंना वित्तीय संस्था पुरविणे, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा नागरिकांना विकासाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)