शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन वर्षांत ५३ मातांचा मृत्यू

By admin | Updated: July 13, 2015 01:27 IST

जिल्ह्यात केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, गंगाबाई महिला रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत.

समस्या आरोग्याची : दोन महिन्यांत चार मातांचा मृत्यूदेवानंद शहारे गोंदियाजिल्ह्यात केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, गंगाबाई महिला रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयासह एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांचा अभाव म्हणा किंवा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे आरोग्याची समस्या नेहमीच आवासून उभी असते. हेच कारण आहे की, मागील तीन वर्षांत जिल्ह्यात ५३ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. सदर मातामृत्यू आर्थिक वर्ष २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ मधील असून या मृत्यू प्रसूतीपूर्वी, प्रसूतीप्रसंगी व प्रसूतीनंतरच्या आहेत. यास सन २०१२-१३ मध्ये सर्वाधिक म्हणजे एकूण २३ मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात नऊ, गोरेगाव चार, आमगाव एक, सालेकसा तीन, देवरी दोन, सडक-अर्जुनी दोन व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका मातेच्या मृत्यूचा समावेश आहे. सन २०१३-१४ मध्ये एकूण १५ मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात चार, गोरेगाव दोन, आमगाव एक, देवरी चार, सडक-अर्जुनी एक व अर्जुनी-मोरगाव एक व तिरोडा तालुक्यात दोन मातामृत्यूचा समावेश आहे. तर सन २०१४-१५ मध्ये एकूण १२ मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात चार, गोरेगाव तीन, आमगाव एक, सडक-अर्जुनी दोन व तिरोडा तालुक्यात दोन मातामृत्यूंचा समावेश आहे.एवढेच नव्हे तर सन २०१५ च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण चार मातामृत्यू झाल्या आहेत. यात गोंदिया तालुक्यात दोन, तिरोडा एक व सालेकसा तालुक्यातील एका मातेच्या मृत्यूचा समावेश आहे. वर्षभरात ५५० बालमृत्यूंची नोंदआर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्हाभरात ५५० बालमृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली आहे. यापैकी ग्रामीण भागात २६९ तर शहरी भागात २८१ बालमृत्यूचा समावेश आहे. यात ० ते सात दिवस वयोगटातील ग्रामीण भागातील ९१ व शहरी भागातील २३९ बाळांचा समावेश आहे. तर आठ ते २८ दिवस वयोगटातील ग्रामीण भागातील ५१ व शहरी भागातील ३३ बाळांचा समावेश असून एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ग्रामीण भागातील ७० व शहरी भागातील सहा तसेच एक ते सहा वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ५७ व शहरी भागातील तीन बालमृत्यूचा समावेश आहे. एप्रिल व मे महिन्यांत ४८ बालमृत्यूसन २०१५ च्या एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४८ बालमृत्यूचे प्रकरण घडले. एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील एकूण १२ व शहरी भागातील १७ बालमृत्यूचा समावेश आहे. यात ० ते सात दिवस वयोगटातील ग्रामीण पाच व शहरी १४, आठ ते २८ दिवस वयोगटातील ग्रामीण एक व शहरी तीन, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ग्रामीण दोन व एक वर्ष ते सहा वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील चार बालमृत्यूंचा समावेश आहे. तसेच मे महिन्यात एकूण १९ बालमृत्यू घडले. यात शहरी भागात नऊ तर ग्रामीण भागात १० बालमृत्यूचा समावेश आहे. यात ० ते सात दिवस वयोगटातील ग्रामीण दोन व शहरी आठ, आठ ते २८ दिवस वयोगटातील शहरी दोन, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ग्रामीण चार व एक वर्ष ते सहा वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील तीन बालमृत्यूचा समावेश आहे.