शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

मास्क न लावलेल्या ५० जणांना दणका ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:17 IST

तिरोडा : कोरोना पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची ...

तिरोडा : कोरोना पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर जोर दिला जात आहे. स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत निरंतर माहिती पोलीस प्रशासन आठवडी बाजारात देत आहे. परंतु याकडे शहरातील नागरिक डोळेझाक करून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशात आता तिरोडा पोलीस पुन्हा कंबर कसून मैदानात उतरले असून रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मोहीम राबवून ५० जणांना दंड ठोठावला आहे.

कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने जिल्हावासी बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत. शहरातही नागरिक मास्क व लावता फिरत असून ठिकठिकाणी कोरोनाला न घाबरता गर्दी केली जात आहे. हा प्रकार धोकादायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही निर्बंध लावले असून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

याकडे लक्ष देत व शहरातील नागरिकांची बेपर्वाई बघून पोलिसांनी रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मास्क न लावलेल्यांना दणका देण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यामध्ये पोलिसांनी या एका तासात ५० जणांना पकडले असून त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपये नुसार पाच हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, आता गोंदिया शहरातही मास्क न लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली जात असून अवघ्या जिल्ह्यातच कठोरतेने ही मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. अशात आता ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर निघताना मास्क घालूनच घराबाहेर निघावे, शारीरिक अंतराचे पालन करावे व व्यापारी बांधवांनी सुद्धा मास्क घालून प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी कळविले आहे.

------------------------------

पोलीस ठाण्यात बसवून ठेवले

पोलिसांनी या मोहिमेंतर्गत मास्क न लावणाऱ्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले व मैदानात बसवून ठेवले. याप्रसंगी त्यांना मास्क न लावण्यापासून होणारा धोका काय हे समजावून सांगण्यात आले. तसेच एक-एक करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आले. तिरोडा पोलिसांच्या या प्रयोगाने शहरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, तिरोडा तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. अशात नागरिकांनी अधिकच सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.