शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मास्क न लावलेल्या ५० जणांना दणका ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:17 IST

तिरोडा : कोरोना पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची ...

तिरोडा : कोरोना पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर जोर दिला जात आहे. स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत निरंतर माहिती पोलीस प्रशासन आठवडी बाजारात देत आहे. परंतु याकडे शहरातील नागरिक डोळेझाक करून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशात आता तिरोडा पोलीस पुन्हा कंबर कसून मैदानात उतरले असून रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मोहीम राबवून ५० जणांना दंड ठोठावला आहे.

कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने जिल्हावासी बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत. शहरातही नागरिक मास्क व लावता फिरत असून ठिकठिकाणी कोरोनाला न घाबरता गर्दी केली जात आहे. हा प्रकार धोकादायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही निर्बंध लावले असून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

याकडे लक्ष देत व शहरातील नागरिकांची बेपर्वाई बघून पोलिसांनी रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मास्क न लावलेल्यांना दणका देण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यामध्ये पोलिसांनी या एका तासात ५० जणांना पकडले असून त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपये नुसार पाच हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, आता गोंदिया शहरातही मास्क न लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली जात असून अवघ्या जिल्ह्यातच कठोरतेने ही मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. अशात आता ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर निघताना मास्क घालूनच घराबाहेर निघावे, शारीरिक अंतराचे पालन करावे व व्यापारी बांधवांनी सुद्धा मास्क घालून प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी कळविले आहे.

------------------------------

पोलीस ठाण्यात बसवून ठेवले

पोलिसांनी या मोहिमेंतर्गत मास्क न लावणाऱ्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले व मैदानात बसवून ठेवले. याप्रसंगी त्यांना मास्क न लावण्यापासून होणारा धोका काय हे समजावून सांगण्यात आले. तसेच एक-एक करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आले. तिरोडा पोलिसांच्या या प्रयोगाने शहरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, तिरोडा तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. अशात नागरिकांनी अधिकच सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.