शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे ५० बंधारे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:41 IST

आमगाव तालुक्यातील कृषी विभागामार्फत असलेले ५० पेक्षा अधिक बंधारे भग्नावस्थेत असल्यामुळे ओढे, नदी, नाले यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त पैसे कमविण्याच्या नादात कृषी विभाग बोगस बंधाऱ्यांचे बांधकाम करते.

ठळक मुद्देआमगाव तालुक्यातील प्रकार : जलयुक्त शिवार नावापुरतेच

लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : आमगाव तालुक्यातील कृषी विभागामार्फत असलेले ५० पेक्षा अधिक बंधारे भग्नावस्थेत असल्यामुळे ओढे, नदी, नाले यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त पैसे कमविण्याच्या नादात कृषी विभाग बोगस बंधाऱ्यांचे बांधकाम करते. गरज आहे त्या ठिकाणी बंधाºयांचे बांधकाम केले जात नाही. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला कृषी विभागच तिलांजली देत आहे.महाराष्टÑ शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केला. पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहीमेतून जमीनीची पाण्याची पातळी वाढेल या हेतूने वनराई बंधारे बांधावे, नदी, ओढे, नाले यावर बंधाऱ्याची निर्मीती करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. परंतु आमगाव तालुक्याच्या कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियानाला डावलत आहे. तालुक्यात कृषी विभागांर्गत नदी, ओढे, नाले या ठिकाणी सन १९९९ ते २००० मध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची आजघडीला दुरावस्था आहे. ज्यावेळी हे बंधारे तयार करण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच ह्या बंधाºयांची हालत खस्ता झाली. ठिकठिकाणातून हे बंधारे फुटले. बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे बंधारे तयार करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याने ते बंधारे वाहून गेले. त्यामुळे जंगलातून वाहून जाणारे पाणी नाले, ओढ्यातून वाहतांना या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडकविले जाऊ शकते. परंतु १७ वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या बंधाऱ्यांची साधी दुरूस्तीही न झाल्यामुळे हे बंधारे वाहून गेले. परिणामी आता पावसाचे पाणी अडून राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी अपुरे पडते. कधी पूर तर कधी अवर्षण यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत आहे. परंतु अवर्षणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवाराचाही लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.नदी, ओढे, नाले या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात यावे किंवा जून्या बंधाºयांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.म्हणे, फक्त पाचच गावात होईल कामआमगाव तालुक्यात ६८ गावे आहेत. परंतु यापैकी फक्त पाचच गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली. ज्या गावांची निवड या अभियानात करण्यात आली त्याच गावात सिमेंट बंधाºयांचे काम करण्यात येईल. अन्यथा इतर गावांतील शेतकºयांना सिंचनासाठी कसलीही सोय आम्ही करू शकणार नाही असे कृषी अधिकाºयांचे म्हणणे आहे. अंजोरा सर्कल मधील बंधाºयांचे काम करण्यासाठी जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी कृषी विभाग, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयाच्या चकरा मारल्या परंतु त्यांना या बंधाºयासंदर्भात कसलीही मदत मिळाली नाही. हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.या सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी कृषी विभाग व लघु पाटबंधारे विभाग जि. प. कार्यालया आमगाव यांच्या अनेकदा चकरा मारल्या परंतु येथील अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी झटकली. शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणून शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गवगवा करते. परंतु शेतकऱ्यांना गरज असलेल्या ठिकाणी बंधाºयांची निर्मीती किंवा दुरूस्ती होत नसल्याने या अभियानाचा काय उपयोग.-जियालाल पंधरेजि.प.सदस्य अंजोरा क्षेत्र