शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

४४ हजार क्विंटल बियाणे लागणार

By admin | Updated: May 29, 2015 01:20 IST

खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत.

गोंदिया : खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. मात्र सोबतच बियाणे आणि खतांची सोय करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशा विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांवर जाळे टाकणे सुरू केले आहे. आपलेच बियाणे कसे चांगले आहे हे दाखवत विविध कंपन्या शेतकऱ्यांना खुणावत आहेत. मात्र कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता जागरूकपणे कसा निर्णय घ्यावा, याचे मार्गदर्शन कृषी विभागाने देणे सुरू केले आहे.यावर्षी जिल्ह्यात १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने भात हे मुख्य पिक असून ४४ हजार क्विंटल भात बियाणे लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तालुकानिहाय विक्री केंद्रावर ते उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्या अध्यक्षतेत आयोजित करून सर्व संबंधितांना कृषी निविष्ठा साठवणूक आणि विक्रीबाबत योग्य मार्गदर्शन करून निर्देश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत कंपन्यांचे व अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. बियाण्यांच्या नियोजनात गोंदिया तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, तिरोडा तालुक्यात ४ हजार क्विंटल, आमगाव तालुक्यात ४ हजार क्विंटल, गोरेगांव तालुक्यात ३ हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, सालेकसा तालुक्यात २ हजार क्विंटल, देवरी तालुक्यात ३ हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन महाबीजमार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४,००० क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे. आवश्यकतेनुसार पुरवठा होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)