शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

४४ हजार क्विंटल बियाणे लागणार

By admin | Updated: May 29, 2015 01:20 IST

खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत.

गोंदिया : खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. मात्र सोबतच बियाणे आणि खतांची सोय करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशा विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांवर जाळे टाकणे सुरू केले आहे. आपलेच बियाणे कसे चांगले आहे हे दाखवत विविध कंपन्या शेतकऱ्यांना खुणावत आहेत. मात्र कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता जागरूकपणे कसा निर्णय घ्यावा, याचे मार्गदर्शन कृषी विभागाने देणे सुरू केले आहे.यावर्षी जिल्ह्यात १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने भात हे मुख्य पिक असून ४४ हजार क्विंटल भात बियाणे लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तालुकानिहाय विक्री केंद्रावर ते उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्या अध्यक्षतेत आयोजित करून सर्व संबंधितांना कृषी निविष्ठा साठवणूक आणि विक्रीबाबत योग्य मार्गदर्शन करून निर्देश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत कंपन्यांचे व अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. बियाण्यांच्या नियोजनात गोंदिया तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, तिरोडा तालुक्यात ४ हजार क्विंटल, आमगाव तालुक्यात ४ हजार क्विंटल, गोरेगांव तालुक्यात ३ हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, सालेकसा तालुक्यात २ हजार क्विंटल, देवरी तालुक्यात ३ हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन महाबीजमार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४,००० क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे. आवश्यकतेनुसार पुरवठा होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)