शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

४.३५ कोटींचे कृषी साहित्य वाटणार

By admin | Updated: November 29, 2015 02:32 IST

शासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो.

१,१६९ लाभार्थ्यांची निवड : आर्थिक वर्षात पहिल्यांदाच मिळणार योजनांचा लाभदेवानंद शहारे गोंदियाशासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविल्या जात असलेल्या कृषी साहित्य वाटप योजनेतून येत आहे. एप्रिल पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात तीन योजनांसाठी निधीच उपलब्ध नसल्यामुळे रखडलेल्या त्या योजना आता मार्गी लागत आहे. त्यासाठी ४.३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तिन्ही योजनांमध्ये कृषी साहित्यांच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ हजार १६९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध झाले. सदर रक्कम जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या (एससी) एकूण ८९३ शेतकऱ्यांची निवड यात करण्यात आली आहे. यापैकी पहिल्यांदा ५०१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा निवड प्रक्रिया राबवून आणखी ३९२ शेतकऱ्यांना निवडण्यात आले. असे एकूण ८९३ मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी साहित्यांचा लाभ देण्यात येणार आहे.याशिवाय आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी साहित्य देण्यासाठी २०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आदिवासी क्षेत्रांतर्गत सालेकसा व देवरी हे दोन तालुके मोडत असल्याने तेथीलच शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. यात सालेकसा तालुक्यातील ८३ व देवरी तालुक्यातील ११७ अशा एकूण २०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ७६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यांचा समावेश असून गोंदिया तालुक्यातील ९, तिरोडा तालुक्यातील २१ व गोरेगाव तालुक्यातील ४६ अशा एकूण ७६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सदर लाभार्थ्यांची निवड दोन वर्षांसाठी करण्यात येते. यावर्षी निवड झालेल्या सदर लाभार्थ्यांना मार्च २०१६ पर्यंत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना दिवाळीपूर्वीच निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाचे दर करारपत्रक निर्गमित झाले आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेली औजारे व आर्थिक मर्यादा ५० हजार रूपये यानुसार चालू आर्थिक वर्षातच निवड झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.शासनाने मंजूर केलेला निधीशासनाने सदर तिन्ही योजनांसाठी एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये मंजूर केले असून ते जिल्हा परिषदेमार्फत संबंधित पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आले आहेत. यात विशेष घटक योजनेंतर्गत (एससी) अनुसूचित जातीसाठी २.८० कोटी रूपये, आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) लाभार्थ्यांसाठी १.२५ कोटी रूपये व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत ३० लाख रूपयांचे वाटप संबंधित पंचायत समित्यांना करण्यात आले आहे.प्रतिलाभार्थी ५० हजारांचे कृषी साहित्यसध्याच्या चालू आर्थिक वर्षात प्रतिलाभार्थ्यास ५० हजार रूपयांचे कृषी साहित्य देण्यात येणार आहे. या साहित्यांमध्ये बैलजोडी, बैलगाडी, पंप संच, पाईपलाईन, धान उडवणी पंखे, स्प्रे पंप इत्यादी औजारांचा समावेश आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातून पंचायत समित्यांमार्फत कृषी साहित्य खरेदी करून देण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.