शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

४.३५ कोटींचे कृषी साहित्य वाटणार

By admin | Updated: November 29, 2015 02:32 IST

शासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो.

१,१६९ लाभार्थ्यांची निवड : आर्थिक वर्षात पहिल्यांदाच मिळणार योजनांचा लाभदेवानंद शहारे गोंदियाशासन शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना राबविते, मात्र लालफितशाहीत योजना अडकून त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी बराच उशिर लागतो. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविल्या जात असलेल्या कृषी साहित्य वाटप योजनेतून येत आहे. एप्रिल पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात तीन योजनांसाठी निधीच उपलब्ध नसल्यामुळे रखडलेल्या त्या योजना आता मार्गी लागत आहे. त्यासाठी ४.३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तिन्ही योजनांमध्ये कृषी साहित्यांच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ हजार १६९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध झाले. सदर रक्कम जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आली आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या (एससी) एकूण ८९३ शेतकऱ्यांची निवड यात करण्यात आली आहे. यापैकी पहिल्यांदा ५०१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा निवड प्रक्रिया राबवून आणखी ३९२ शेतकऱ्यांना निवडण्यात आले. असे एकूण ८९३ मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी साहित्यांचा लाभ देण्यात येणार आहे.याशिवाय आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी साहित्य देण्यासाठी २०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आदिवासी क्षेत्रांतर्गत सालेकसा व देवरी हे दोन तालुके मोडत असल्याने तेथीलच शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला. यात सालेकसा तालुक्यातील ८३ व देवरी तालुक्यातील ११७ अशा एकूण २०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ७६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यांचा समावेश असून गोंदिया तालुक्यातील ९, तिरोडा तालुक्यातील २१ व गोरेगाव तालुक्यातील ४६ अशा एकूण ७६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सदर लाभार्थ्यांची निवड दोन वर्षांसाठी करण्यात येते. यावर्षी निवड झालेल्या सदर लाभार्थ्यांना मार्च २०१६ पर्यंत लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना दिवाळीपूर्वीच निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाचे दर करारपत्रक निर्गमित झाले आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेली औजारे व आर्थिक मर्यादा ५० हजार रूपये यानुसार चालू आर्थिक वर्षातच निवड झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.शासनाने मंजूर केलेला निधीशासनाने सदर तिन्ही योजनांसाठी एकूण ४ कोटी ३५ लाख रूपये मंजूर केले असून ते जिल्हा परिषदेमार्फत संबंधित पंचायत समित्यांना वाटपही करण्यात आले आहेत. यात विशेष घटक योजनेंतर्गत (एससी) अनुसूचित जातीसाठी २.८० कोटी रूपये, आदिवासी क्षेत्रांतर्गत (टीएससी) लाभार्थ्यांसाठी १.२५ कोटी रूपये व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत ३० लाख रूपयांचे वाटप संबंधित पंचायत समित्यांना करण्यात आले आहे.प्रतिलाभार्थी ५० हजारांचे कृषी साहित्यसध्याच्या चालू आर्थिक वर्षात प्रतिलाभार्थ्यास ५० हजार रूपयांचे कृषी साहित्य देण्यात येणार आहे. या साहित्यांमध्ये बैलजोडी, बैलगाडी, पंप संच, पाईपलाईन, धान उडवणी पंखे, स्प्रे पंप इत्यादी औजारांचा समावेश आहे. त्यासाठी पंचायत समित्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातून पंचायत समित्यांमार्फत कृषी साहित्य खरेदी करून देण्याची कार्यवाही सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.