शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या अफरातफरीची ४०५ प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायती आहेत; परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी गावचा विकास करण्यापेक्षा शासकीय निधी हडपण्याची ...

नरेश रहिले

गोंदिया : जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायती आहेत; परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी गावचा विकास करण्यापेक्षा शासकीय निधी हडपण्याची जणू शर्यतच लावली आहे. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी शासकीय निधीची अफरातफर केल्याची ४०५ प्रकरणे जिल्हा परिषदेकडे आली आहेत. या प्रकरणांवरून ग्रामसेवक गावच्या विकासासाठी की, विकास निधी हडपण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा, गोंदिया हे ८ तालुके आहेत. या आठही तालुक्यांत असलेल्या ग्रामपंचायतची संख्या आजघडीला ५४६ आहे. बांधकामात माेठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार, काम न करताच निधीची उचल, असे विविध प्रकरण गावकरीच चव्हाट्यावर आणतात. यासंदर्भात मागील २-३ वर्षांत जिल्हा परिषदेला ४०५ तक्रारी आल्या आहेत. काही तक्रारींवर सुनावणी सुरू असून, काही प्रलंबित आहेत.

ग्रामपंचायतमधील सर्व माहिती ऑनलाइन झाली, तर ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येईल. ऑनलाइन ग्रामपंचायत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने कोणती कामे केली व कोणती कामे केली नाहीत, याची माहितीच नागरिकांना मिळत नाही. अनेक कामे न करताच बिलाची उचल केली जाते व ते बिंग ऑनलाइनमुळे फुटेल त्यासाठी ग्रामपंचायत ऑनलाइन केली जात नाही. काही ठिकाणी मोबाइल टॉवरच्या अभावामुळे ऑनलाइन करणे शक्य होत नाही; परंतु ही संख्या अत्यंत कमी आहे; परंतु बिंग फुटू नये या धास्तीपोटी ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाइन होत नाही.

...........

खासगी व्यक्तींकडूनही लूट

शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गरिबांनाही लुटण्याचा प्रकार काही ग्रामसेवकांकडून केला जातो. शौचालयाच्या लाभाचे पैसे किंवा घरकुलाचा लाभ देण्यासाठी गोरगरिबांकडून पैशांची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकांच्या जाचाला कंटाळून नागरिकांनी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्वाधीन केले. शासकीय निधीची अफरातफर करूनही पैसे कमविण्याचा हव्यास कमी न झालेल्या अनेक ग्रामसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

...........

ग्रामपंचायत ऑनलाइनपासून दूर

पारदर्शक कारभार जनतेसमोर यावा, यासाठी शासनाने सर्व ग्रामपंचायत ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले. यात प्रत्येक ग्रामपंचायतीने केलेली कामे, जन्म-मृत्यूच्या नोंदी व सर्वच माहिती ऑनलाइन करण्याचे निर्देश आहेत; परंतु जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती ऑनलाइनपासून दूर आहेत. ग्रामपंचायतमार्फत केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असते. त्या कामांची माहिती सरळ जनतेला होईल. यामुळे धास्तावलेले ग्रामसेवक ग्रामपंचायती ऑनलाइन करीत नसल्याची माहिती आहे.