शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या अफरातफरीची ४०५ प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

नरेश रहिले गोंदिया : जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायती आहेत; परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी गावचा विकास करण्यापेक्षा शासकीय निधी हडपण्याची ...

नरेश रहिले

गोंदिया : जिल्ह्यात ५४६ ग्रामपंचायती आहेत; परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी गावचा विकास करण्यापेक्षा शासकीय निधी हडपण्याची जणू शर्यतच लावली आहे. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी शासकीय निधीची अफरातफर केल्याची ४०५ प्रकरणे जिल्हा परिषदेकडे आली आहेत. या प्रकरणांवरून ग्रामसेवक गावच्या विकासासाठी की, विकास निधी हडपण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा, गोंदिया हे ८ तालुके आहेत. या आठही तालुक्यांत असलेल्या ग्रामपंचायतची संख्या आजघडीला ५४६ आहे. बांधकामात माेठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार, काम न करताच निधीची उचल, असे विविध प्रकरण गावकरीच चव्हाट्यावर आणतात. यासंदर्भात मागील २-३ वर्षांत जिल्हा परिषदेला ४०५ तक्रारी आल्या आहेत. काही तक्रारींवर सुनावणी सुरू असून, काही प्रलंबित आहेत.

ग्रामपंचायतमधील सर्व माहिती ऑनलाइन झाली, तर ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येईल. ऑनलाइन ग्रामपंचायत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने कोणती कामे केली व कोणती कामे केली नाहीत, याची माहितीच नागरिकांना मिळत नाही. अनेक कामे न करताच बिलाची उचल केली जाते व ते बिंग ऑनलाइनमुळे फुटेल त्यासाठी ग्रामपंचायत ऑनलाइन केली जात नाही. काही ठिकाणी मोबाइल टॉवरच्या अभावामुळे ऑनलाइन करणे शक्य होत नाही; परंतु ही संख्या अत्यंत कमी आहे; परंतु बिंग फुटू नये या धास्तीपोटी ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाइन होत नाही.

...........

खासगी व्यक्तींकडूनही लूट

शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गरिबांनाही लुटण्याचा प्रकार काही ग्रामसेवकांकडून केला जातो. शौचालयाच्या लाभाचे पैसे किंवा घरकुलाचा लाभ देण्यासाठी गोरगरिबांकडून पैशांची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकांच्या जाचाला कंटाळून नागरिकांनी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्वाधीन केले. शासकीय निधीची अफरातफर करूनही पैसे कमविण्याचा हव्यास कमी न झालेल्या अनेक ग्रामसेवकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

...........

ग्रामपंचायत ऑनलाइनपासून दूर

पारदर्शक कारभार जनतेसमोर यावा, यासाठी शासनाने सर्व ग्रामपंचायत ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले. यात प्रत्येक ग्रामपंचायतीने केलेली कामे, जन्म-मृत्यूच्या नोंदी व सर्वच माहिती ऑनलाइन करण्याचे निर्देश आहेत; परंतु जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती ऑनलाइनपासून दूर आहेत. ग्रामपंचायतमार्फत केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असते. त्या कामांची माहिती सरळ जनतेला होईल. यामुळे धास्तावलेले ग्रामसेवक ग्रामपंचायती ऑनलाइन करीत नसल्याची माहिती आहे.