शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोरोनामुळे टळले अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील ४० विवाह सामुहिक विवाह सोहळे (संग्रहीत छाया)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू ...

गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्या मोठ्या समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन आपापल्या समाजांचे विवाह सोहळे सुरू केले होते. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक विवाह सोहळे आयोजकांनीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी कमीत कमी ४० सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात होते; परंतु कोरोनामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यांना टाळण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यात मोठ-मोठे समाज असून या समाजातील बहुतांश लोक गरीब असल्याने गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच आपल्या मुला-मुलींचे लग्न करा, असे आवाहन करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी या ४० सामूहिक विवाह सोहळ्यातून एक हजार जोडपी विवाह बंधनात अडकतात. त्या एक हजार जोडप्यांच्या विवाहावर खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होते. मागील दोन वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजनच करण्यात आले नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग पाहून आयोजकांनी या विवाह सोहळ्यांचे आयोजन केले नाही. त्यामुळे या दोन वर्षांत लोकांनी कोरोनामुळे अल्पखर्चात कुणाला न बोलविता मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे आटोपले आहेत. लग्नात होणाऱ्या अवाढव्य खर्च कोरोनानेही कमी केला; परंतु सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून मदत मिळते ती मदत मागच्या वर्षीपासून मिळू शकलेली नाही.

.........................

कन्यादान योजनेच्या निधीची मागणी नाहीच

सामूहिक विवाह सोहळ्यात जी जोडपी विवाह बंधनात अडकतात त्या जोडप्यांना महाराष्ट्र शासनानतर्फे कन्यादान योजना म्हणून १० हजार रुपये देत असते. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळे होऊ शकले नाही. परिणामी सामूहिक विवाह सोहळ्यातील वधूला १० हजार रुपये कन्यादान म्हणून देण्यासाठी जो शासन अनुदान देते त्या अनुदानाची मागणी महिला व बालकल्याण विभागाने केलेली नाही.

.....

कोट

मागील पंधरा वर्षांपासून आमच्या सामूहिक विवाह सोहळा समिती साखरीटोलाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आम्ही सामूहिक विवाह सोहळा कोरोना संपेपर्यंत घ्यायचा नाही, हे ठरविले. आमचा समाज मोठा असून सामूहिक विवाह सोहळा आजघडीला आयोजित करणे म्हणजे आपल्याच समाजाचा नुकसान पोहोचविण्यासारखे आहे.

-भुमेश्वर मेंढे, संस्थापक अध्यक्ष, कुणबी सामूहिक विवाह साेहळा समिती साखरीटोला.