शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

कोरोनामुळे टळले अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील ४० विवाह सामुहिक विवाह सोहळे (संग्रहीत छाया)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू ...

गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्या मोठ्या समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन आपापल्या समाजांचे विवाह सोहळे सुरू केले होते. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक विवाह सोहळे आयोजकांनीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी कमीत कमी ४० सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात होते; परंतु कोरोनामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यांना टाळण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यात मोठ-मोठे समाज असून या समाजातील बहुतांश लोक गरीब असल्याने गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच आपल्या मुला-मुलींचे लग्न करा, असे आवाहन करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी या ४० सामूहिक विवाह सोहळ्यातून एक हजार जोडपी विवाह बंधनात अडकतात. त्या एक हजार जोडप्यांच्या विवाहावर खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होते. मागील दोन वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजनच करण्यात आले नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग पाहून आयोजकांनी या विवाह सोहळ्यांचे आयोजन केले नाही. त्यामुळे या दोन वर्षांत लोकांनी कोरोनामुळे अल्पखर्चात कुणाला न बोलविता मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे आटोपले आहेत. लग्नात होणाऱ्या अवाढव्य खर्च कोरोनानेही कमी केला; परंतु सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून मदत मिळते ती मदत मागच्या वर्षीपासून मिळू शकलेली नाही.

.........................

कन्यादान योजनेच्या निधीची मागणी नाहीच

सामूहिक विवाह सोहळ्यात जी जोडपी विवाह बंधनात अडकतात त्या जोडप्यांना महाराष्ट्र शासनानतर्फे कन्यादान योजना म्हणून १० हजार रुपये देत असते. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळे होऊ शकले नाही. परिणामी सामूहिक विवाह सोहळ्यातील वधूला १० हजार रुपये कन्यादान म्हणून देण्यासाठी जो शासन अनुदान देते त्या अनुदानाची मागणी महिला व बालकल्याण विभागाने केलेली नाही.

.....

कोट

मागील पंधरा वर्षांपासून आमच्या सामूहिक विवाह सोहळा समिती साखरीटोलाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आम्ही सामूहिक विवाह सोहळा कोरोना संपेपर्यंत घ्यायचा नाही, हे ठरविले. आमचा समाज मोठा असून सामूहिक विवाह सोहळा आजघडीला आयोजित करणे म्हणजे आपल्याच समाजाचा नुकसान पोहोचविण्यासारखे आहे.

-भुमेश्वर मेंढे, संस्थापक अध्यक्ष, कुणबी सामूहिक विवाह साेहळा समिती साखरीटोला.