शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
4
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
6
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
7
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
8
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
9
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
10
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
11
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
12
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
13
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
14
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
15
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
16
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे टळले अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील ४० विवाह सामुहिक विवाह सोहळे (संग्रहीत छाया)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू ...

गोंदिया : गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात व्हावीत यासाठी अनेक समाजांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्या मोठ्या समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन आपापल्या समाजांचे विवाह सोहळे सुरू केले होते. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यातील सामूहिक विवाह सोहळे आयोजकांनीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी कमीत कमी ४० सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात होते; परंतु कोरोनामुळे या सामूहिक विवाह सोहळ्यांना टाळण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यात मोठ-मोठे समाज असून या समाजातील बहुतांश लोक गरीब असल्याने गोरगरिबांचे लग्न कमी खर्चात करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच आपल्या मुला-मुलींचे लग्न करा, असे आवाहन करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी या ४० सामूहिक विवाह सोहळ्यातून एक हजार जोडपी विवाह बंधनात अडकतात. त्या एक हजार जोडप्यांच्या विवाहावर खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होते. मागील दोन वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजनच करण्यात आले नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग पाहून आयोजकांनी या विवाह सोहळ्यांचे आयोजन केले नाही. त्यामुळे या दोन वर्षांत लोकांनी कोरोनामुळे अल्पखर्चात कुणाला न बोलविता मोजक्याच लोकांच्या उपस्थित विवाह सोहळे आटोपले आहेत. लग्नात होणाऱ्या अवाढव्य खर्च कोरोनानेही कमी केला; परंतु सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना समाजकल्याण विभागाकडून मदत मिळते ती मदत मागच्या वर्षीपासून मिळू शकलेली नाही.

.........................

कन्यादान योजनेच्या निधीची मागणी नाहीच

सामूहिक विवाह सोहळ्यात जी जोडपी विवाह बंधनात अडकतात त्या जोडप्यांना महाराष्ट्र शासनानतर्फे कन्यादान योजना म्हणून १० हजार रुपये देत असते. परंतु मागील वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळे होऊ शकले नाही. परिणामी सामूहिक विवाह सोहळ्यातील वधूला १० हजार रुपये कन्यादान म्हणून देण्यासाठी जो शासन अनुदान देते त्या अनुदानाची मागणी महिला व बालकल्याण विभागाने केलेली नाही.

.....

कोट

मागील पंधरा वर्षांपासून आमच्या सामूहिक विवाह सोहळा समिती साखरीटोलाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आम्ही सामूहिक विवाह सोहळा कोरोना संपेपर्यंत घ्यायचा नाही, हे ठरविले. आमचा समाज मोठा असून सामूहिक विवाह सोहळा आजघडीला आयोजित करणे म्हणजे आपल्याच समाजाचा नुकसान पोहोचविण्यासारखे आहे.

-भुमेश्वर मेंढे, संस्थापक अध्यक्ष, कुणबी सामूहिक विवाह साेहळा समिती साखरीटोला.