शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:32 IST

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे.

ठळक मुद्दे‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान अपयशी : मागील वर्षीच्या तुलनेत अर्भक व बाल मृत्यूदरात वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे. बालमृत्यूच्या आकडेवारीने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले ‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये नवजात व बालमृत्यू ३३८ होते. सन २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी ३९१ च्या घरात गेली. गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यू दर राज्याच्या बालमृत्यू दरापेक्षा कमी असला तरी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव व सालेकसा तालुक्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तिरोडा व सडक-अर्जुनी या तालुक्यातील आकडेवारी स्थिर आहेत. आमगाव, देवरी व अर्जुनी-मोरगाव मधील आकडेवारी कमी आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १६ हजार ६०७ प्रसूती झाल्या. यात १६ हजार ४९० सुदृढ बालके जन्माला आली. नवजात मृत्यू दर २०.५० टक्के होता. तर सन २०१७-१८ या वर्षात १७ हजार ९०० प्रसूती झाल्या. यात १७ हजार ६१६ सुदृढ बालकांनी जन्म घेतला. या वर्षातील बाल मृत्यूदर २२.२० आहे. ग्रामीण भागातील बालमृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. परंतु बालमृत्यू प्रकरणात शहरी भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे. जन्माला आल्यापासून वर्षभराच्या आतील बालकांचा मृत्यूदर मागच्या वर्षी कमी होता.त्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये ५२२, सन २०१४-१५ मध्ये ४८५, सन २०१५-१६ मध्ये ३२० बालकांचा मृत्यू झाला.सन २०१६-१७ मध्ये ३३८ तर सन २०१७-१८ मध्ये ३९१ बालकांचा मृत्यू झाला आहे.शहरात ५८.३१ टक्के बालमृत्यूजिल्ह्याच्या शहरी भागात सन २०१६-१७ मध्ये ५७.३९ टक्के तर सन २०१७-१८ मध्ये ५८.३१ टक्के नवजात व बालकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ५० टक्क्याच्या जवळील बालमृत्यू एस्फेक्सिया, सेप्सिस, निमोनिया व कमी वजनामुळे होतात. तर नवजात बालकांचा इतर आजारानेही मृत्यू होतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल