शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:32 IST

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे.

ठळक मुद्दे‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान अपयशी : मागील वर्षीच्या तुलनेत अर्भक व बाल मृत्यूदरात वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे. बालमृत्यूच्या आकडेवारीने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले ‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये नवजात व बालमृत्यू ३३८ होते. सन २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी ३९१ च्या घरात गेली. गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यू दर राज्याच्या बालमृत्यू दरापेक्षा कमी असला तरी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव व सालेकसा तालुक्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तिरोडा व सडक-अर्जुनी या तालुक्यातील आकडेवारी स्थिर आहेत. आमगाव, देवरी व अर्जुनी-मोरगाव मधील आकडेवारी कमी आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १६ हजार ६०७ प्रसूती झाल्या. यात १६ हजार ४९० सुदृढ बालके जन्माला आली. नवजात मृत्यू दर २०.५० टक्के होता. तर सन २०१७-१८ या वर्षात १७ हजार ९०० प्रसूती झाल्या. यात १७ हजार ६१६ सुदृढ बालकांनी जन्म घेतला. या वर्षातील बाल मृत्यूदर २२.२० आहे. ग्रामीण भागातील बालमृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. परंतु बालमृत्यू प्रकरणात शहरी भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे. जन्माला आल्यापासून वर्षभराच्या आतील बालकांचा मृत्यूदर मागच्या वर्षी कमी होता.त्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये ५२२, सन २०१४-१५ मध्ये ४८५, सन २०१५-१६ मध्ये ३२० बालकांचा मृत्यू झाला.सन २०१६-१७ मध्ये ३३८ तर सन २०१७-१८ मध्ये ३९१ बालकांचा मृत्यू झाला आहे.शहरात ५८.३१ टक्के बालमृत्यूजिल्ह्याच्या शहरी भागात सन २०१६-१७ मध्ये ५७.३९ टक्के तर सन २०१७-१८ मध्ये ५८.३१ टक्के नवजात व बालकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ५० टक्क्याच्या जवळील बालमृत्यू एस्फेक्सिया, सेप्सिस, निमोनिया व कमी वजनामुळे होतात. तर नवजात बालकांचा इतर आजारानेही मृत्यू होतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल