शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ३९१ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:32 IST

आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे.

ठळक मुद्दे‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान अपयशी : मागील वर्षीच्या तुलनेत अर्भक व बाल मृत्यूदरात वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल गोंदिया जिल्ह्यात बाल मृत्यू घटल्यानंतर आता त्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ३३८ बालकांचा मृत्यू झाला होता. २०१७-१८ या वर्षात हा आकडा ३९१ वर गेला आहे. बालमृत्यूच्या आकडेवारीने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले ‘शून्य माता-बाल मृत्यू’ अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये नवजात व बालमृत्यू ३३८ होते. सन २०१७-१८ मध्ये ही आकडेवारी ३९१ च्या घरात गेली. गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यू दर राज्याच्या बालमृत्यू दरापेक्षा कमी असला तरी ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव व सालेकसा तालुक्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तिरोडा व सडक-अर्जुनी या तालुक्यातील आकडेवारी स्थिर आहेत. आमगाव, देवरी व अर्जुनी-मोरगाव मधील आकडेवारी कमी आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये १६ हजार ६०७ प्रसूती झाल्या. यात १६ हजार ४९० सुदृढ बालके जन्माला आली. नवजात मृत्यू दर २०.५० टक्के होता. तर सन २०१७-१८ या वर्षात १७ हजार ९०० प्रसूती झाल्या. यात १७ हजार ६१६ सुदृढ बालकांनी जन्म घेतला. या वर्षातील बाल मृत्यूदर २२.२० आहे. ग्रामीण भागातील बालमृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. परंतु बालमृत्यू प्रकरणात शहरी भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे. जन्माला आल्यापासून वर्षभराच्या आतील बालकांचा मृत्यूदर मागच्या वर्षी कमी होता.त्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये ५२२, सन २०१४-१५ मध्ये ४८५, सन २०१५-१६ मध्ये ३२० बालकांचा मृत्यू झाला.सन २०१६-१७ मध्ये ३३८ तर सन २०१७-१८ मध्ये ३९१ बालकांचा मृत्यू झाला आहे.शहरात ५८.३१ टक्के बालमृत्यूजिल्ह्याच्या शहरी भागात सन २०१६-१७ मध्ये ५७.३९ टक्के तर सन २०१७-१८ मध्ये ५८.३१ टक्के नवजात व बालकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ५० टक्क्याच्या जवळील बालमृत्यू एस्फेक्सिया, सेप्सिस, निमोनिया व कमी वजनामुळे होतात. तर नवजात बालकांचा इतर आजारानेही मृत्यू होतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल