शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

दोन वर्षांत ३९ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Updated: March 14, 2015 01:24 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

राजेश मुनिश्वर सडक-अर्जुनीसडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर सहा वन्य प्राण्यांनाही आपल्या जीवास मुकावे लागले. गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मोकळा करण्यात आला. पण वन विभागाच्या कठिण नियमांमुळे डुग्गीपार ते देवपायली, डोंगरगाव/डेपो ते मासुलकसा, कोहमारा ते पांढरवाणी/रे. या मार्गांवर नागरिकांना व वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला. सन २०१३ या वर्षात ४४ अपघातात २१ नागरिकांचा जीव गेला. तर तीन वन्य प्राण्यांचादेखील मृत्यू झाला. सन २०१४ या आर्थिक वर्षात ३५ अपघातांच्या घटनांत चार नागरिकांना जीव गमवावा लागला तर तीन वन्य प्राण्यांना बळी गेला. यात निलगाय, सांबर, लांडग्या, रानडुक्कर, हरीण व अजगर सापसुद्धा ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहणांना धडक देऊन त्या सहाही वन्यप्राण्यांचा जीव जागीच गेल्याची नोंद वनविभाग सडक-अर्जुनी यांच्याकडे आहे. तर राष्ट्रीय महामार्गावर ७९ विविध अपघातात ३९ प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव गमवावा लागला. या मार्गावर जंगल भागात रुंदीकरणाची कामे झालीच नाही. त्यामुळे महामार्गावर जागो-जागी खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याचे प्रयत्नात सदर अपघात झाल्याची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून महामार्गाची समस्या सोडविण्याची गरज आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे रात्रीच्या वेळी वाहणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे वन्य प्राणी दिपतात. त्यामुळे या वन्यप्राण्यांचे अपघात होवून जीव जाते. डुग्गीपार ते देवपायली या मार्गातील शशीकरण पहाडीच्या नागमोळी वळणाचा रस्ता अरूंद असल्यामुळे नेहमीच अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गावर धावणारे वाहन हे अधिक गतीने धावत असल्याने लहान वाहन चालकांची कोंडी होवून अपघात होतात. हा राष्ट्रीय मार्ग अजून किती जीव घेणार! ही गंभीर समस्या आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून नवेगावबांध अभयारण्य आहे. यात असणारे वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने येताना दिसतात. अशावेळी वाहनासमोर येवून महामार्गावर जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय अभयारण्यात वन्य प्राण्यांना हवे त्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे हे प्राणी गाव परिसराकडे धाव घेताना दिसत आहेत. यासाठी वन्यजीव विभागाने पिण्याचे पाण्याचे नवीन स्त्रोत तयार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल तयार करण्याचीही नितांत गरज आहे. अन्यथा येणाऱ्या उन्हाळ्याचे दिवसात त्या वन्यप्राण्यांना अधिक धोका उद्भवण्याचे चित्र दिसत आहे.