शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

दोन वर्षांत ३९ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Updated: March 14, 2015 01:24 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

राजेश मुनिश्वर सडक-अर्जुनीसडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर सहा वन्य प्राण्यांनाही आपल्या जीवास मुकावे लागले. गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मोकळा करण्यात आला. पण वन विभागाच्या कठिण नियमांमुळे डुग्गीपार ते देवपायली, डोंगरगाव/डेपो ते मासुलकसा, कोहमारा ते पांढरवाणी/रे. या मार्गांवर नागरिकांना व वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला. सन २०१३ या वर्षात ४४ अपघातात २१ नागरिकांचा जीव गेला. तर तीन वन्य प्राण्यांचादेखील मृत्यू झाला. सन २०१४ या आर्थिक वर्षात ३५ अपघातांच्या घटनांत चार नागरिकांना जीव गमवावा लागला तर तीन वन्य प्राण्यांना बळी गेला. यात निलगाय, सांबर, लांडग्या, रानडुक्कर, हरीण व अजगर सापसुद्धा ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहणांना धडक देऊन त्या सहाही वन्यप्राण्यांचा जीव जागीच गेल्याची नोंद वनविभाग सडक-अर्जुनी यांच्याकडे आहे. तर राष्ट्रीय महामार्गावर ७९ विविध अपघातात ३९ प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव गमवावा लागला. या मार्गावर जंगल भागात रुंदीकरणाची कामे झालीच नाही. त्यामुळे महामार्गावर जागो-जागी खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याचे प्रयत्नात सदर अपघात झाल्याची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून महामार्गाची समस्या सोडविण्याची गरज आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे रात्रीच्या वेळी वाहणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे वन्य प्राणी दिपतात. त्यामुळे या वन्यप्राण्यांचे अपघात होवून जीव जाते. डुग्गीपार ते देवपायली या मार्गातील शशीकरण पहाडीच्या नागमोळी वळणाचा रस्ता अरूंद असल्यामुळे नेहमीच अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गावर धावणारे वाहन हे अधिक गतीने धावत असल्याने लहान वाहन चालकांची कोंडी होवून अपघात होतात. हा राष्ट्रीय मार्ग अजून किती जीव घेणार! ही गंभीर समस्या आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून नवेगावबांध अभयारण्य आहे. यात असणारे वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने येताना दिसतात. अशावेळी वाहनासमोर येवून महामार्गावर जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय अभयारण्यात वन्य प्राण्यांना हवे त्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे हे प्राणी गाव परिसराकडे धाव घेताना दिसत आहेत. यासाठी वन्यजीव विभागाने पिण्याचे पाण्याचे नवीन स्त्रोत तयार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल तयार करण्याचीही नितांत गरज आहे. अन्यथा येणाऱ्या उन्हाळ्याचे दिवसात त्या वन्यप्राण्यांना अधिक धोका उद्भवण्याचे चित्र दिसत आहे.