शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत ३९ प्रवाशांचा मृत्यू

By admin | Updated: March 14, 2015 01:24 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

राजेश मुनिश्वर सडक-अर्जुनीसडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर सहा वन्य प्राण्यांनाही आपल्या जीवास मुकावे लागले. गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मोकळा करण्यात आला. पण वन विभागाच्या कठिण नियमांमुळे डुग्गीपार ते देवपायली, डोंगरगाव/डेपो ते मासुलकसा, कोहमारा ते पांढरवाणी/रे. या मार्गांवर नागरिकांना व वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला. सन २०१३ या वर्षात ४४ अपघातात २१ नागरिकांचा जीव गेला. तर तीन वन्य प्राण्यांचादेखील मृत्यू झाला. सन २०१४ या आर्थिक वर्षात ३५ अपघातांच्या घटनांत चार नागरिकांना जीव गमवावा लागला तर तीन वन्य प्राण्यांना बळी गेला. यात निलगाय, सांबर, लांडग्या, रानडुक्कर, हरीण व अजगर सापसुद्धा ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहणांना धडक देऊन त्या सहाही वन्यप्राण्यांचा जीव जागीच गेल्याची नोंद वनविभाग सडक-अर्जुनी यांच्याकडे आहे. तर राष्ट्रीय महामार्गावर ७९ विविध अपघातात ३९ प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव गमवावा लागला. या मार्गावर जंगल भागात रुंदीकरणाची कामे झालीच नाही. त्यामुळे महामार्गावर जागो-जागी खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याचे प्रयत्नात सदर अपघात झाल्याची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून महामार्गाची समस्या सोडविण्याची गरज आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे रात्रीच्या वेळी वाहणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे वन्य प्राणी दिपतात. त्यामुळे या वन्यप्राण्यांचे अपघात होवून जीव जाते. डुग्गीपार ते देवपायली या मार्गातील शशीकरण पहाडीच्या नागमोळी वळणाचा रस्ता अरूंद असल्यामुळे नेहमीच अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गावर धावणारे वाहन हे अधिक गतीने धावत असल्याने लहान वाहन चालकांची कोंडी होवून अपघात होतात. हा राष्ट्रीय मार्ग अजून किती जीव घेणार! ही गंभीर समस्या आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून नवेगावबांध अभयारण्य आहे. यात असणारे वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने येताना दिसतात. अशावेळी वाहनासमोर येवून महामार्गावर जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय अभयारण्यात वन्य प्राण्यांना हवे त्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे हे प्राणी गाव परिसराकडे धाव घेताना दिसत आहेत. यासाठी वन्यजीव विभागाने पिण्याचे पाण्याचे नवीन स्त्रोत तयार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल तयार करण्याचीही नितांत गरज आहे. अन्यथा येणाऱ्या उन्हाळ्याचे दिवसात त्या वन्यप्राण्यांना अधिक धोका उद्भवण्याचे चित्र दिसत आहे.