शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नगरपंचायतकडे पाणीपुरवठ्याचे ३७ लाख रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST

अर्जुनी मोरगाव : नगरपंचायत प्रशासनाकडे सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे पाणीपुरवठ्याचे ३७ लाख रुपये थकीत आहेत. गेल्या सहा ...

अर्जुनी मोरगाव : नगरपंचायत प्रशासनाकडे सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे पाणीपुरवठ्याचे ३७ लाख रुपये थकीत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून नगरपंचायतने भरणाच केला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. नगरपंचायतच्या निद्रावस्थेमुळे शहरात जलसंकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे जलसंकट निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अर्जुनी मोरगाव शहरात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्तीचे काम सुजल सेवा समितीला देण्यात आले आहे. २०१५ मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आली. तरीसुद्धा सुजल समितीमार्फतच शहरात पाणीपुरवठा सुरू होता. २०१९ मध्ये शहरातील पाणीपुरवठा योजना नगरपंचायतला हस्तांतरित करण्यात आली.

योजना हस्तांतरणानंतर ग्राहकांकडून नळ योजनेच्या पाणीपुरवठ्याची वसुली नगरपंचायतच करीत आहे. मात्र नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून सुजल समितीला त्यांनी एक पैसाही दिला नाही. समिती वारंवार पैशाची मागणी करत आहे. एप्रिल महिन्याअखेर ३७ लाख ७८ हजार २३५ रुपये थकीत आहेत. थकीत राशी द्या अन्यथा १ एप्रिलपासून पाणीपुरवठा बंद करण्याचे समितीने नगरपंचायतला लेखी पत्र दिले होते. यावर नगरपंचायतने समितीला ३१ मार्च रोजी पत्र देऊन दोन महिन्यांची मुदत मागितली आहे. अद्याप हा तिढा सुटला नाही. ३१ मे रोजी ही मुदत संपत असल्याने पाणीपुरवठा बंद होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

.......

नगरपंचायतला अपयश

नगरपंचायतला ही योजना हस्तांतरित होऊन दोन वर्षे होत आहेत. मात्र पाणीपुरवठा या विषयाकडे कधीच गांभीर्याने बघितले गेले नाही. गेल्या दोन वर्षांत नळ योजनेचा विस्तार करण्याचा नगरपंचायतला विसरच पडला. एक तर शहरात जेमतेम कनेक्शन आहेत. एवढ्या कमी कनेक्शनमध्ये योजना चालविणे तारेवरची कसरत आहे. जेथे सुरळीत पाणीपुरवठा होत होता त्या सिव्हिल लाइनच्या गल्ली नं. ३ मध्ये काही भागात पाणीच पोहोचत नाही. रहिवासी वर्षभरापासून तक्रारी करत आहेत. मुख्याधिकाऱ्यांना सवडच मिळत नाही. आता या परिसरातील विहिरी आटत आहेत. नळ योजनेचेही पाणी मिळत नाही. एकीकडे कोरोनाचे तर दुसरीकडे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी दाद मागायची कुणीकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.