शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

तालुक्यातील ३४ हजार मजुरांना कामाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त मागासलेल्या सालेकसा तालुक्यात सद्यस्थितीत रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले असून, तालुक्यातील ...

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त मागासलेल्या सालेकसा तालुक्यात सद्यस्थितीत रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले असून, तालुक्यातील ३४ हजार मजूर कामाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. सरकार आणि लोकप्रतिनिधी दोघेही कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे.

सालेकसा तालुक्याची लोकसंख्या ९६ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. यापैकी ७० हजाराच्यावर लोक केवळ दुसऱ्याकडे किंवा शासनाकडून निर्मित कामावर आश्रित आहेत. त्यातही ३५ हजार मजूर कमावते व मजुरी करण्यास सक्षम आहेत; परंतु आजघडीला कमावते महिला आणि पुरुष मजूर कामाअभावी बेकार आहेत. मनरेगा अंतर्गत सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ३८ हजार मजुरांकडे जाबकार्ड असून त्यांना कामाची गरज आहे. पावसाळ्यानंतर पाच महिने लोटले तरी तालुक्यात आतापर्यंत केवळ ३५ ग्रामपंचायतींमध्ये जेमतेम ५६० ठिकाणी छोटी छोटी कामे सुरु आहेत. सहा ग्रामपंचायतीमध्ये तर आतापर्यंत एक रुपयाचेही काम सुरू झालेले नाही. अशात त्या ग्रामपंचायतींच्या कोणत्याच मजुराच्या हाताला काम मिळाला नाही. सालेकसा तालुक्यात एक ही असा प्रकल्प नाही की तेथे जाऊन काही कुशल किंवा अकुशल कामगार आपल्या क्षमतेनुसार काम प्राप्त करू शकतील. निवडून येण्यापूर्वी राजकारणी लोक बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या जोराजोराने उचलून धरतात व निवडून आल्यावर रोजगारांची संधी उपलब्ध करून देऊन याची हमखास हमी देतात; परंतु एकदा निवडून आले की, त्यांनी बोललेले सगळे विसरुन जातात. परिणामी, तालुक्यातील मजूर वर्ग किंवा सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरी किंवा कामासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

........

मजुरांवर आर्थिक संकट

अनेक मजुरांना बिकट आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील एकूण ३८ हजार जाॅबकार्डधारक मजुरांपैकी आतापर्यंत केवळ चार हजार ४५ मजुरांना काही काळासाठी काम मिळालेले आहे. तर ३३ हजार ९५५ मजुरांना कसलेही काम मिळाले नाही. यात महिला मजुरांना आजघडीला कामाची नितांत गरज आहे; परंतु कामाअभावी वाट बघण्याशिवाय त्यांना पर्याय नाही.

...........

शहराकडील स्थलांतरण थांबले अन्‌ बेरोजगारी वाढली

दरवर्षी पावसाळ्यानंतर ग्रामीण भागातील मजूर मोठ्या प्रमणावर कामाच्या शोधात शहराकडे जात होते, त्यामुळे गावात रोजगाराची समस्या कमी होती; परंतु कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कंपन्या, कारखाने व उद्योग समूह अजूनही व्यवस्थित सुरू झाले नाही. जे सुरू झाले तेथे मोजक्या लोकांना काम दिले जात आहे. शहरातील रोजगाराची संधी घटल्याने मजुराचे शहराकडील स्थलांतरण थांबले आहे.

......

आत्मनिर्भर भारत योजना कोसोदूर

लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील लोकांना आपल्या गावात किंवा परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आत्मनिर्भर भारत संकल्पना व योजना सुरू केली; परंतु या मागासलेल्या तालुक्यात ही संकल्पना अजूनही कोसोदूरच आहे. स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे कसलेही प्रयत्न आतापर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात आले नाही.