शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

तालुक्यातील ३४ हजार मजुरांना कामाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:55 IST

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त मागासलेल्या सालेकसा तालुक्यात सद्यस्थितीत रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले असून, तालुक्यातील ...

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त मागासलेल्या सालेकसा तालुक्यात सद्यस्थितीत रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले असून, तालुक्यातील ३४ हजार मजूर कामाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. सरकार आणि लोकप्रतिनिधी दोघेही कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे.

सालेकसा तालुक्याची लोकसंख्या ९६ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. यापैकी ७० हजाराच्यावर लोक केवळ दुसऱ्याकडे किंवा शासनाकडून निर्मित कामावर आश्रित आहेत. त्यातही ३५ हजार मजूर कमावते व मजुरी करण्यास सक्षम आहेत; परंतु आजघडीला कमावते महिला आणि पुरुष मजूर कामाअभावी बेकार आहेत. मनरेगा अंतर्गत सालेकसा तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ३८ हजार मजुरांकडे जाबकार्ड असून त्यांना कामाची गरज आहे. पावसाळ्यानंतर पाच महिने लोटले तरी तालुक्यात आतापर्यंत केवळ ३५ ग्रामपंचायतींमध्ये जेमतेम ५६० ठिकाणी छोटी छोटी कामे सुरु आहेत. सहा ग्रामपंचायतीमध्ये तर आतापर्यंत एक रुपयाचेही काम सुरू झालेले नाही. अशात त्या ग्रामपंचायतींच्या कोणत्याच मजुराच्या हाताला काम मिळाला नाही. सालेकसा तालुक्यात एक ही असा प्रकल्प नाही की तेथे जाऊन काही कुशल किंवा अकुशल कामगार आपल्या क्षमतेनुसार काम प्राप्त करू शकतील. निवडून येण्यापूर्वी राजकारणी लोक बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या जोराजोराने उचलून धरतात व निवडून आल्यावर रोजगारांची संधी उपलब्ध करून देऊन याची हमखास हमी देतात; परंतु एकदा निवडून आले की, त्यांनी बोललेले सगळे विसरुन जातात. परिणामी, तालुक्यातील मजूर वर्ग किंवा सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरी किंवा कामासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

........

मजुरांवर आर्थिक संकट

अनेक मजुरांना बिकट आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील एकूण ३८ हजार जाॅबकार्डधारक मजुरांपैकी आतापर्यंत केवळ चार हजार ४५ मजुरांना काही काळासाठी काम मिळालेले आहे. तर ३३ हजार ९५५ मजुरांना कसलेही काम मिळाले नाही. यात महिला मजुरांना आजघडीला कामाची नितांत गरज आहे; परंतु कामाअभावी वाट बघण्याशिवाय त्यांना पर्याय नाही.

...........

शहराकडील स्थलांतरण थांबले अन्‌ बेरोजगारी वाढली

दरवर्षी पावसाळ्यानंतर ग्रामीण भागातील मजूर मोठ्या प्रमणावर कामाच्या शोधात शहराकडे जात होते, त्यामुळे गावात रोजगाराची समस्या कमी होती; परंतु कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कंपन्या, कारखाने व उद्योग समूह अजूनही व्यवस्थित सुरू झाले नाही. जे सुरू झाले तेथे मोजक्या लोकांना काम दिले जात आहे. शहरातील रोजगाराची संधी घटल्याने मजुराचे शहराकडील स्थलांतरण थांबले आहे.

......

आत्मनिर्भर भारत योजना कोसोदूर

लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील लोकांना आपल्या गावात किंवा परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आत्मनिर्भर भारत संकल्पना व योजना सुरू केली; परंतु या मागासलेल्या तालुक्यात ही संकल्पना अजूनही कोसोदूरच आहे. स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे कसलेही प्रयत्न आतापर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात आले नाही.