शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

३३ महसूल मंडळात होणार हवामान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 01:24 IST

जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला

आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त : १२ किमीपर्यंत मिळणार अचूक हवामानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापनासदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.कारंजा येथील कृषी चिकित्सालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचिलत हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी सदर माहिती देण्यात आली.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, आत्माचे उपसंचालक सराफ, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांची उपस्थिती होती. हवामानाची अचूक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान, या नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी हे स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सोबतच अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती वेळीच उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. या हवामान केंद्रामुळे १२ किलोमीटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर १० मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येणार आहे. जमा झालेली हवामान विषयक माहिती, पीक विमा योजना, पीक विषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन व इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. आता जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला व नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना उपलब्ध होईल. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.