शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

३३ महसूल मंडळात होणार हवामान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 01:24 IST

जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला

आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त : १२ किमीपर्यंत मिळणार अचूक हवामानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापनासदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.कारंजा येथील कृषी चिकित्सालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचिलत हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी सदर माहिती देण्यात आली.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, आत्माचे उपसंचालक सराफ, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांची उपस्थिती होती. हवामानाची अचूक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान, या नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी हे स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सोबतच अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती वेळीच उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. या हवामान केंद्रामुळे १२ किलोमीटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर १० मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येणार आहे. जमा झालेली हवामान विषयक माहिती, पीक विमा योजना, पीक विषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन व इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. आता जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला व नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना उपलब्ध होईल. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.