शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

३० प्रतिष्ठानांना नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 01:11 IST

सात जणांचा जीव घेणाऱ्या व जिल्ह्यासाठी कलंक ठरलेल्या बिंदल कॉम्प्लेक्सचे अग्निकांड आजही अंगावर शहारे उभे करते.

फायर आॅडिट होणार : बिंदल अग्निकांडातून आली समज गोंदिया : सात जणांचा जीव घेणाऱ्या व जिल्ह्यासाठी कलंक ठरलेल्या बिंदल कॉम्प्लेक्सचे अग्निकांड आजही अंगावर शहारे उभे करते. या घटनेतून शहरात असलेल्या प्रतिष्ठानांतील सुरक्षा व्यवस्था उघड्यावर पडली असून आज हीच घटना प्रतिष्ठान मालक व अग्निशमन विभागासाठी समज देणारी ठरत आहे. यातूनच अग्निशमन विभागाने शहरातील सुमारे ३० प्रतिष्ठानांना फायर आॅडिटसाठीचे नोटीस बजावल्याची माहिती आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथील अग्निशमन विभागाची जबाबदारी वाढत चालली आहे. शहराचे वाढते क्षेत्रफळ, मालमत्ता व लोकसंख्या हे एक चॅलेंज अग्निशमन विभागासाठी ठरत आहे. यातच बिंदल कॉम्प्लेक्समधील अग्निकांडाने याची वास्तवीकता सर्वांच्या पुढे आणून ठेवली. या अग्निकांडाच्या माध्यमातून बिंदलसह शहरात असलेली कित्येक प्रतिष्ठाने आजही सुरक्षीत नसल्याचे उघडकीस आले आहे. असे असतानाही मात्र नगर परिषद प्रशासन कसे हे चित्र बघत बसले आहे याचे आश्चर्य सर्वच व्यक्त करीत आहेत. बिंदलच्या घटनेनंतर नागरिक व वृत्तपत्रांच्या जागरूकतेने पालिका व जिल्हा प्रशासन कारवाई भाग पडले खरे मात्र आजही पाहिजे त्या प्रमाणात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे तेवढेच खरे आहे. मात्र या घटनेने काही प्रमाणात पालिका व अग्निशमन विभागाला समज दिली आणि यातूनच अग्निशमन विभागाने शहरातील सुमारे ३० प्रतिष्ठानांना फायर आॅडीटसाठी नोटीस धाडल्याची माहिती आहे. यातील सुमारे १५ प्रतिष्ठानांचे आॅडीट झाले असून उर्वरीतांचेही लवकरच आॅडीट केले जाणार आहे. अग्निशमन विभागाने पूर्ण जबाबदारीने फायर आॅडीटचे हे काम पूर्ण केल्यास भविष्यात शहरात बिंदल कॉम्प्लेक्स सारख्या घटनांची पूनरावृत्ती टाळता येईल, यात शंका नाही. त्यामुळे आता अग्निशमन विभागाने नियमांना बगल न देता व कुणाचीही गय न करता काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी हीच अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत.अग्नीशमन विभागाने बिंदलच्या घटनेनंतर लगेच फायर आॅडीटचे पत्र सर्वच प्रतिष्ठानांना देण्याचे म्हटले होते. परंतुअद्याप सर्वांना पत्र दिले नाही. (शहर प्रतिनिधी)अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण अग्निशमन विभाग एक जबाबदार विभाग असून हा विभाग पूर्णपणे सज्ज असणे गरजेचे आहे. मात्र येथील अग्निशमन विभाग आजही पांगळाच दिसून येत आहे. यात सर्वात गंभीर बाब म्हणजे विभागाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण. विभागात आजघडीला ३४ कर्मचारी कार्यरत असून त्यात १३ कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. सुमारे ५० कर्मचाऱ्यांची गरज विभागाला असल्याचे कळते. यात विशेष म्हणजे विभागाच्या प्रमुखाचीच खुर्ची मागील कित्येक वर्षापासून रिक्त पडून आहे. प्रभारी तत्वावर हे विभाग प्रमुख कार्यरत असून स्टेशन आॅफीसर, सब आॅफीसर, चालक अशी महत्वाची पदे रिक्त पडून आहेत. त्यात येणाऱ्या काळात सेवानिवृत्तीमुळे आणखीही पदे रिक्त होणार आहेत. काही दिवसांत येणार दोन गाड्या आजघडीला अग्निशमन विभागाकडे पाच गाड्या आहेत. यातील एक गाडी जुनी असून तिला दुरूस्तीची गरज आहे. त्याबाबतची मंजूर मिळाली असून लवकरच या गाडीची पूर्णपणे दुरूस्ती केली जाणार आहे. शिवाय आणखी दोन नव्या गाड्या येत्या काही दिवसांत येथील अग्निशमन विभागात दाखल होणार असल्याची माहिती प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे यांनी दिली. या गाड्या आल्यास विभाग अधिक मजबूत होणार आहे.