शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ठरले आतापर्यंत ३ ‘गोल्डन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कपिल केकत गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज ...

कपिल केकत

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज निघणाऱ्या नव्या दिवशी कोरोनामुळे काही ना काही अप्रिय घटनाच पुढे येत असल्याचा सर्वांचाच अनुभव आहे. मात्र, एढ्यातही जिल्हावासीयांना ३ सुखद धक्के मिळाले आहेत. त्यात २८ जानेवारी, ४ जुलै व त्यानंतर आता १३ जुलैला जिल्ह्यात शून्यबाधिताची नोंद घेण्यात आली असून हे ३ दिवस जिल्ह्यासाठी ‘गोल्डन डे’ ठरले आहेत.

कोरोनाचा कहर जिल्ह्यात जरी नियंत्रणात असला तरी आजही काही जिल्हे व राज्यांमध्ये त्याचा तांडव सुरूच आहे. यामुळे आजही कोरोनामुळे दररोज काही ना काही अप्रिय घटना कानी पडतच आहेत. कोरोनाच्या या ग्रहणामुळे आज सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली असून त्यांना या भीतीतच एक-एक दिवस मोजत घालवावा लागत आहे. दुसऱ्या लाटेची भीती कमी होत नाही तोच आता तिसऱ्या लाटेच्या बतावण्या सुरू झाल्या आहेत.

या भीती वाढविणाऱ्या घटनांसोबतच मात्र जिल्हावासीयांना काही सुखद घटनांचे धक्केही बसत आहेत ही दिलासादायक बाब आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनाने कहर केल्यानंतर दररोज बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच २८ जानेवारीला जिल्ह्यात शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली व पहिला सुखद धक्का जिल्हावासीयांना बसला. त्यानंतर आता ४ जुलैला हीच गूड न्यूज जिल्हावासीयांना मिळाली असतानाच मंगळवारी (दि.१४) जिल्ह्यात तिसऱ्यांदा शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यासाठी हे ३ दिवस ‘गोल्डन डे’ ठरले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

-------------------------------

जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

सुदैवाने जिल्ह्यात मंगळवारी फक्त १४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात शून्य बाधितांची नोंद घेण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली नसून उलट ६ बाधितांची सुटी झाल्याने क्रियाशील रुग्णसंख्या घटली आहे. त्यात तिरोडा तालुका कोरोनामुक्त असून उर्वरित अन्य तालुक्यांत आता २-३ रुग्ण उरले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे.

-------------------------

तिसऱी लाट थोपविण्यासाठी नियम पाळा

जिल्हावासीयांच्या संयमामुळे जिल्ह्यातून दुसरी लाट ओसरली असून आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. जिल्हावासीयांना प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असल्याने आपल्या जिल्ह्याला या ग्रहणापासून वाचविण्यासाठी जिल्हावासीयांना आताही नियमांचे पालन करण्याची गरज आहे.