शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यासाठी ठरले आतापर्यंत ३ ‘गोल्डन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कपिल केकत गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज ...

कपिल केकत

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने कहर सुरू केला व त्याचे दुष्टचक्र अद्यापही सुरूच आहेत. दररोज निघणाऱ्या नव्या दिवशी कोरोनामुळे काही ना काही अप्रिय घटनाच पुढे येत असल्याचा सर्वांचाच अनुभव आहे. मात्र, एढ्यातही जिल्हावासीयांना ३ सुखद धक्के मिळाले आहेत. त्यात २८ जानेवारी, ४ जुलै व त्यानंतर आता १३ जुलैला जिल्ह्यात शून्यबाधिताची नोंद घेण्यात आली असून हे ३ दिवस जिल्ह्यासाठी ‘गोल्डन डे’ ठरले आहेत.

कोरोनाचा कहर जिल्ह्यात जरी नियंत्रणात असला तरी आजही काही जिल्हे व राज्यांमध्ये त्याचा तांडव सुरूच आहे. यामुळे आजही कोरोनामुळे दररोज काही ना काही अप्रिय घटना कानी पडतच आहेत. कोरोनाच्या या ग्रहणामुळे आज सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली असून त्यांना या भीतीतच एक-एक दिवस मोजत घालवावा लागत आहे. दुसऱ्या लाटेची भीती कमी होत नाही तोच आता तिसऱ्या लाटेच्या बतावण्या सुरू झाल्या आहेत.

या भीती वाढविणाऱ्या घटनांसोबतच मात्र जिल्हावासीयांना काही सुखद घटनांचे धक्केही बसत आहेत ही दिलासादायक बाब आहे. त्याचे असे की, मागील वर्षी कोरोनाने कहर केल्यानंतर दररोज बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच २८ जानेवारीला जिल्ह्यात शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली व पहिला सुखद धक्का जिल्हावासीयांना बसला. त्यानंतर आता ४ जुलैला हीच गूड न्यूज जिल्हावासीयांना मिळाली असतानाच मंगळवारी (दि.१४) जिल्ह्यात तिसऱ्यांदा शून्यबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यासाठी हे ३ दिवस ‘गोल्डन डे’ ठरले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

-------------------------------

जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

सुदैवाने जिल्ह्यात मंगळवारी फक्त १४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात शून्य बाधितांची नोंद घेण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढली नसून उलट ६ बाधितांची सुटी झाल्याने क्रियाशील रुग्णसंख्या घटली आहे. त्यात तिरोडा तालुका कोरोनामुक्त असून उर्वरित अन्य तालुक्यांत आता २-३ रुग्ण उरले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे.

-------------------------

तिसऱी लाट थोपविण्यासाठी नियम पाळा

जिल्हावासीयांच्या संयमामुळे जिल्ह्यातून दुसरी लाट ओसरली असून आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. जिल्हावासीयांना प्रशासनाला दिलेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असल्याने आपल्या जिल्ह्याला या ग्रहणापासून वाचविण्यासाठी जिल्हावासीयांना आताही नियमांचे पालन करण्याची गरज आहे.