शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

शेतकऱ्यांंना मिळणार २३.३५ कोटींचे सानुग्रह अनुदान

By admin | Updated: June 4, 2015 00:51 IST

जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

गोंदिया : जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदीवर शेतकऱ्यांना २३ कोटी ३५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींमार्फत जिल्ह्यात विविध धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना ४७ आणि आदिवासी विकास महामंडळाला ४० अशी एकूण ८७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली होती.आदिवासी विकास महामंडळांतर्गत असलेल्या धान खरेदी केंद्रांमध्ये देवरी तालुक्यातील अंभोरा, चिचगड, चिचेवाडा, सावली, पुराडा, डवकी, सालेकसा तालुक्यातील सालेकसा, बिजेपार, मक्काटोला, सातगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव, केशोरी, इळदा, बाराभाटी, पवनी (धाबे.), पांढरवानी, सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी, चिखली, खजरी, डोंगरगाव, सडक अर्जुनी आदि आदिवासी सेवा सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, रावणवाडी, धापेवाडा, दासगाव, टेमणी, आसोली, कोचेवाही, कामठा, मजीपूर, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कालीमाटी, तेढा, कुऱ्हाडी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव येथील तीन धान खरेदी केंद्र, नवेगावबांध, महागाव, वडेगाव (स्टेशन), धाबेटेकडी, भिवखिडकी, आमगाव तालुक्यातील आमगाव व गोरठा, सालेकसा तालुक्यातील कोटजंभोरा, तिरोडा तालुक्यातील बघोली, भिवापूर, तिरोडा, ठाणेगाव, मेंढा, मुंडीकोटा, चिखली, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, बाम्हणी, मुरपार, पांढरी हे केंद्र सुरू असून तिरोडा तालुक्यातील वडेगाव, येडमाकोट, नवेझरी व विहिरगाव येथील धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक नसल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)अनुदान मिळण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षाजिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे हे अनुदान संबंधित खरेदी केंद्रामार्फत चेकद्वारे मिळणार आहे. मात्र त्यासाठी अजून किमान १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. खरेदी संस्था त्या अनुदानाच्या रकमेची हुंडी काढून ती गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पाठवेल. त्यांच्याकडून तो प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आणि त्यांच्याकडून शासनाला जाईल. शासनाकडून तो प्रस्ताव मंजूर होऊन पुन्हा उलट्या क्रमाने परत येऊन खरेदी संस्थेकडे ते पैसे जमा होतील. त्यानंतर ती संस्था शेतकऱ्यांचे धनादेश तयार करून त्यांना वाटप करतील.गतवर्षीपेक्षा खरेदीत वाढआधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत मार्च २०१५ पूर्वी ८ लाख ४८ हजार ८८४ क्विंटल तर १ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५ पर्यंत ८४ हजार ५९८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदी बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. गेल्यावर्षी सुरूवातीला छत्तीसगड व मध्यप्रदेशात मिळणाऱ्या बोनसमुळे तिकडे धान गेला होता. यावर्षी तसे झाले नसल्याने धानाचे उत्पादन वाढल्याचा आभास होत आहे.‘अ’ प्रतीच्या धानाला १४०० रु. प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण धानाला १३६० रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहे. आता त्यात २५० रु. प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदानाची भर पडली आहे.