शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

कृषिपंपांचे २२०४ अर्ज ‘वेटींग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. मात्र सिचंनातून पाणी घेणे म्हणजे कृषी पंपाची गरज पडते.

ठळक मुद्देपेड पेंडिंगची आकडेवारी : १४९० अर्जांना दिली जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतीसाठी कृषी पंपांना वीज जोडणी घेण्यासाठी शेतकरी पुढे येत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून त्यांना वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आजही जिल्ह्यातील २२०४ शेतकरी कृषीपंप जोडणीसाठी ‘वेटींग’वरच आहेत. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांनी डिमांड भरली असूनही त्यांना वीज जोडणीसाठी महावितरणच्या चकरा माराव्या लागत आहेत.जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची मार सहन करावी लागत आहे. पाऊस पाहिजे त्या प्रमाणात बरसत नसल्याने याचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक निसटण्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. अशात सिंचनाची मदत घेऊन आपली शेती वाचविण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. मात्र सिचंनातून पाणी घेणे म्हणजे कृषी पंपाची गरज पडते. यामुळे शेतकरी आता पाण्याची सोय करून घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.यासाठी शेतकरी आपल्या कृषीपंपांना अधिकृृत वीज मिळावी यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करीत आहेत. केंद्र शासनाच्या उच्च दाब प्रणाली अंतर्गत शेतकºयांना वीज जोडणी द्यावयाची यासाठी जिल्ह्यातील २२१५ शेतकºयांची यादी महावितरणने ३१ मार्च २०१८ पर्यंत गोठविली आहे.यातील १४९० अर्जांना वीज जोडणी देण्यात आली असून ७२५ अर्ज पेंडींग होते. त्यानंतर कृषीपंप जोडणीसाठी शेतकºयांचे अर्ज येत राहिले व असे २२०४ अर्ज आडघडीला ‘वेटींग’वर आहेत. वीज जोडणीसाठीची डिमांड भरूनही हे शेतकरी आपल्या नंबरची वाट बघत बसले असून त्यांना नाहक वीज कंपनीच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.आता पडणार पंपांची गरजआता उन्हाळी शेतीची कामे सुरू असून आजही जिल्हा वरथेंबी पावसावर अवलंबून असल्यामुळे सिंचना शिवाय शेतकºयांना गत्यंतर नाही. अशात शेतकरी कृषीपंपांचा वापर करूनच शेती पिकऊ शकतात. मात्र ज्यांच्याकडे अद्याप वीज जोडणी आलेली नाही त्यांना मात्र अडचणच आहे. अशात आकडा घालून पंप चालवा हाच उपाय शेतकºयांकडे उरतो. त्यातही वीज वितरण कंपनीकडून अशा शेतकºयांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने शेतकºयांची इकडे आड-तिकडे विहीर अशी स्थिती होते.

टॅग्स :agricultureशेती