शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

१९ वर्षापासून बिंदुनामावलीच नाही

By admin | Updated: March 25, 2017 01:25 IST

गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली मागील १९ वर्षांपासून तयार न झाल्यामुळे

३१ पर्यंत अल्टीमेटम : जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची १२३ पदे अतिरिक्त गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली मागील १९ वर्षांपासून तयार न झाल्यामुळे शिक्षकांच्या पदभरतीसह बदल्यांमधील सावळागोंधळ दूर झालेला नाही. हा गोंधळ एकदाचा दूर करून कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आता राज्य शासनाने शिक्षण विभागाला ३१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व लिपीकवर्ग रात्रंदिवस या बिंदुनामावलीच्या कामात लागले आहेत. मागासर्वीय विभागाचे सहाय्यक आयुक्त नागपूर यांच्याकडून तपासणी न झाल्यामुळे बिंदुनामावली तयार झाली नाही असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. परंतु आता मार्च अखेर बिंदुनामावली तयार होणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे. १ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया जिल्हा वेगळा झाला. त्यावेळी नोकरीला लागणाऱ्या लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात नव्हते. कालांतराने हे जात पडताळणी प्रमाणपत्र मागविण्यात आले. भंडारा जिल्ह्यापासून गोंदिया जिल्हा वेगळा झाला तेव्हा तेथील जिल्हा परिषद म्हणून शिक्षकांची अपूर्ण माहिती गोंदिया जिल्हा परिषदेला मिळाल्यामुळे ही बिंदुनामावलीची प्रक्रीया होऊ शकली नाही. वारंवार होणाऱ्या आरडा-ओरडमुळे शिक्षण विभागाने सन २०१३ पर्यंतचे सर्व कागदपत्र तयार केले. परंतु आताही बिंदुनामावली तयार झाली नाही. बिंदुनामावलीनुसार गोंदिया जिल्ह्यात अनुसूचित जातीचे ४९४, अनुसूचित जमातीचे २६७, विमुक्त जाती अ ११५, भटक्या जमाती ब ९५, विमुक्त जाती क १३४, विमुक्त जाती ड ७६ विशेष मागास प्रवर्ग ७६, इतर मागस वर्गीय ७२४ व खुल्या प्रवर्गाचे १ हजार ८२९ असे एकूण ३ हजार ८११ पदे मंजूर आहेत. पण सध्या गोंदिया जिल्ह्यात ३ हजार ९३४ शिक्षक कार्यरत आहेत. बिंदुनावलीनुसार संख्या गृहीत धरली तरीही गोंदिया जिल्ह्यात आजघडीला १२३ शिक्षक अतिरिक्त आहेत. परंतु बिंदुनामावली तयार झाल्यानंतर कोणत्या वर्गातील किती पदे मंजूर आहेत किती कार्यरत आहेत याची आकडेवारी समोर येणार आहे. (तालुका प्रतिनिधी) जातपडताळणी व आदेशामुळे रखडले काम जुन्या लोकांना नियुक्ती देताना जातपडताळणी प्रमाणपत्र मागितले जात नव्हते. तसेच त्यांना दिलेल्या आदेशावर कोणत्या प्रवर्गातून त्यांची नियुक्ती करण्यात आली हे नमूद नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील बिंदुनामावलीचे काम रखडले आहे. जिल्हा स्थापनेपासून रोस्टरच नाही गोंदिया जिल्हा निर्मिती झाल्यापासून जिल्ह्याचे रोस्टर तयार करण्यात आले नाही. रोस्टर झाल्याशिवाय भरती किंवा पदोन्नती देण्यात येत नाही. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेत रोस्टर नसतानाही भरती व पदोन्नती घेण्यात आली आहे. यानंतर बदल्या आॅनलाईन होणार असल्याने बदलीग्रस्तांना न्याय मिळणार नाही. रोस्टर तयार न केल्याने मागासवर्गीयांवर अन्याय झाला आहे. आंतरजिल्हा बदलीग्रस्तांनाही ताटकळत राहावे लागत आहे.