शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

७७८ विद्यार्थ्यांसाठी नगर पालिकेच्या १८ शाळा

By admin | Updated: July 28, 2014 23:35 IST

नगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ११९ ने कमी झाली आहे.

दैना न.प.च्या शाळांची : दरवर्षी सुरू आहे पटसंख्या गळतीकपिल केकत - गोंदियानगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ११९ ने कमी झाली आहे. हे चक्र असेच सुरू राहिले तर काही वर्षातच नगर परिषदेवर आपल्या सर्व शाळा बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ७) फक्त ७७८ विद्यार्थ्यांची नोंद आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १८ शाळा सुरू आहेत. खाजगी शाळांमध्ये हजारो विद्यार्थी असून पालिकेच्या शाळांमध्ये मात्र बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळात आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. मागील वर्षी सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात पालिकेच्या १८ प्राथमिक शाळांमध्ये ८९७ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत होते. सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात गळतीची ही साथ सुरूच असून पटसंख्या ७७८ वर आली आहे. म्हणजेच या वर्षी पालिके ने ११९ विद्यार्थी गमावले आहेत. या विद्यार्थ्यांनी एखाद्या खाजगी शाळेची वाट धरली असेल यात शंका नाही. दिवसेंदिवस घटत चाललेली ही विद्यार्थी संख्या पालिकेसाठी गंभीर विषय आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत अद्यापही गंभीर नसल्याने गळतीचा हा प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसते. या शैक्षणिक सत्रातही पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आकडेवारी बघावयाची झाल्यास फक्त ७, ८, १२, १६ एवढे विद्यार्थी आहेत. बोटावर मोजण्याएवढी विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षणाचा दर्जा मात्र खालावलेलाच असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच पालक आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात न घालता त्यांना रक्कम मोजून खाजगी शाळांमध्ये टाकत असल्याचे दिसून येत आहे.