शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ वित्त आयोगातून विद्युत बिल भरण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST

केशोरी : विद्युत वितरण कंपनीने केशोरी ग्रामपंचायतीकडे असलेले पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्यासंबंधी नोटीस बजावून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा गेल्या ...

केशोरी : विद्युत वितरण कंपनीने केशोरी ग्रामपंचायतीकडे असलेले पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्यासंबंधी नोटीस बजावून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा गेल्या १५ दिवसांपासून खंडित केला आहे. परिणामी संपूर्ण गावात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र याला सरपंच व उपसरपंच संघटनेचा विरोध असून या मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात नागरिकांना अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे. गेल्यावर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणू महामारीमुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती विस्कटली आहे. गाव विकासाची मंजूर कामे आवासून उभी आहेत. ग्रामपंचायतीने गाव विकासाची कामे करावी की, थकीत विद्युत बिलाचा भरणा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. थकीत पथदिव्यांच्या विद्युत बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असताना शासनाने १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरण्यास सांगितले. मात्र याला संघटनेचा विरोध असून यासंदर्भातील निवेदन सुध्दा शासनाला पाठविण्यात आले आहे.

......

गाव विकासाचा निधी वीज बिलासाठी का?

जिल्हा परिषदेने २००६ पासून पथदिव्यांच्या विद्युत बिलाचा भरणा बंद केल्याने थकीत विद्युत बिलाचा आकडा प्रचंड फुगला आहे. त्या तुलनेत ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याने पथदिव्यांचे बिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. १५ व्या वित्त आयोगाचा मंजूर निधी विद्युत देखभाल आणि ग्रामसभा, मासिक सभेत मंजूर आराखड्यानुसार गाव विकासाच्या कामावर खर्च करणे अपेक्षित असल्याचे सरपंच,उपसरपंच संघटनेने म्हटले आहे.

...........

काेट

ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे विद्युत बिल भरणे असा शासनाने निर्णय घेऊन या निर्णयामुळे गाव विकासात बाधा निर्माण केली आहे. सध्या कोरोना महामारीने ग्रामपंचायतींची विस्कटलेली आर्थिक स्थित लक्षात घेता हा आदेश ग्रामपंचायतीवर अन्यायकारक असल्याचा आरोप सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी केला आहे.