शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

१४ लाखांचा कृषी महोत्सव नेमका कुणासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:58 IST

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सव नुकतेच पार पडले. महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनासाठी कृषी विभागाने कुठलीही कसर सोडली नाही.

ठळक मुद्देपाच दिवसात पाच हजार शेतकऱ्यांची भेट नाही : ढिसाळ नियोजनाचा फटका

ऑनलाईन लोकमतगोंदिया : कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सव नुकतेच पार पडले. महोत्सवाच्या दिमाखदार आयोजनासाठी कृषी विभागाने कुठलीही कसर सोडली नाही. यासाठी पाच दहा नव्हे तर तब्बल १४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांसाठी हा महोत्सव आयोजित केला होता, तो शेतकरीच या महोत्सवात कुठे आढळला नाही. त्यामुळे नेमका हा महोत्सव शेतकऱ्यांचा होता की केवळ कृषी विभागाचा हे समजायला मार्ग नाही.जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. हवामान बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांचा पॅटर्न बदलण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी गोंधळाच्या स्थिती असून त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठीच जिल्हा कृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन केले असावे. असा समज जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा होता. कृषी विभागाने पाच दिवसीय कृषी महोत्सवावर तब्बल १४ लाखांच्या खर्चाचे नियोजन केले. येथील क्रीडा संकुलाच्या भव्य पटागंणावर तीन ते चार मोठे डोम उभारण्यात आले. त्या महिला बचत गटांना २०० स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र सुदैवाने त्यापैकी ४० ते ५० स्टॉल रिकामेच होते. जे काही स्टॉल महोत्सव स्थळी लागले होते. त्यात खाद्य पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनाचेच स्टॉल अधिक होते.त्यामुळे हा खाद्य की कृषी महोत्सव हे समजण्यास मार्ग नाही. मोजक्या दोन तीन शेतकºयांच्या स्टॉल शिवाय एकाही स्टॉलवर कृषी विषयक माहिती व प्रयोग आढळले नाही. कृषी उपयोगी ट्रॅक्टरच्या साहित्याशिवाय कुठल्याच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा स्टॉल आढळला नाही. जिल्ह्यातील प्रगतिशिल शेतकऱ्यांचा या महोत्सवात कुठेच वावर दिसला नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत महोत्सवाची माहिती पोहचली की नाही यावर प्रश्न चिन्ह आहे.महोत्सवस्थळी शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मोठे डोमे व मंच उभारण्यात आले होते. मात्र यात मार्गदर्शकाचा अभाव होताच शिवाय डोममध्ये शेतकऱ्यांपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची संख्या अधीक होती.कृषी विभागाचे अधिकारी वगळता या डोममध्ये शेतकरी भटकलेच नाही. महोत्सवस्थळी गर्दी भासविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी स्टॉल बाहेर व डोममध्ये खुर्च्यांवर बसून होते. त्यामुळे हा कृषी महोत्सव नेमका शेतकऱ्यांसाठीच होता की कृषी विभागासाठी असा प्रश्न निर्माण होतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी म्हणून हे भव्य कृषी महोत्सव आयोजित केल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी अभावानेच आढळला. त्यामुळे कृषी विभागाने नेमके या महोत्सवाने काय साधले असा सवाल उपस्थित केला जात आहे. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कृषी विभागाचा ढिसाळ कारभार आणि नियोजन अभाव या निमित्ताने पुढे आला.प्रगतीशिल शेतकऱ्यांची पाठजिल्ह्यात प्रगतीशिल शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात सुध्दा पाच ते सहा प्रगतीशील शेतकºयांचा सत्कार करण्यात आले. शिवाय या शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगानी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुध्दा भूरळ घातली. त्यामुळे त्यांनी या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र कृषी विभाग या शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरला. त्यामुळेच प्रगतीशिल शेतकऱ्यांनी या महोत्सवाकडे पाठ दाखविल्याचे बोलले जाते.शहरात जनजागृतीजिल्ह्यात अडीच लाखावर शेतकरी आहेत. ग्रामीण भागातच शेतकरी मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र कृषी विभागाने कृषी महोत्सवाची जनजागृती शहरात अधिक केली तर ग्रामीण भागात माहितीच पोहचली नाही.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना महोत्सवाची माहिती वर्तमान पत्रात बातम्या आल्यानंतरच मिळाली. शेतकरी ग्रामीण भागात अन जनजागृती शहरात असेच चित्र होते.पाच हजारही शेतकऱ्यांची भेट नाहीकृषी महोत्सवाला पाच दिवसात पाच हजारही शेतकऱ्यांनी भेट दिली नाही. कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्वच नागरिकांची शेतकरी म्हणून नोंद केल्यानंतरही हा आकडा चार ते चाडेचार हजारपर्यंत पोहचला नाही. त्यामुळे १४ लाखांचा कृषी महोत्सव घेवून कृषी विभागाने नेमके काय साध्य केले याच उत्तर केवळ याच विभागाकडे असू शकते.महोत्सव स्थळाची निवड चुकलीकृषी विभागाने कृषी महोत्सवाचे आयोजन शहराबाहेर असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ठेवले. त्यामुळे रेल्वेने कृषी महोत्सवासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या स्थळापर्यंत पोहचण्यासाठी आॅटो करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी महोत्सवस्थळी न जाणेच पसंत केले.वाहने लावूनही गर्दी वाढविण्यात अपयशसुरूवातीच्या तीन दिवसात कृषी महोत्सवाकडे शेतकरी भटकले नाही. त्यामुळे कृषी महोत्सव फसल्याचा संदेश जाऊ नये यासाठी कृषी विभागाने स्वत:च्या विभागाचे वाहने लावून ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला देखील प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी वाहने लावून गर्दी वाढविण्यात या विभागाला अपयश आले.