४ मीटर वाढले भूजल स्तर: १६३ कुटुंबांचे २९.५३ टक्के सिंचन क्षेत्र नरेश रहिले ल्ल गोंदिया राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या खोसेटोला गावाचे चित्र बदलविले. जलयुक्त शिवार अभिायानामुळे तयार करण्यात आलेल्या शेतळ्यामुळे या गावाचे २९.५३ टक्के सिंचन वाढले आहे. या अभिायानामुळे ३ ते ४ मीटर पाण्याची भूजल पातळी वाढली आहे. १६३ कुटुंब असलेल्या खोसेटोला या गावाची लोकसंख्या ८०९ आहे. या गावाचे खरीप क्षेत्र २९४.६० हेक्टर आहे. यातील २६४ हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. धानाचे उत्पादन तसेच धुऱ्यांवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. गावात सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकरी फक्त पिके घेत नव्हते. पावसाळ्यात पाऊस वेळेवर आला नाही तर त्याचा विपरीत परिणाम धान उत्पादनावर होत होता. पाण्याच्या अभावामुळे रबी पिके घेतली जात नव्हती.परंतु सन २०१५-१६ या वर्षात खोसेटोला गावाची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी वेळोवेळी सभा घेतली. प्रत्यक्ष भेंटून शेतकऱ्यांना योजनेचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली. गावात २३ शेततळे तयार करण्यात आले. जिल्ह्यातील हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावात ४०.२६ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहे. आता या गावाचे ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. सप्टेंबर महिन्यात धान गर्भावस्थेत असताना त्याला २५० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु तालुक्यात प्रत्यक्षात २२२ मि.मी. पाऊस होतो. आॅक्टोबर महिन्यात दाना भरतेवेळी २०० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु ९६ मि.मी. पाऊस येतो.परंतु शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे आता सिंचनासाठी पाणी मिळू लागला त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. रबी पिकासाठीही मूबलक पाणी उपलब्ध आहे. या अभियानामुळे भूजल स्तर वाढल्याने विहीरीचे पाणी वरच आहे. या विहीरीच्या पाण्यामुळे गहू, हरभरा, जवस व भाजीपाल्याची उत्पादन घेतले जात आहेत. पशूपालनासाठी चाऱ्याचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक मिळकत मिळवत आहेत. जलयुक्त शिवार अभियानापूर्वी शेतकरी रबीत गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, चारा असे ६१.४ हेक्टर मध्ये उत्पादन घेत होते. परंतु अभियानानंतर २०७.९ हेक्टर मध्ये घेण्यात येते. या गावाचे भूजलस्तर ३०-४० मीटर होता. आता 20-30 मीटर आहे. आधी १०-११ महिने पाणी उपलब्ध राहात होता आता १२ महिने पाणी उपलब्ध असते. आधी विहीरींची भूजल पातळी ९-१० होता. आता ७-८ मीटर आहे. १३५० लीटर दुग्ध संकलन ४कृषि विभागाच्या माध्यमातून खडकाळ जमीनीवर शाश्वत शेती अभियान कार्यक्रमांतर्गत ८८ जर्सी व होस्टन फ्रिजन जातीच्या दुधाळू गायी वाटप करण्यात आल्या. यामुळे शेती बरोबर पशूपालन व दुग्ध व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून केले जात आहे. गावातून १३५० लीटर दुग्ध संकलन केले जाते. ‘‘जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषि विभागाच्या माध्यामातून शेतात ४५ बाय २० मीटरची शेततळी तयार करण्यात आली. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. धान लावण्यासाठी या पाण्याचा वापर होत आहे. रबीत गहू, जवस, हरभरा ही पिके घेतली जातात. भविष्यात या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याचा विचार आहे. खोपचंद बिसेन लाभार्थी शेतकरी खोसेटोला
१२३ शेततळ्यांनी खोसेटोलाचे सिंचन
By admin | Updated: December 23, 2016 01:02 IST