शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१२३ शेततळ्यांनी खोसेटोलाचे सिंचन

By admin | Updated: December 23, 2016 01:02 IST

राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या

४ मीटर वाढले भूजल स्तर: १६३ कुटुंबांचे २९.५३ टक्के सिंचन क्षेत्र नरेश रहिले ल्ल गोंदिया राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या खोसेटोला गावाचे चित्र बदलविले. जलयुक्त शिवार अभिायानामुळे तयार करण्यात आलेल्या शेतळ्यामुळे या गावाचे २९.५३ टक्के सिंचन वाढले आहे. या अभिायानामुळे ३ ते ४ मीटर पाण्याची भूजल पातळी वाढली आहे. १६३ कुटुंब असलेल्या खोसेटोला या गावाची लोकसंख्या ८०९ आहे. या गावाचे खरीप क्षेत्र २९४.६० हेक्टर आहे. यातील २६४ हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. धानाचे उत्पादन तसेच धुऱ्यांवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. गावात सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकरी फक्त पिके घेत नव्हते. पावसाळ्यात पाऊस वेळेवर आला नाही तर त्याचा विपरीत परिणाम धान उत्पादनावर होत होता. पाण्याच्या अभावामुळे रबी पिके घेतली जात नव्हती.परंतु सन २०१५-१६ या वर्षात खोसेटोला गावाची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी वेळोवेळी सभा घेतली. प्रत्यक्ष भेंटून शेतकऱ्यांना योजनेचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली. गावात २३ शेततळे तयार करण्यात आले. जिल्ह्यातील हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावात ४०.२६ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहे. आता या गावाचे ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. सप्टेंबर महिन्यात धान गर्भावस्थेत असताना त्याला २५० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु तालुक्यात प्रत्यक्षात २२२ मि.मी. पाऊस होतो. आॅक्टोबर महिन्यात दाना भरतेवेळी २०० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु ९६ मि.मी. पाऊस येतो.परंतु शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे आता सिंचनासाठी पाणी मिळू लागला त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. रबी पिकासाठीही मूबलक पाणी उपलब्ध आहे. या अभियानामुळे भूजल स्तर वाढल्याने विहीरीचे पाणी वरच आहे. या विहीरीच्या पाण्यामुळे गहू, हरभरा, जवस व भाजीपाल्याची उत्पादन घेतले जात आहेत. पशूपालनासाठी चाऱ्याचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक मिळकत मिळवत आहेत. जलयुक्त शिवार अभियानापूर्वी शेतकरी रबीत गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, चारा असे ६१.४ हेक्टर मध्ये उत्पादन घेत होते. परंतु अभियानानंतर २०७.९ हेक्टर मध्ये घेण्यात येते. या गावाचे भूजलस्तर ३०-४० मीटर होता. आता 20-30 मीटर आहे. आधी १०-११ महिने पाणी उपलब्ध राहात होता आता १२ महिने पाणी उपलब्ध असते. आधी विहीरींची भूजल पातळी ९-१० होता. आता ७-८ मीटर आहे. १३५० लीटर दुग्ध संकलन ४कृषि विभागाच्या माध्यमातून खडकाळ जमीनीवर शाश्वत शेती अभियान कार्यक्रमांतर्गत ८८ जर्सी व होस्टन फ्रिजन जातीच्या दुधाळू गायी वाटप करण्यात आल्या. यामुळे शेती बरोबर पशूपालन व दुग्ध व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून केले जात आहे. गावातून १३५० लीटर दुग्ध संकलन केले जाते. ‘‘जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषि विभागाच्या माध्यामातून शेतात ४५ बाय २० मीटरची शेततळी तयार करण्यात आली. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. धान लावण्यासाठी या पाण्याचा वापर होत आहे. रबीत गहू, जवस, हरभरा ही पिके घेतली जातात. भविष्यात या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याचा विचार आहे. खोपचंद बिसेन लाभार्थी शेतकरी खोसेटोला