शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

१२३ शेततळ्यांनी खोसेटोलाचे सिंचन

By admin | Updated: December 23, 2016 01:02 IST

राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या

४ मीटर वाढले भूजल स्तर: १६३ कुटुंबांचे २९.५३ टक्के सिंचन क्षेत्र नरेश रहिले ल्ल गोंदिया राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या खोसेटोला गावाचे चित्र बदलविले. जलयुक्त शिवार अभिायानामुळे तयार करण्यात आलेल्या शेतळ्यामुळे या गावाचे २९.५३ टक्के सिंचन वाढले आहे. या अभिायानामुळे ३ ते ४ मीटर पाण्याची भूजल पातळी वाढली आहे. १६३ कुटुंब असलेल्या खोसेटोला या गावाची लोकसंख्या ८०९ आहे. या गावाचे खरीप क्षेत्र २९४.६० हेक्टर आहे. यातील २६४ हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. धानाचे उत्पादन तसेच धुऱ्यांवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. गावात सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकरी फक्त पिके घेत नव्हते. पावसाळ्यात पाऊस वेळेवर आला नाही तर त्याचा विपरीत परिणाम धान उत्पादनावर होत होता. पाण्याच्या अभावामुळे रबी पिके घेतली जात नव्हती.परंतु सन २०१५-१६ या वर्षात खोसेटोला गावाची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी वेळोवेळी सभा घेतली. प्रत्यक्ष भेंटून शेतकऱ्यांना योजनेचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली. गावात २३ शेततळे तयार करण्यात आले. जिल्ह्यातील हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावात ४०.२६ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहे. आता या गावाचे ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. सप्टेंबर महिन्यात धान गर्भावस्थेत असताना त्याला २५० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु तालुक्यात प्रत्यक्षात २२२ मि.मी. पाऊस होतो. आॅक्टोबर महिन्यात दाना भरतेवेळी २०० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु ९६ मि.मी. पाऊस येतो.परंतु शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे आता सिंचनासाठी पाणी मिळू लागला त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. रबी पिकासाठीही मूबलक पाणी उपलब्ध आहे. या अभियानामुळे भूजल स्तर वाढल्याने विहीरीचे पाणी वरच आहे. या विहीरीच्या पाण्यामुळे गहू, हरभरा, जवस व भाजीपाल्याची उत्पादन घेतले जात आहेत. पशूपालनासाठी चाऱ्याचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक मिळकत मिळवत आहेत. जलयुक्त शिवार अभियानापूर्वी शेतकरी रबीत गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, चारा असे ६१.४ हेक्टर मध्ये उत्पादन घेत होते. परंतु अभियानानंतर २०७.९ हेक्टर मध्ये घेण्यात येते. या गावाचे भूजलस्तर ३०-४० मीटर होता. आता 20-30 मीटर आहे. आधी १०-११ महिने पाणी उपलब्ध राहात होता आता १२ महिने पाणी उपलब्ध असते. आधी विहीरींची भूजल पातळी ९-१० होता. आता ७-८ मीटर आहे. १३५० लीटर दुग्ध संकलन ४कृषि विभागाच्या माध्यमातून खडकाळ जमीनीवर शाश्वत शेती अभियान कार्यक्रमांतर्गत ८८ जर्सी व होस्टन फ्रिजन जातीच्या दुधाळू गायी वाटप करण्यात आल्या. यामुळे शेती बरोबर पशूपालन व दुग्ध व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून केले जात आहे. गावातून १३५० लीटर दुग्ध संकलन केले जाते. ‘‘जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषि विभागाच्या माध्यामातून शेतात ४५ बाय २० मीटरची शेततळी तयार करण्यात आली. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. धान लावण्यासाठी या पाण्याचा वापर होत आहे. रबीत गहू, जवस, हरभरा ही पिके घेतली जातात. भविष्यात या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याचा विचार आहे. खोपचंद बिसेन लाभार्थी शेतकरी खोसेटोला