शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

१२३ शेततळ्यांनी खोसेटोलाचे सिंचन

By admin | Updated: December 23, 2016 01:02 IST

राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या

४ मीटर वाढले भूजल स्तर: १६३ कुटुंबांचे २९.५३ टक्के सिंचन क्षेत्र नरेश रहिले ल्ल गोंदिया राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या खोसेटोला गावाचे चित्र बदलविले. जलयुक्त शिवार अभिायानामुळे तयार करण्यात आलेल्या शेतळ्यामुळे या गावाचे २९.५३ टक्के सिंचन वाढले आहे. या अभिायानामुळे ३ ते ४ मीटर पाण्याची भूजल पातळी वाढली आहे. १६३ कुटुंब असलेल्या खोसेटोला या गावाची लोकसंख्या ८०९ आहे. या गावाचे खरीप क्षेत्र २९४.६० हेक्टर आहे. यातील २६४ हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. धानाचे उत्पादन तसेच धुऱ्यांवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. गावात सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकरी फक्त पिके घेत नव्हते. पावसाळ्यात पाऊस वेळेवर आला नाही तर त्याचा विपरीत परिणाम धान उत्पादनावर होत होता. पाण्याच्या अभावामुळे रबी पिके घेतली जात नव्हती.परंतु सन २०१५-१६ या वर्षात खोसेटोला गावाची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी वेळोवेळी सभा घेतली. प्रत्यक्ष भेंटून शेतकऱ्यांना योजनेचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली. गावात २३ शेततळे तयार करण्यात आले. जिल्ह्यातील हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावात ४०.२६ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहे. आता या गावाचे ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. सप्टेंबर महिन्यात धान गर्भावस्थेत असताना त्याला २५० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु तालुक्यात प्रत्यक्षात २२२ मि.मी. पाऊस होतो. आॅक्टोबर महिन्यात दाना भरतेवेळी २०० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु ९६ मि.मी. पाऊस येतो.परंतु शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे आता सिंचनासाठी पाणी मिळू लागला त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. रबी पिकासाठीही मूबलक पाणी उपलब्ध आहे. या अभियानामुळे भूजल स्तर वाढल्याने विहीरीचे पाणी वरच आहे. या विहीरीच्या पाण्यामुळे गहू, हरभरा, जवस व भाजीपाल्याची उत्पादन घेतले जात आहेत. पशूपालनासाठी चाऱ्याचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक मिळकत मिळवत आहेत. जलयुक्त शिवार अभियानापूर्वी शेतकरी रबीत गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, चारा असे ६१.४ हेक्टर मध्ये उत्पादन घेत होते. परंतु अभियानानंतर २०७.९ हेक्टर मध्ये घेण्यात येते. या गावाचे भूजलस्तर ३०-४० मीटर होता. आता 20-30 मीटर आहे. आधी १०-११ महिने पाणी उपलब्ध राहात होता आता १२ महिने पाणी उपलब्ध असते. आधी विहीरींची भूजल पातळी ९-१० होता. आता ७-८ मीटर आहे. १३५० लीटर दुग्ध संकलन ४कृषि विभागाच्या माध्यमातून खडकाळ जमीनीवर शाश्वत शेती अभियान कार्यक्रमांतर्गत ८८ जर्सी व होस्टन फ्रिजन जातीच्या दुधाळू गायी वाटप करण्यात आल्या. यामुळे शेती बरोबर पशूपालन व दुग्ध व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून केले जात आहे. गावातून १३५० लीटर दुग्ध संकलन केले जाते. ‘‘जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषि विभागाच्या माध्यामातून शेतात ४५ बाय २० मीटरची शेततळी तयार करण्यात आली. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. धान लावण्यासाठी या पाण्याचा वापर होत आहे. रबीत गहू, जवस, हरभरा ही पिके घेतली जातात. भविष्यात या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याचा विचार आहे. खोपचंद बिसेन लाभार्थी शेतकरी खोसेटोला