शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

स्थलांतरित पक्ष्यांसाठी १०० तलाव

By admin | Updated: June 8, 2017 02:01 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरणाची संकल्पना पुढे आणली.

नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरणाची संकल्पना पुढे आणली. परंतु ही संकल्पना स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास संपविणारी होती. परंतु एका निसर्ग मित्राच्या लक्षवेधल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवास असलेल्या तलावांना वगळून गाळमुक्त तलावांची संकल्पना राबविली जाणार आहे. तसेच स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासासाठी आता गोंदिया जिल्ह्यातील ७८ तलावांचे पुनरूज्जीवन केले जाणार आहे. गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात रशीया, लद्दाक, कजबीस्तान, अफगानीस्तान व आशिया खंडातील ८ ते १० देशातील पक्षी स्थलांतर होत हिवाळ्याच्या दिवसात गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर येतात. गोंदिया जिल्ह्यातील २२ तलाव स्थलांतरीत पक्षयांना अन्न पुरविणारे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील या तलावांवर रेडक्रिस्टेड, कॉमन पोचार्ड, ग्रेलेगगुज, कोंबडक, सेलडक, व्हसलींगडक अश्या ५० ते ६० प्रजातीचे परदेशी पाहुणे येतात. परंतु महाराष्ट्र शासनाने सद्या सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची जमीन सुपीक करण्यासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरण ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेमुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवासस्थाने नष्ट होऊ शकतात. तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेली तर त्या तलावातील गाळ बरोबर पाणवनस्पतींची बीजे नष्ट होतील. परिणामी जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना अन्न मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील अधिवास संपेल. ही बाब गोंदियातील निसर्ग मित्र तथा सातपुडा फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी मुकूंद धुर्वे यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी या प्रकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. ही बाब जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना देखील पटली. यंदा जिल्ह्यातील ४०० तलावांत गाळमुक्तही संकल्पना राबविली जात असल्याने सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवास असलेल्या २२ तलावांना या गाळमुक्त अभियानातून वगळण्यात आले आहेत. त्या २२ तलावांबरोबर इतर ७८ तलाव या स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवासस्थाने कसे होतील यावर भर देऊन त्या तलावांना पुनरज्जीवित केले जाणार आहे. त्या तलावात पाणवनस्पतीची बीजे टाकण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. तलावांच्या काठांवर देवधान व खसची लागवड स्थलांतरीत पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरू पाहणाऱ्या तलावातील गाळ काढली जाणार नाही. तसेच त्या तलावात पावसाच्या पाण्याबरोबर येणारी गाळ काठावर थांबविता यावी यासाठी १०० तलावांच्या काठावर देवधान व खस ची लागवड केली जाणार आहे. यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिष्ठाण राखून ठेवण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न दिसून आले. तलावाच्या मधात ‘रेस्टझोन’ पक्ष्यांना मनुष्याचा सहवास नको असते परंतु गोंदिया जिल्ह्यातील व्यक्ती पक्ष्याच्या सहवासात बहुदा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या सारसांची संख्या कमी झाली आहे. तलावावर आलेल्या पक्ष्यांच्या सहवासात मनुष्य जाऊ नये यासाठी तलावातील मध्यभागी मातीचे बेट तयार करण्यात यावे, जेणेकरून त्या बेटावर पक्षी आराम करतील किंवा त्या पक्ष्यांनी अंडी घातली तरी त्या अंडींना माणसाचा स्पर्श होणार नाही. परिणामी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही बाब महतवची ठरेल असे धुर्वे यांनी सांगितले.