शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

स्थलांतरित पक्ष्यांसाठी १०० तलाव

By admin | Updated: June 8, 2017 02:01 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरणाची संकल्पना पुढे आणली.

नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरणाची संकल्पना पुढे आणली. परंतु ही संकल्पना स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास संपविणारी होती. परंतु एका निसर्ग मित्राच्या लक्षवेधल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवास असलेल्या तलावांना वगळून गाळमुक्त तलावांची संकल्पना राबविली जाणार आहे. तसेच स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासासाठी आता गोंदिया जिल्ह्यातील ७८ तलावांचे पुनरूज्जीवन केले जाणार आहे. गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात रशीया, लद्दाक, कजबीस्तान, अफगानीस्तान व आशिया खंडातील ८ ते १० देशातील पक्षी स्थलांतर होत हिवाळ्याच्या दिवसात गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर येतात. गोंदिया जिल्ह्यातील २२ तलाव स्थलांतरीत पक्षयांना अन्न पुरविणारे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील या तलावांवर रेडक्रिस्टेड, कॉमन पोचार्ड, ग्रेलेगगुज, कोंबडक, सेलडक, व्हसलींगडक अश्या ५० ते ६० प्रजातीचे परदेशी पाहुणे येतात. परंतु महाराष्ट्र शासनाने सद्या सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची जमीन सुपीक करण्यासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरण ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेमुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवासस्थाने नष्ट होऊ शकतात. तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेली तर त्या तलावातील गाळ बरोबर पाणवनस्पतींची बीजे नष्ट होतील. परिणामी जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना अन्न मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील अधिवास संपेल. ही बाब गोंदियातील निसर्ग मित्र तथा सातपुडा फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी मुकूंद धुर्वे यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी या प्रकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. ही बाब जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना देखील पटली. यंदा जिल्ह्यातील ४०० तलावांत गाळमुक्तही संकल्पना राबविली जात असल्याने सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवास असलेल्या २२ तलावांना या गाळमुक्त अभियानातून वगळण्यात आले आहेत. त्या २२ तलावांबरोबर इतर ७८ तलाव या स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवासस्थाने कसे होतील यावर भर देऊन त्या तलावांना पुनरज्जीवित केले जाणार आहे. त्या तलावात पाणवनस्पतीची बीजे टाकण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. तलावांच्या काठांवर देवधान व खसची लागवड स्थलांतरीत पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरू पाहणाऱ्या तलावातील गाळ काढली जाणार नाही. तसेच त्या तलावात पावसाच्या पाण्याबरोबर येणारी गाळ काठावर थांबविता यावी यासाठी १०० तलावांच्या काठावर देवधान व खस ची लागवड केली जाणार आहे. यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिष्ठाण राखून ठेवण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न दिसून आले. तलावाच्या मधात ‘रेस्टझोन’ पक्ष्यांना मनुष्याचा सहवास नको असते परंतु गोंदिया जिल्ह्यातील व्यक्ती पक्ष्याच्या सहवासात बहुदा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या सारसांची संख्या कमी झाली आहे. तलावावर आलेल्या पक्ष्यांच्या सहवासात मनुष्य जाऊ नये यासाठी तलावातील मध्यभागी मातीचे बेट तयार करण्यात यावे, जेणेकरून त्या बेटावर पक्षी आराम करतील किंवा त्या पक्ष्यांनी अंडी घातली तरी त्या अंडींना माणसाचा स्पर्श होणार नाही. परिणामी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही बाब महतवची ठरेल असे धुर्वे यांनी सांगितले.