शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

भाजीपाल्याच्या उत्पादनातून घेतले १० लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:22 IST

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन ...

ठळक मुद्देपारंपारिक शेतीला दिली बगल : शेतकऱ्यांपुढे ठेवला आदर्श

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेवून वर्षाकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तसेच कनिष्ठ शेती म्हणणाºयापुढे आदर्श निर्माण केला आहे. टिटू जैन असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.टिटू जैन यांची पालेवाडा (हेटी) येथे स्वत:ची १२.५० एकर शेती आहे.या शेतजमिनीत त्यांनी, मिरची, वांगे, काकडी, कारली, टमाटर, चवळीच्या शेंगा, भेंडी आदी भाजीपाला लावला आहे. पूर्वीच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून लोकं इतर व्यवसायाकडे वळायचे. मात्र टिटू जैन यांचे वेगळेपण इथे पहायला मिळते. स्वत: व्यवसायीक असताना सुध्दा ते शेतीकडे वळले. टिटू जैन यांनी सांगितले की मित्राच्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीचे धडे घेतले.शेती करायची ही मनात जिद्द होती, ती जिद्द पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला चिचगाव येथील एका शेतकऱ्याची साडेतीन एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सतत तीन वर्ष शेती करुन शेतीत नफा मिळविला. पुढे स्वत:ची पालेवाडा येथे शेती घेवून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. शेतीतून निघणाऱ्या भाजीपाल्याची सुरूवातील स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, जबलपूर या ठिकाणी बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करण्यास सुरूवात केलीे. जैन यांनी शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे लावले आहेत. त्यामुळे बºयाच अंशी नुकसानीवर आळा बसला आहे.सकाळी ६ वाजता बाजारपेठेत भाजीपाला विक्रीेसाठी नेणे, त्यानंतर शेतीत पूर्ण वेळ देऊन, पुन्हा बाजारपेठेत माल विक्रीस नेणे असा नित्यक्रम जैन यांचा आहे.३२ कुटुंबाचा उदरनिर्वाहजैन यांच्या शेतात वर्षभर ३२ कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांना जैन यांच्यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. सेंद्रिय शेतीचा वापर करुन त्यांनी दीड एकरात गहू व भाताचे उत्पादन घेवून सेंद्रिय शेती उत्तम असल्याचे लोकमतशी बोलतांना सांगितले.खताची निर्मिती शेतातचटिटू जैन यांनी सदासावलीचे पान, लिंबाचे पान, सिताफळाचे पान व इतर पानाचे मिश्रण करुन पाण्यात उकळले व त्यांचा काढा काढून स्प्रेद्वारे झाडावर फवारणी केली. त्यामुळे रासायनिक खताचा वापर निम्यावर आल्याचे त्यांनी सांगितले.आज सर्वांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. पारंपारिक शेतीला बगल द्या, नुसती धानाची शेती केल्याने फायदा होत नाही तर शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास शेतीतून निश्चित फायदा होतो.-टिटू जैन, शेतकरी, गोरेगाव