शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

भाजीपाल्याच्या उत्पादनातून घेतले १० लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:22 IST

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन ...

ठळक मुद्देपारंपारिक शेतीला दिली बगल : शेतकऱ्यांपुढे ठेवला आदर्श

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेवून वर्षाकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तसेच कनिष्ठ शेती म्हणणाºयापुढे आदर्श निर्माण केला आहे. टिटू जैन असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.टिटू जैन यांची पालेवाडा (हेटी) येथे स्वत:ची १२.५० एकर शेती आहे.या शेतजमिनीत त्यांनी, मिरची, वांगे, काकडी, कारली, टमाटर, चवळीच्या शेंगा, भेंडी आदी भाजीपाला लावला आहे. पूर्वीच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून लोकं इतर व्यवसायाकडे वळायचे. मात्र टिटू जैन यांचे वेगळेपण इथे पहायला मिळते. स्वत: व्यवसायीक असताना सुध्दा ते शेतीकडे वळले. टिटू जैन यांनी सांगितले की मित्राच्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीचे धडे घेतले.शेती करायची ही मनात जिद्द होती, ती जिद्द पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला चिचगाव येथील एका शेतकऱ्याची साडेतीन एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सतत तीन वर्ष शेती करुन शेतीत नफा मिळविला. पुढे स्वत:ची पालेवाडा येथे शेती घेवून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. शेतीतून निघणाऱ्या भाजीपाल्याची सुरूवातील स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, जबलपूर या ठिकाणी बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करण्यास सुरूवात केलीे. जैन यांनी शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे लावले आहेत. त्यामुळे बºयाच अंशी नुकसानीवर आळा बसला आहे.सकाळी ६ वाजता बाजारपेठेत भाजीपाला विक्रीेसाठी नेणे, त्यानंतर शेतीत पूर्ण वेळ देऊन, पुन्हा बाजारपेठेत माल विक्रीस नेणे असा नित्यक्रम जैन यांचा आहे.३२ कुटुंबाचा उदरनिर्वाहजैन यांच्या शेतात वर्षभर ३२ कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांना जैन यांच्यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. सेंद्रिय शेतीचा वापर करुन त्यांनी दीड एकरात गहू व भाताचे उत्पादन घेवून सेंद्रिय शेती उत्तम असल्याचे लोकमतशी बोलतांना सांगितले.खताची निर्मिती शेतातचटिटू जैन यांनी सदासावलीचे पान, लिंबाचे पान, सिताफळाचे पान व इतर पानाचे मिश्रण करुन पाण्यात उकळले व त्यांचा काढा काढून स्प्रेद्वारे झाडावर फवारणी केली. त्यामुळे रासायनिक खताचा वापर निम्यावर आल्याचे त्यांनी सांगितले.आज सर्वांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. पारंपारिक शेतीला बगल द्या, नुसती धानाची शेती केल्याने फायदा होत नाही तर शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास शेतीतून निश्चित फायदा होतो.-टिटू जैन, शेतकरी, गोरेगाव