शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भाजीपाल्याच्या उत्पादनातून घेतले १० लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:22 IST

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन ...

ठळक मुद्देपारंपारिक शेतीला दिली बगल : शेतकऱ्यांपुढे ठेवला आदर्श

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेवून वर्षाकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तसेच कनिष्ठ शेती म्हणणाºयापुढे आदर्श निर्माण केला आहे. टिटू जैन असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.टिटू जैन यांची पालेवाडा (हेटी) येथे स्वत:ची १२.५० एकर शेती आहे.या शेतजमिनीत त्यांनी, मिरची, वांगे, काकडी, कारली, टमाटर, चवळीच्या शेंगा, भेंडी आदी भाजीपाला लावला आहे. पूर्वीच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून लोकं इतर व्यवसायाकडे वळायचे. मात्र टिटू जैन यांचे वेगळेपण इथे पहायला मिळते. स्वत: व्यवसायीक असताना सुध्दा ते शेतीकडे वळले. टिटू जैन यांनी सांगितले की मित्राच्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीचे धडे घेतले.शेती करायची ही मनात जिद्द होती, ती जिद्द पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला चिचगाव येथील एका शेतकऱ्याची साडेतीन एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सतत तीन वर्ष शेती करुन शेतीत नफा मिळविला. पुढे स्वत:ची पालेवाडा येथे शेती घेवून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. शेतीतून निघणाऱ्या भाजीपाल्याची सुरूवातील स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, जबलपूर या ठिकाणी बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करण्यास सुरूवात केलीे. जैन यांनी शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे लावले आहेत. त्यामुळे बºयाच अंशी नुकसानीवर आळा बसला आहे.सकाळी ६ वाजता बाजारपेठेत भाजीपाला विक्रीेसाठी नेणे, त्यानंतर शेतीत पूर्ण वेळ देऊन, पुन्हा बाजारपेठेत माल विक्रीस नेणे असा नित्यक्रम जैन यांचा आहे.३२ कुटुंबाचा उदरनिर्वाहजैन यांच्या शेतात वर्षभर ३२ कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांना जैन यांच्यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. सेंद्रिय शेतीचा वापर करुन त्यांनी दीड एकरात गहू व भाताचे उत्पादन घेवून सेंद्रिय शेती उत्तम असल्याचे लोकमतशी बोलतांना सांगितले.खताची निर्मिती शेतातचटिटू जैन यांनी सदासावलीचे पान, लिंबाचे पान, सिताफळाचे पान व इतर पानाचे मिश्रण करुन पाण्यात उकळले व त्यांचा काढा काढून स्प्रेद्वारे झाडावर फवारणी केली. त्यामुळे रासायनिक खताचा वापर निम्यावर आल्याचे त्यांनी सांगितले.आज सर्वांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. पारंपारिक शेतीला बगल द्या, नुसती धानाची शेती केल्याने फायदा होत नाही तर शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास शेतीतून निश्चित फायदा होतो.-टिटू जैन, शेतकरी, गोरेगाव