शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

भाजीपाल्याच्या उत्पादनातून घेतले १० लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:22 IST

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन ...

ठळक मुद्देपारंपारिक शेतीला दिली बगल : शेतकऱ्यांपुढे ठेवला आदर्श

दिलीप चव्हाण/दिलीप मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : पारंपरिक शेतीला बगल देत गोरेगाव येथील एका शेतकऱ्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेवून वर्षाकाठी १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तसेच कनिष्ठ शेती म्हणणाºयापुढे आदर्श निर्माण केला आहे. टिटू जैन असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.टिटू जैन यांची पालेवाडा (हेटी) येथे स्वत:ची १२.५० एकर शेती आहे.या शेतजमिनीत त्यांनी, मिरची, वांगे, काकडी, कारली, टमाटर, चवळीच्या शेंगा, भेंडी आदी भाजीपाला लावला आहे. पूर्वीच्या काळात शेतीला जोडधंदा म्हणून लोकं इतर व्यवसायाकडे वळायचे. मात्र टिटू जैन यांचे वेगळेपण इथे पहायला मिळते. स्वत: व्यवसायीक असताना सुध्दा ते शेतीकडे वळले. टिटू जैन यांनी सांगितले की मित्राच्या मार्गदर्शनात त्यांनी शेतीचे धडे घेतले.शेती करायची ही मनात जिद्द होती, ती जिद्द पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला चिचगाव येथील एका शेतकऱ्याची साडेतीन एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सतत तीन वर्ष शेती करुन शेतीत नफा मिळविला. पुढे स्वत:ची पालेवाडा येथे शेती घेवून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. शेतीतून निघणाऱ्या भाजीपाल्याची सुरूवातील स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, जबलपूर या ठिकाणी बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्री करण्यास सुरूवात केलीे. जैन यांनी शेतात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे लावले आहेत. त्यामुळे बºयाच अंशी नुकसानीवर आळा बसला आहे.सकाळी ६ वाजता बाजारपेठेत भाजीपाला विक्रीेसाठी नेणे, त्यानंतर शेतीत पूर्ण वेळ देऊन, पुन्हा बाजारपेठेत माल विक्रीस नेणे असा नित्यक्रम जैन यांचा आहे.३२ कुटुंबाचा उदरनिर्वाहजैन यांच्या शेतात वर्षभर ३२ कुटुंबांना रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे स्थानिकांना जैन यांच्यामुळे रोजगार प्राप्त झाला आहे. सेंद्रिय शेतीचा वापर करुन त्यांनी दीड एकरात गहू व भाताचे उत्पादन घेवून सेंद्रिय शेती उत्तम असल्याचे लोकमतशी बोलतांना सांगितले.खताची निर्मिती शेतातचटिटू जैन यांनी सदासावलीचे पान, लिंबाचे पान, सिताफळाचे पान व इतर पानाचे मिश्रण करुन पाण्यात उकळले व त्यांचा काढा काढून स्प्रेद्वारे झाडावर फवारणी केली. त्यामुळे रासायनिक खताचा वापर निम्यावर आल्याचे त्यांनी सांगितले.आज सर्वांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. पारंपारिक शेतीला बगल द्या, नुसती धानाची शेती केल्याने फायदा होत नाही तर शेतीत वेगवेगळे प्रयोग केल्यास शेतीतून निश्चित फायदा होतो.-टिटू जैन, शेतकरी, गोरेगाव