शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

शहरासाठी 10 दलघमी पाण्याचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर  परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

 कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात पाणी आणण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार, यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून घेण्यात आले आहे. गरज पडल्यास तेथून पाणी आणून शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर  परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. गरज पडली तर तेथून पाणी आणून शहरातील पाणीटंचाई सोडविता येणार यासाठी हे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून वरुणदेवाची जिल्ह्यावर कृपा असल्याने पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी बरसत असून, वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली नाही. परिणामी पुजारीटोला येथून पाणी आणण्याची गरज पडली नाही. त्यात यंदाही वैनगंगा नदीत पाणी असून, तिथे बंधारा तयार केला जात असल्याने पाणी आहे. अशात यंदाही पाण्याची गरज पडण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. मात्र, ऐनवेळी गैरसोय नको यासाठी पुजारीटोला प्रकल्पात शहरातील १० दलघमी पाणी आरक्षित आहे. 

मागील २ वर्षे गरज पडली नाही

- सन २०१८ मध्ये पहिल्यांदा शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते व त्यानंतर सन २०१९ मध्येही पाण्याची गरज पडली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणण्याची गरज पडली नाही. यंदा वैनगंगा नदीत पाणीसाठा आहे. मात्र, पुढील काळात गरज पडल्यास पाणी आणावे लागू शकते, अशी शक्यता आहे.  

नुकताच याबाबत आढावा घेतला असून, सध्या तरी वैनगंगा नदीत पाणीसाठा असून, तेथे बंधारा तयार केला जात आहे. त्यामुळे आतातरी पाण्याची गरज नाही. मात्र, मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरुवातीला गरज पडू शकते. यामुळे १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवले आहे. - दीनबंधू पाटील कार्यकारी अभियंता, मजिप्रा

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी