शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरासाठी 10 दलघमी पाण्याचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर  परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

 कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात पाणी आणण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार, यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून घेण्यात आले आहे. गरज पडल्यास तेथून पाणी आणून शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर  परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. गरज पडली तर तेथून पाणी आणून शहरातील पाणीटंचाई सोडविता येणार यासाठी हे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून वरुणदेवाची जिल्ह्यावर कृपा असल्याने पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी बरसत असून, वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली नाही. परिणामी पुजारीटोला येथून पाणी आणण्याची गरज पडली नाही. त्यात यंदाही वैनगंगा नदीत पाणी असून, तिथे बंधारा तयार केला जात असल्याने पाणी आहे. अशात यंदाही पाण्याची गरज पडण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. मात्र, ऐनवेळी गैरसोय नको यासाठी पुजारीटोला प्रकल्पात शहरातील १० दलघमी पाणी आरक्षित आहे. 

मागील २ वर्षे गरज पडली नाही

- सन २०१८ मध्ये पहिल्यांदा शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते व त्यानंतर सन २०१९ मध्येही पाण्याची गरज पडली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणण्याची गरज पडली नाही. यंदा वैनगंगा नदीत पाणीसाठा आहे. मात्र, पुढील काळात गरज पडल्यास पाणी आणावे लागू शकते, अशी शक्यता आहे.  

नुकताच याबाबत आढावा घेतला असून, सध्या तरी वैनगंगा नदीत पाणीसाठा असून, तेथे बंधारा तयार केला जात आहे. त्यामुळे आतातरी पाण्याची गरज नाही. मात्र, मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरुवातीला गरज पडू शकते. यामुळे १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवले आहे. - दीनबंधू पाटील कार्यकारी अभियंता, मजिप्रा

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी