शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
2
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
3
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
4
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
5
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
6
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
7
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
8
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
9
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
10
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
11
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
12
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
13
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
14
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
15
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
16
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
17
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
18
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
19
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
20
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो

शहरासाठी 10 दलघमी पाण्याचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर  परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

 कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात पाणी आणण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार, यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून घेण्यात आले आहे. गरज पडल्यास तेथून पाणी आणून शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर  परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. गरज पडली तर तेथून पाणी आणून शहरातील पाणीटंचाई सोडविता येणार यासाठी हे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून वरुणदेवाची जिल्ह्यावर कृपा असल्याने पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी बरसत असून, वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली नाही. परिणामी पुजारीटोला येथून पाणी आणण्याची गरज पडली नाही. त्यात यंदाही वैनगंगा नदीत पाणी असून, तिथे बंधारा तयार केला जात असल्याने पाणी आहे. अशात यंदाही पाण्याची गरज पडण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. मात्र, ऐनवेळी गैरसोय नको यासाठी पुजारीटोला प्रकल्पात शहरातील १० दलघमी पाणी आरक्षित आहे. 

मागील २ वर्षे गरज पडली नाही

- सन २०१८ मध्ये पहिल्यांदा शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते व त्यानंतर सन २०१९ मध्येही पाण्याची गरज पडली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणण्याची गरज पडली नाही. यंदा वैनगंगा नदीत पाणीसाठा आहे. मात्र, पुढील काळात गरज पडल्यास पाणी आणावे लागू शकते, अशी शक्यता आहे.  

नुकताच याबाबत आढावा घेतला असून, सध्या तरी वैनगंगा नदीत पाणीसाठा असून, तेथे बंधारा तयार केला जात आहे. त्यामुळे आतातरी पाण्याची गरज नाही. मात्र, मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरुवातीला गरज पडू शकते. यामुळे १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवले आहे. - दीनबंधू पाटील कार्यकारी अभियंता, मजिप्रा

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी