शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नक्षलग्रस्त भागातील १० मुला-मुलींनी घडविला विक्रम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शालेय मुला-मुलींना डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ...

गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शालेय मुला-मुलींना डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या प्रकल्पामध्ये सहभाग होऊन जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे उपग्रह यशस्वीरीत्या बनवून प्रक्षेपित करून विश्वविक्रम निर्माण केला आहे. पोलीस दलाच्या पुढाकारामुळे प्रथमच या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.

पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शालेय मुला-मुलींना उपविभाग देवरी आमगावअंतर्गत १९ जानेवारी रोजी विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील प्रकाश टेकाम, आशिक टेकाम, रामेश्वर कुंभरे रा. मरुकुटडोह, नरेश टेकाम, सुभाष मडावी रा. दंडारी, ग्यानी धुर्वे, डेव्हिड मरस्कोल्हे, श्रेहर्ष रामटेके, अपूर्वा गणवीर रा. देवरी, तन्मय शहारे रा. मुरदोली या शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वत: उपग्रहाची बांधणी केली. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना २ ते ७ जानेवारी दरम्यान याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे, यासाठी हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. ७ फेब्रुवारी रोजी भारतातील १००० विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपण करून विश्वविक्रम, आशिया विक्रम, भारतीय विक्रम, असिस्ट वर्ल्ड विक्रम स्थापित केला. यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी विश्वविक्रम घडविलेल्या गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

....

महाराष्ट्रातील ३९८ विद्यार्थ्यांचा सहभाग

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनअतंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात महाराष्ट्रातील एकूण ३९८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त भागातील १० शालेय विद्यार्थ्यांचासुद्धा सहभाग होता. हे प्रक्षेपण रामेश्वर येथून करण्यात आले.