शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जि.पं. निवडणूक पक्ष पातळीवर नकोच

By admin | Updated: February 11, 2015 02:10 IST

मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर लढविण्यासंदर्भात राज्य सरकारने जो वटहुकूम जारी केला आहे

मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर लढविण्यासंदर्भात राज्य सरकारने जो वटहुकूम जारी केला आहे. त्या विरोधात राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी ‘गोवाज मुव्हमेंट अगेन्स्ट पंचायत आॅर्डिनन्स’ ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. मंगळवारी मडगावात या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. या वटहुकूमाविरोधात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दाद मागण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन पुढील कृती ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला गोवन्स फॉर गोवाचे कॅनेडी आफोन्सो, गोवा सुराज्य पार्टीचे फ्लोरियान लोबो, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष जयेश साळगावकर, पंचायत फोरमचे निमंत्रक जोसेफ वाझ, काँग्रेसचे दुर्गादास कामत, राष्ट्रवादीच्या राखी नाईक, अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. अ‍ॅड. रॉड्रिगीस म्हणाले की, गोव्यातील भाजपा सरकारला स्थानिक स्वराज संस्था लोकशाही पध्दतीने चाललेल्या नको आहेत. यासाठीच त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुका पक्षपातळीवर घेण्याचे ठरविले आहे. सरकारला जर असाच निर्णय घ्यायचा होता, तर त्यांनी हा विषय विधानसभेत आणून त्यावर चर्चा करण्याची गरज होती. मात्र, अशी कुठलीही चर्चा न करता वटहुकूमाद्वारे मागच्या दाराने हा निर्णय लादला गेला आहे, असे ते म्हणाले. लोकांवर निर्णय लादले गेले तर त्याचा परिणाम काय होतो, हे दिल्ली निवडणुकीने दाखवून दिले आहे. गोव्यातही मनमानी करणाऱ्या भाजपा सरकारला त्यांच्या निर्णयाचे परिणाम लवकरच कळून येतील, असे ते म्हणाले. गोवन्स फॉर गोवाचे निमंत्रक कॅनेडी आफोन्सो यांनी भाजपा सरकारचा हा निर्णय लोकशाहीविरोधी असून, या निर्णयाला रस्त्यावर उतरून आम्ही विरोध करू, असे सांगितले. दुर्गादास कामत यांनी भाजप सरकारला राज्यकारभार लोकशाही पध्दतीने चालवायचा नाही हेच सिध्द होते, असा आरोप केला. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष जयेश साळगावकर यांनीही भाजपाचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)