पणजी : गोवा दौऱ्यावर नुकतेच आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाणी, अर्थव्यवस्था, झुआरी पूल आणि पर्यावरण याबाबत केलेल्या स्पष्टीकरणाबाबत येथील आम आदमी पक्षाच्यावतीने काहीशी सावध भूमिका घेत काही अंशी आशा बाळगल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी खाण महामंडळाने नैसर्गिक स्त्रोत टिकविण्यासाठी खाण कंपन्यांवर कडक नजर ठेवण्याचे केलेल्या सूचना व येथील त्यावर आधारलेल्या अर्थव्यस्थेविषयी दिलेले स्पष्टीकरण फारच बोलके असल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. शिवाय केंद्र सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अतिरिक्त कर आणि इतर सवलतींना आळा घालण्याच्या तयारीत आहे. जरी देशाचा कारभार मोठ्या व्यावसायिकांच्या दबावाखाली चालला असला तरी केंद्र सरकार परदेशातील काळा पैसा, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. झुआरी पुलासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याने येथे पायाभूत सुविधाही पुरविण्यात एकप्रकारे मोदी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते, ही चांगली बाब आहे. उड्डाणपुलामुळे गोव्यातील वाहतूक निश्चितच सुरळीत होईल. शिवाय गोव्याला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी नैसर्गिक ठिकाणांना कोणताही बाधा येणार नाही, याकडे लक्ष पुरवावे लागणार असल्याचे या आपने पत्रकात म्हटले आहे.
मोदींच्या दौऱ्याबाबत आपची सावध भूमिका
By admin | Updated: June 16, 2014 02:02 IST