शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१४०० विद्यार्थी पदवी प्रवेशाविना

By admin | Updated: July 5, 2015 01:38 IST

महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.

वासुदेव पागी ल्ल पणजीमहाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.बारावीच्या परीक्षेनंतर विज्ञान, वाणिज्य व कला विभागाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्यामुळे महाविद्यालयांत राज्यात ५००हून अधिक मुले ही प्रवेशाविना राहिली होती. बारावीच्या पुरवणी परीक्षेनंतर त्यात ८७३ विद्यार्थ्यांची भर पडून ही संख्या १४००वर गेली आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालयीन प्रवेशाबाबत समस्या निर्माण झाली आहे.वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी-अधिक प्रमाणात ती आहे. उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग मंजूर करण्यासाठीही मर्यादा येत असल्याचे ते म्हणाले.पदवी अभ्यासक्रमाच्या एका वर्गात नियमानुसार जास्तीत जास्त ६० विद्यार्थी असू शकतात. त्यात किंचित बदल करून प्रत्येक वर्गात अतिरिक्त १० विद्यार्थी घेण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव उच्च शिक्षण खात्याकडून गोवा विद्यापीठाकडे पाठविला असल्याची माहिती भास्कर नायक यांनी दिली. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे प्रवेशाची समस्या कायम आहे.