शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

जनतेच्या पैशातून खाण पॅकेज का?

By admin | Updated: July 23, 2014 00:48 IST

पणजी : ट्रकवाले किंवा खाण अवलंबितांना जनतेच्या पैशातून पॅकेज देण्याची गरज नाही. पैसे द्यायचेच असतील, तर केंद्र सरकारकडून आणा किंवा ज्यांनी बेकायदा खाणींद्वारे लूट केली,

पणजी : ट्रकवाले किंवा खाण अवलंबितांना जनतेच्या पैशातून पॅकेज देण्याची गरज नाही. पैसे द्यायचेच असतील, तर केंद्र सरकारकडून आणा किंवा ज्यांनी बेकायदा खाणींद्वारे लूट केली, त्यांच्याकडून वसूल करून अवलंबितांना द्या, अशी मागणी करीत अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. पर्रीकर सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, अशा आरोपांच्या फैरी झाडीत प्रथमच आक्रमक बनलेल्या सावळ यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. दोन वर्षे मी सरकारबरोबर राहिलो; परंतु आता सर्व काही उमजले आहे, असे ते म्हणाले. सरकारने मोठमोठी आश्वासने दिली होती; परंतु लोकांचा अपेक्षाभंग झालेला आहे. मांडवीतून कॅसिनो हटवतो, असे सांगितले; परंतु उलटेच घडले. नव्या कॅसिनोची भर पडली. प्रादेशिक आराखडा दहा वर्षे खितपत पडला आहे. माध्यम प्रश्न सुटलेला नाही. कचरा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला आहे. लोकायुक्त, राज्य माहिती आयुक्त हे सरकार देऊ शकलेले नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाची गोष्ट दूरच; उलट भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. डिचोली पालिकेत मुख्याधिकारी उघडपणे लाच मागतो, असा आरोप त्यांनी केला. बेकायदा खाणींद्वारे केलेली लूट हे सरकार वसूल करू शकले नाही. किनारी भागात ड्रग्स व्यवसाय फोफावतो आहे. कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, असा आरोपही त्यांनी केला. गुंतवणूक धोरणाच्या गोंडस नावाखाली पाच वर्षांत ५० हजार नोकऱ्यांचे आमिष दाखविले जात आहे. गेली अडीच वर्षे सरकारला हे शक्य झाले नाही आणि शक्य होत असेल तर करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. (प्रतिनिधी)