शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा

By admin | Updated: June 16, 2014 02:01 IST

समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा

पणजी : मान्सूनचा जोर नसला तरी खवळलेल्या समुद्रात उसळलेल्या उंच लाटांनी गेल्या सात-आठ दिवसांतच सुमारे वीस टन कचरा किनाऱ्यांवर फेकला आहे. एकीकडे तेलगोळ्यांनी नाकी दम आणलेला असताना हा कचरा हटविण्याचे मोठे आव्हान पर्यटन खात्यासमोर आहे. पर्यटन संचालक निखिल देसाई यांना विचारले असता, गेल्या काही दिवसांत किनाऱ्यांवरील तीन ते चार टन कचरा काढण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे त्यांनी मान्य केले. किनारे साफ करण्यासाठी वार्षिक १४ कोटी रुपयांचे नवे कंत्राट निश्चित झाले आहे. पुरेसे मजूर मिळणार असल्याने पुढील मान्सूनपासून हा प्रश्न निकालात येईल, असे त्यांनी सांगितले. सध्याचे कंत्राट चार ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळी किनाऱ्यांच्या व्यापक साफसफाईसाठी भरीव तरतूद नव्हती. १0५ किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर प्रमुख भागातच १२५ मजूर सध्या कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. हे मनुष्यबळ तसे अपुरेच आहे. पावसाळ्यात किनाऱ्यांवरील कचरा हटविण्याचे आव्हान दरवर्षी पर्यटन खात्यासमोर असते. खास करून प्लास्टिक कचरा लाटांबरोबर सतत किनाऱ्याला लागत असतो. नव्या कंत्राटात हा कचरा गोळा करून त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारीही कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)