शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा

By admin | Updated: June 16, 2014 02:01 IST

समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा

पणजी : मान्सूनचा जोर नसला तरी खवळलेल्या समुद्रात उसळलेल्या उंच लाटांनी गेल्या सात-आठ दिवसांतच सुमारे वीस टन कचरा किनाऱ्यांवर फेकला आहे. एकीकडे तेलगोळ्यांनी नाकी दम आणलेला असताना हा कचरा हटविण्याचे मोठे आव्हान पर्यटन खात्यासमोर आहे. पर्यटन संचालक निखिल देसाई यांना विचारले असता, गेल्या काही दिवसांत किनाऱ्यांवरील तीन ते चार टन कचरा काढण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे त्यांनी मान्य केले. किनारे साफ करण्यासाठी वार्षिक १४ कोटी रुपयांचे नवे कंत्राट निश्चित झाले आहे. पुरेसे मजूर मिळणार असल्याने पुढील मान्सूनपासून हा प्रश्न निकालात येईल, असे त्यांनी सांगितले. सध्याचे कंत्राट चार ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळी किनाऱ्यांच्या व्यापक साफसफाईसाठी भरीव तरतूद नव्हती. १0५ किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर प्रमुख भागातच १२५ मजूर सध्या कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. हे मनुष्यबळ तसे अपुरेच आहे. पावसाळ्यात किनाऱ्यांवरील कचरा हटविण्याचे आव्हान दरवर्षी पर्यटन खात्यासमोर असते. खास करून प्लास्टिक कचरा लाटांबरोबर सतत किनाऱ्याला लागत असतो. नव्या कंत्राटात हा कचरा गोळा करून त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारीही कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)