शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

...तर राज्यातील पाणीपुरवठा बंद!

By admin | Updated: May 17, 2015 00:53 IST

पणजी : सरकारने येत्या पंधरा दिवसांत वेतनवाढ दिली नाही आणि आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करून घेणे बंद केले नाही,

पणजी : सरकारने येत्या पंधरा दिवसांत वेतनवाढ दिली नाही आणि आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करून घेणे बंद केले नाही, तर राज्याचा पाणीपुरवठा आम्ही बंद करू, असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचारी संघटनेचे सचिव सुरेश नाईक व इतरांनी शनिवारी दिला. येथील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साधारण एक हजार तीनशे नऊ कर्मचाऱ्यांना गेल्या१२-१३ वर्षांपासून केवळ चार हजार पगारावर राबवून घेतले जात आहे. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना केवळ४ हजार वेतन दिले जाते. गेले सात महिने हे वेतनही दिले गेले नाही. सुरुवातीपासूनच तीन ते चार महिन्यांनी एकदाच वेतन देण्यात यायचे. आम्हाला ज्या कामासाठी घेण्यात आले त्याबरोबर इतर सर्व श्रमाची कामेही अभियंते आमच्याकडून करून घेतात. आठ तासांपेक्षा जास्त तास सेवा बजावून घेतली जाते, असे सचिव नाईक यांनी सांगितले. वाढती महागाई पाहता चार हजार पगारावर कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण होते. त्यात वेतनही वेळेवर मिळत नाही. सरकारने आमचे किमान वेतन १0 हजार करावे, अशी मागणी कामगारांनी केले आहे. अन्यथा आम्ही काम बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे. आताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २0१२ सालच्या निवडणुकांवेळी सर्व कामगारांना दिवसाला ३७0 प्रमाणे वेतन देण्यात येईल. तसेच सत्तेवर आल्यास सर्व कामगारांना नोकरीत कायमस्वरूपी घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने आपला शब्द न पाळता आता पुन्हा नव्याने कंत्राटी कर्मचारी भरती सुरू केली आहे. अशा पद्धतीने सरकार केवळ वोट बँक तयार करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. भाजपा सरकारी कंत्राटी पद्धती ही कामागारांच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. राजकारणी केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. मात्र, गरीब कर्मचाऱ्यांना महागाईशी सामना करत संसार रेटावा लागतो. सरकारने अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची सतावणूक न करता वेतन वाढीची मागणी मान्य करावी. आम्ही याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना सादर करणार आहोत, असे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी सांगितले. या वेळी त्यांच्यासमवेत कामगार नेत्या स्वाती केरकर उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)