शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

गोव्यात केरळच्या माकम, कुंजुकुंजु भातबियाण्यांचा प्रयोग

By admin | Updated: June 28, 2016 19:27 IST

गोव्यात केरळच्या लाल दाण्याच्या माकम, कुंजुकुंजु या भातबियाण्यांचा प्रयोग या खरिप मोसमात घेतला जात आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाची संततधारचालूच असली

-  महाराष्ट्राचे कर्जत- ३ बियाणेही मानवले : पाऊस भातशेतीला पूरक पणजी : गोव्यात केरळच्या लाल दाण्याच्या माकम, कुंजुकुंजु या भातबियाण्यांचा प्रयोग या खरिप मोसमात घेतला जात आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाची संततधारचालूच असली तरी त्याचा भात शेतीवर कोणताही परिणाम होणार नसून उलट हा पाऊस लाभदायकच ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. येथील कृषी खात्याचे संचालक उल्हास पै काकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा पाऊस शेतीला लाभदायकच आहे. यावर्षी केरळची लाल दाण्याची माकम, कुंजुकुंजु ही भात बियाणी प्रयोगासाठी घेतलेली आहेत. गोव्याच्या पारंपरिक ज्योती बियाण्याला पर्याय म्हणून या बियाण्यांकडे पाहिले जाते. गेल्या वर्षीही काही भागात लागवड केली असता गोव्याची हवा या बियाण्याला मानवल्याचे दिसून आले. राज्यातील सासष्टी, तिसवाडी, बार्देस आदी किनारी भागात भात बियाण्याची लागवड पूर्ण झालेली आहे. भात रोपट्यांच्या लागवडीसाठी यावर्षी ट्रान्सप्लांटर आणला असून आता यंत्रवत लागवडीचा मार्गही खुला झाला असल्याचे काकोडे म्हणाले. सासष्टी आणि बार्देस तालुक्यांमध्ये शेतात ट्रान्सप्लांटरचा प्रयोग घेतलेला आहे. राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३१ हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड झाली होती यंदा लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देणे हा त्याचाच एक भाग आहे. याआधीही कर्नाटक, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भातबियाण्यांचा यशस्वी प्रयोग गोव्यात झालेला आहे. केरळचे रेवती, महाराष्ट्राचे कर्जत-३ ही बियाणीही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत. कमी पाण्यात तग धरणारी आणि बऱ्यापैकी पिक देणारी बियाणी शेतकरी पसंत करीत असतात. पारंपरिक जया आणि ज्योती या बियाण्यांना पर्याय म्हणून अशा नवनव्या बियाण्यांचा प्रयोग राज्यात होत आहे आणि त्याला येथील शेतकरीही चांगला प्रतिसाद देत आहेत.