शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: May 20, 2014 01:29 IST

पणजी : काँग्रेसच्या ताब्यातील नऊपैकी आठ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्यामुळे अस्वस्थ झालेले काही काँग्रेस आमदार आता भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.

पणजी : काँग्रेसच्या ताब्यातील नऊपैकी आठ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्यामुळे अस्वस्थ झालेले काही काँग्रेस आमदार आता भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही बेभरंवशाचे आमदार तर स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याच्याही हालचाली करू लागले आहेत. ताळगाव, सांताक्रूझ, कुंभारजुवे, वाळपई, पर्ये, केपे, मडगाव असे मतदारसंघ हे काँग्रेसचे अभेद्य गड समजले जात होते. मात्र, भाजपने या अभेद्य गडांना सुरूंग लावण्यात यश मिळविल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. यामुळे काही आमदारांच्या व एकूणच काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या हृदयात धडकी भरली आहे. काहीजण तर सैरभैर झाले असून ते भाजपच्या काही नेत्यांशी व पदाधिकार्‍यांशी गेले काही दिवस सातत्याने संपर्कात आहेत. पर्रीकर सरकार पूर्णत: बहुमतात आहे. शिवाय केंद्रात मोदी सरकार आल्याने पर्रीकर सरकार अतिशय बळकट बनले आहे. या सरकारला काँग्रेसच्या आमदारांची गरज नाही; पण काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली काहीजणांना हवी आहे. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी तर प्रसंगी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा निवडणुकीस जाण्याची तयारी ठेवली आहे. आपण नवा पक्ष स्थापन करीन, असे मोन्सेरात यांनी जाहीर केले आहे; पण मोन्सेरात हे गंभीर व राजकीयदृष्ट्या विश्वासार्ह आमदार नव्हे, असे काहीजणांना वाटते. आमदार विजय सरदेसाई यांच्याही मोन्सेरात संपर्कात आहेत. आमदार पांडुरंग मडकईकर हेही कुंभारजुवेत काँग्रेसला आघाडी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. तेही मोन्सेरात गटातील आमदार मानले जातात. मोन्सेरात यांची आमदार दिगंबर कामत यांच्याशीही बोलणी झाली आहे; पण कामत व मडकईकर हे काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. आमदार विश्वजीत राणे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची नाही, असे ठरविले आहे; पण मोन्सेरात त्यांच्याही संपर्कात आहेत. (खास प्रतिनिधी)